शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

पीक विम्याच्या पुराव्याअभावी शेतकरी राहणार वंचित

By admin | Updated: July 15, 2016 00:34 IST

पंतप्रधान पीक विमा योजनेच्या जाचक अटीमुळे व पिकांचा विमा उतरवण्याचा कोणताच पुरावा शेतकऱ्यांजवळ राहत नसल्यामुळे

जाचक अटी : शेतकऱ्यांना पोचपावती देण्याची मागणी अमरावती : पंतप्रधान पीक विमा योजनेच्या जाचक अटीमुळे व पिकांचा विमा उतरवण्याचा कोणताच पुरावा शेतकऱ्यांजवळ राहत नसल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे शासनाने संबंधित विभागांसह शेतकऱ्यांजवळ विमा भरल्याची नोंद असलेली पुरावा राहण्याची तरतूद करण्याची मागणी शेतकरी वर्गातून पुढे येत आहे. नैसर्गिक संकटातून कृषी क्षेत्रावर होणाऱ्या नुकसानीच्या बदल्यात इतर क्षेत्रांप्रमाणे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळवून देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय पीक विमा योजना शासनाने सुरू केली असून नुकसान भरपाईच्या जाचक अटीमुळे शेतकऱ्यांची होणारी ससेहोलपट, यावर्षीची भीषण दुष्काळी स्थितीमुळे शासनाने विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांसोबत विमा न काढणाऱ्या शेतकऱ्यांसोबत विमा काढणाऱ्यांना ५० टक्के रक्कम देण्याची घोषणा केली. शासनाच्या या घोषणेमुळे शेतकरी सुखावला. परंतु घोषणा होऊन पाच महिने झाले. मात्र अद्याप शेतकऱ्यांच्या हातात एक पैसाही आला नसल्याने शेतकऱ्यांचा हीरमोड होत आहे. विम्याची रक्कम पेरणीपूर्वी मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा होती. परंतु पेरणीत मदत न मिळाल्याने त्यांनी कर्ज काढण्यासह घरातील दागिने गहाण ठेवून पेरणी केली. यावेळीही विम्याची रक्कम मिळाली नाही तर पुन्हा शेतकऱ्यांना सावकारी पाशात फसावे लागणार आहे हे मात्र निश्चित. यावर्षी केंद्र शासनाने नवीन पंतप्रधान पीक विमा योजना सुरू केली. त्यात वैयक्तिक स्तरावरही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची तरतूद करण्यात आली. मात्र पीक विमा योजनेच्या जाचक अटी नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाल्याचा पुरावा संबंधित शेतकऱ्यांना ४८ तासांच्या आत विमा कंपनी किंवा ज्या ठिकाणी विमा भरला त्या बँकेसह कृषी विभाग व महसूल विभागाला देणे आवश्यक आहे. त्यामुळे अडचण याच ठिकाणी शेतकऱ्यांची होणार आहे. प्रचलित पद्धतीनुसार विमा उतरवताना शेतकऱ्यांना शेतीचा आठ अ घेऊन कृषी सहायकाकडून अर्ज भरून घ्यावा लागतो तो तसाच्या तसा अर्ज राष्ट्रीयीकृत बँकेत जमा करावा लागतो यामुळे शेतकऱ्यांजवळ कुठलाच पुरावा राहत नाही. कृषी विभाग व महसूल विभागाकडेही पुरावा राहत नाही.