शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शिक्षकांच्या बहिष्कारामुळे ५२ लाख उत्तरपत्रिका मुल्यांकणाचे काम रखडले!

By नितिन गव्हाळे | Updated: February 25, 2023 18:58 IST

महासंघ व विज्युक्टाच्या आवाहनानुसार १२ वी बोर्ड परीक्षा मुल्यमापणावरील शिक्षकांच्या बहिष्कारामुळे राज्यातील जवळपास ५२ लाख उत्तरपत्रिकांचे मुल्यांकणाचे काम रखडले आहे.

अकोला: महासंघ व विज्युक्टाच्या आवाहनानुसार १२ वी बोर्ड परीक्षा मुल्यमापणावरील शिक्षकांच्या बहिष्कारामुळे राज्यातील जवळपास ५२ लाख उत्तरपत्रिकांचे मुल्यांकणाचे काम रखडले आहे. पुणे येथिल मुख्य नियमकांच्या कोणत्याही बैठकी झाल्या नाही, तसेच विभागीय शिक्षण मंडळात नियमकांच्या बैठकी झालेल्या नाहीत. अमरावती विभागात वर्ग १२ वीला १ लाख ५२ हजार विद्यार्थी प्रविष्ठ असून ६ लाखांपेक्षा अधिक उत्तपत्रिका तपासणीविणा रखडल्या आहेत.

शिक्षणक्षेत्रातील न्याय मागण्या दीर्घकाळ प्रलंबित ठेवणे,वारंवार पत्र निवेदने देवुन कोणत्याही प्रकारे निराकरण न करणे, आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी ५ सप्टेंबर शिक्षक दिनापासून वेगवेगळ्या टप्प्यावर तालुका व जिल्हा स्तरावर विविध आंदोलने केली. तसेच २२ डिसेंबरला नागपुर विधिमंडळावर संघटनेने केलेल्या आंदोलनादरम्यान सभा घेण्याचे मान्य करुन सुद्धा शिक्षण मंत्र्यांनी सभा घेतली नाही.

मागण्यांकडे सातत्याने डोळेझाक केल्यामुळे नाईलाजास्तव वर्ग १२ वी परीक्षांचे उत्तरपत्रिका मूल्यमापनावर विज्युक्टा व महासंघाने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे विज्युक्टाचे अध्यक्ष डाॅ.अविनाश बोर्डे यांनी सांगितले. शिक्षण मंडळावर शनिवारी झालेल्या नियामकांच्या बहिष्कार सभेमध्ये विज्युक्टांचे प्रांताध्यक्ष डॉ. अविनाश बोर्डे, प्रा. शिवराम बावस्कर, जिल्हाध्यक्ष प्रा. डी. एस. राठोड, प्रा.ईकबाल खान, प्रा. संजय गोळे, प्रा. सुभाष पारीसे, प्रा.श्रीराम पालकर, प्रा मंगेश कांडलक, प्रा.तेलंग, प्रा.पवण ढवळे आदी उपस्थित होते.

काय मागण्या आहेत शिक्षकांच्या

१ नोव्हेंबर 2005 पूर्वी विना तसेच अंशतः अनुदानावरील नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व सेवानिवृत्तांना या योजनेचा तातडीने लाभ द्यावा, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे १०, २०, ३० वर्षाची आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना त्वरित लागू करावी. निवडश्रेणीसाठीची २० टक्क्यांची अट रद्द करावी, वाढीव पदांना रुजू दिनांकापासून मंजुरी द्यावी व आय.टी. विषय अनुदानित करावा, अघोषित उच्च माध्य. ला अनुदानासह घोषित करून अंशतः अनुदानावरील शाळा व क.म.विद्यालयाला प्रचलित अनुदानसुत्र तातडीने लागू करावे. अनुदानासाठीच्या जाचक अटी रद्द कराव्यात, विनाअनुदानित कडून अनुदानित मध्ये बदलीला १ डिसेंबर २०२२ पासून लागू केलेली स्थगिती त्वरित रद्द करावी, शिक्षकांची रिक्त पदे त्वरीत भरावीत, कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थी पटसंख्यचे निकष शाळा संहितेनुसार असावेत. यासह इतर मागण्या करण्यात आल्या आहेत.