शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळी काळात परगावांतून येणारे नागरिक वाढले; टेस्ट मात्र तेवढ्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 05:00 IST

जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला. महिनाभरात नऊ हजारांवर कोरोना पाॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाल्याने हादरा बसला. नागरिकांसह प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली. परिणामी ऑक्टोबरपासून कोरोना संसर्ग घटला अन् नागरिक बिनधास्त झाले. जणू काही कोरोना संपला, अशा  थाटात काहींना मास्क, फिजिकल डिस्टन्सचा विसर पडला. याच काळात दिवाळीचा सण आला. बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली.

ठळक मुद्देबाजारपेठेतही तोबा गर्दी, बहुतेक ठिकाणी नमुने संकलन केंद्रही बंदच

  लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे जरी म्हटले जात असले तरी यंदाच्या दिवाळीत ‘कोरोना इफेक्ट’ जाणवलाच. बाहेगावी असणारे बहुतेक सर्वच दिवाळीला घरी  गावी आलेत; मात्र कोरोना चाचणी करायचा विसर पडला. या आठवड्यात चाचण्यांची संख्या रोडावली. याला कारणही नेमके हेच आहे. याशिवाय दिवाळीच्या अगोदरपासून बहुतेक नमुने संकलन केंद्रेही बंद होती. त्यामुळेही चाचण्यांच्या संख्येत कमी आलेली आहे.जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला. महिनाभरात नऊ हजारांवर कोरोना पाॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाल्याने हादरा बसला. नागरिकांसह प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली. परिणामी ऑक्टोबरपासून कोरोना संसर्ग घटला अन् नागरिक बिनधास्त झाले. जणू काही कोरोना संपला, अशा  थाटात काहींना मास्क, फिजिकल डिस्टन्सचा विसर पडला. याच काळात दिवाळीचा सण आला. बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा फज्जा उडाला. बहुतेक ठिकणी असलेले  कोरोना नमुने संकलन केंद्रेही बंद झाली. नागरिक चाचणी टाळू लागल्याने या काळात चाचण्यांची संख्या कमी आली. प्रशासनानेही प्रोटोकाॅलनुसार चाचणी सुरू केल्याने कोरोना पॅाझिटिव्ह रुग्णसंख्या घटली आहे. दरम्यान, दिवाळीच्या काळात झालेल्या गर्दीत ‘सुपर स्प्रेडर’ व्यक्ती व असिम्प्टमॅटिक रुग्ण वावरल्याने पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. आता शाळा सुरू झाल्याने शिक्षकांचीही चाचण्यांसाठी गर्दी झाली आहे.

आता कोणालाही करता येणार आरटी-पीसीआर टेस्ट

 जिल्ह्यात तसे पाहता ऑक्टोबर महिन्यांपासूनच नमुने संकलन केंद्रावर चाचण्या करण्यासाठी नागरिकांची गर्दी कमी व्हायला लागली. याचा थेट परिणाम अहवालांवर झाला. कोरोनाग्रस्तांची  संख्या रोडावल्याने नागरिकांमध्ये बिनधास्तपणा वाढला.

 सुरुवातीला चाचण्यांसाठी गर्दी वाढली होती. त्यानंतर आरोग्य विभागाचा प्रोटोकाॅल आला. त्यानुसार चाचण्या सुरू केल्याने नागरिक परतायला लागले. आता मात्र हे निकष बाद ठरविण्यात येऊन कोणालाही आरटी-पीसीआर चाचणी करता येते.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या