शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

ग्रामीण भागातील 'त्या' संगणकांवर धुळीचे थर

By admin | Updated: February 16, 2016 00:21 IST

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान १० ते १४ या वयोगटात प्राप्त व्हावे, यासाठी शासनाने लाखो रुपये खर्च करून ...

प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष : भारनियमन, पुरेशा जागेचा अभावअमरावती : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान १० ते १४ या वयोगटात प्राप्त व्हावे, यासाठी शासनाने लाखो रुपये खर्च करून जिल्हा परिषद शाळा व खासगी शाळांना संगणक उपलब्ध करून दिले आहेत. मात्र विद्युत भारनियमन, संगणक परिचालक पुरेशा जागेचा अभाव यामुळे तर काही ठिकाणी विद्युत देयके, संगणक दुरुस्तीसाठी वेगळा निधी मिळत नसल्यामुळे बऱ्याच शाळांमधील संगणक धूळ खात आहेत. ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी संगणकीय ज्ञानापासून वंचित आहेत. शासनाने उच्च प्राथमिक शाळांमध्ये २००६ - २००७ पासून संगणक उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या नियमसंगत असलेल्या उच्च प्राथमिक शाळेत दहा संगणक संच मिळाले आहेत. फक्त सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान मिळाले. त्यानंतर संगणकात झालेला बिघाड व दुरुस्तीसाठी मुख्याध्यापकाकडे नसलेल्या निधीची तरतूद, विद्युत देयके भरण्यासाठी रक्कम उपलब्ध नसल्याने अनेक शाळांमधील संगणक सध्या धूळ खात पडले आहेत. प्रशासनाच्या या उदासीन धोरणामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. शासनाच्या या योजनेलाही फटका बसत आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे संबंधितांनी आवर्जून लक्ष देऊन विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्याची गरज निर्माण झाली आहे. शासनामार्फत संगणकावर लाखो रुपये खर्च करण्यात येते. परंतु ग्रामीण भागामधील शाळांमधून संगणकाचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. (प्रतिनिधी)