शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

बांधकाम कार्यालयातील रस्ते खोदले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 23:32 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणात असलेल्या शहरातील मुख्य रस्त्यांची अवस्था जीवघेणी असल्याचा आक्षेप नोंदवित काँग्रेसने बांधकाम कार्यालयापुढेच रस्ते खोदून बुधवारी अभिनव आंदोलन केले.

ठळक मुद्देकाँग्रेसचे अभिनव आंदोलन : शहरातील रस्त्यांची मांडली व्यथा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणात असलेल्या शहरातील मुख्य रस्त्यांची अवस्था जीवघेणी असल्याचा आक्षेप नोंदवित काँग्रेसने बांधकाम कार्यालयापुढेच रस्ते खोदून बुधवारी अभिनव आंदोलन केले. यावेळी रस्ते सुधारण्यासाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला.महापालिकेतील विरोधी पक्षनेते बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, माजी सभापती अविनाश मार्डीकर, राजा बांगडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. बांधकाम विभाग रस्ते निर्मितीच्या नावाखाली नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याचा आरोप कॉँग्रेसने केला. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आतापर्यंत चार ते पाच नागरिकांचा जीव गेला. या समस्येबाबत वारंवार अवगत करूनही बांधकाम विभागाने उपाययोजना केल्या नाहीत. आता तर शहरात ‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता’ अशी विदारक स्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यांवरील खड्डे आठ दिवसांत बुजले नाहीत, तर अधीक्षक अभियंत्यांनाच दालनात कोंडून जाब विचारला जाईल, असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला.