शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

ग्रामीण भागातील 'त्या' संगणकांवर धुळीचे थर

By admin | Updated: February 16, 2016 00:21 IST

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान १० ते १४ या वयोगटात प्राप्त व्हावे, यासाठी शासनाने लाखो रुपये खर्च करून ...

प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष : भारनियमन, पुरेशा जागेचा अभावअमरावती : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान १० ते १४ या वयोगटात प्राप्त व्हावे, यासाठी शासनाने लाखो रुपये खर्च करून जिल्हा परिषद शाळा व खासगी शाळांना संगणक उपलब्ध करून दिले आहेत. मात्र विद्युत भारनियमन, संगणक परिचालक पुरेशा जागेचा अभाव यामुळे तर काही ठिकाणी विद्युत देयके, संगणक दुरुस्तीसाठी वेगळा निधी मिळत नसल्यामुळे बऱ्याच शाळांमधील संगणक धूळ खात आहेत. ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी संगणकीय ज्ञानापासून वंचित आहेत. शासनाने उच्च प्राथमिक शाळांमध्ये २००६ - २००७ पासून संगणक उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या नियमसंगत असलेल्या उच्च प्राथमिक शाळेत दहा संगणक संच मिळाले आहेत. फक्त सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान मिळाले. त्यानंतर संगणकात झालेला बिघाड व दुरुस्तीसाठी मुख्याध्यापकाकडे नसलेल्या निधीची तरतूद, विद्युत देयके भरण्यासाठी रक्कम उपलब्ध नसल्याने अनेक शाळांमधील संगणक सध्या धूळ खात पडले आहेत. प्रशासनाच्या या उदासीन धोरणामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. शासनाच्या या योजनेलाही फटका बसत आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे संबंधितांनी आवर्जून लक्ष देऊन विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्याची गरज निर्माण झाली आहे. शासनामार्फत संगणकावर लाखो रुपये खर्च करण्यात येते. परंतु ग्रामीण भागामधील शाळांमधून संगणकाचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. (प्रतिनिधी)