शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

मनुष्यबळाअभावी जिल्ह्यातील अग्निशमन विभाग वाऱ्यावर, प्रभारींच्या भरवशावर डोलारा, आग न लागलेलीच बरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:15 IST

रात्री 12 नंतरही अग्निशमन कार्यालय अलर्ट. लोगो- रिॲलिटी चेक अग्निशमन विभाग कार्यालय@1:00am अनिल कडू परतवाडा : मनुष्यबळाअभावी जिल्ह्यातील अग्निशमन ...

रात्री 12 नंतरही अग्निशमन कार्यालय अलर्ट.

लोगो- रिॲलिटी चेक

अग्निशमन विभाग कार्यालय@1:00am

अनिल कडू

परतवाडा : मनुष्यबळाअभावी जिल्ह्यातील अग्निशमन विभाग वाऱ्यावर असून प्रभारीवर डोलारा उभा आहे. प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची वानवा आहे. लीडिंग फायरमन आणि चालकांची पदे रिक्त आहेत. प्रशिक्षण घेतलेले मदतनीस अग्निशमन विभागाकडे उपलब्ध नाहीत. या मनुष्यबळाअभावी अचलपूर नगर परिषदेची फायर ब्रिगेड काही दिवसांपूर्वी अमरावतीमधील केमिकल फॅक्टरीला लागलेली आग आटोक्यात आणण्याकरिता पोहोचू शकली नव्हती.

जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींची संख्या बघता अचलपूर, धामणगाव रेल्वे आणि दर्यापूर नगर परिषदांकडेच अग्निशमन पर्यवेक्षक कार्यरत आहेत. या तिघांकडे उरलेल्या नगर परिषद व नगरपंचायतींचा अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आला आहे या अतिरिक्त प्रभारामुळे त्या-त्या नगरपालिका व नगरपंचायतींच्या अग्निशमन विभागाचे कार्य प्रभावित झाले आहे. ज्या ‘अ’ वर्ग नगर परिषदांची लोकसंख्या एक ते दोन लाख आहे, अशा ठिकाणी अग्निशमन अधिकाऱ्याचे पद मान्य आहे. पण, जिल्ह्यातील एकमेव ‘अ’ वर्ग नगर परिषद असलेल्या अचलपूरलाही अग्निशमन अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे.

लोकमत रियालिटी चेक अंतर्गत १२ सप्टेंबरला रात्री १२ नंतर अचलपूर नगर परिषदेतील अग्निशमन दलाला भेट दिली असता, हे कार्यालय अलर्ट होते. या ठिकाणी प्रभारी चालक राधेश्याम शर्मा आणि त्यांचे मदतनीस दीपक गणेशे व अशोक नघाटे कर्तव्यावर हजर होते. पण, एकही फायरमन कर्तव्यावर नव्हता.

तयार स्थितीत तीन बंब

अचलपूर नगर परिषदेच्या फायर स्टेशन मध्ये फायर ब्रिगेडचे तीन बंब तयार होते. सोबतीला एक जुनी फायर ब्रिगेडची गाडीही पाणी घेऊन उभी होती. पण, चालक मात्र एकच, तेही प्रभारी कर्तव्यावर हजर होते.

चालक अलर्ट:--

अचलपूर नगर परिषदेच्या फायर स्टेशनमध्ये तीन बंब तयार असले तरी केवळ एक चालक कर्तव्यावर होता. कर्तव्यावरील चालकासह कर्मचारी जागृत अवस्थेत उपस्थित होते.

*** सर्वच कर्मचारी जागे--

अचलपूर नगर पालिकेतील अग्निशमन दलाच्या कार्यालयात रात्रपाळीला एक चालक आणि दोन मदतनीस कर्तव्यावर हजर होते. यातील हे तीनही कर्मचारी जागे होते. एकमेकांशी गप्पा करीत रात्र जागून काढताना अनाहूत फायर कॉलकडेही त्यांचे कान टवकारले होते.

नियम काय सांगतो?

अग्निशमन ही अत्यावश्यक सेवा आहे. नगर परिषदेच्या लोकसंख्येनुसार अग्निशमन विभागातील पदसंख्या मान्य आहे. अग्निशमन विभागात कार्यरत कर्मचारी, अधिकारी, फायरमन, चालक, मदतनीस या सर्वांना आठवड्यातील सातही दिवस २४ तास सतर्क राहणे आवश्यक आहे. ३० हजार ते एक लाख लोकसंख्येच्या नगर परिषदेला अग्निशमन विभागास दिवस पाळीमध्ये पुरेसे आवश्यक कर्मचारी विहित केले आहेत. रात्रपाळीमध्ये नियंत्रण कक्षामध्ये दोन कर्मचारी देण्यात आले असून आगीची वर्दी मिळाल्यानंतर आवश्यक कर्मचारी वर्ग बोलवून आगीच्या ठिकाणी गाडी पाठवायची आहे.

१ ते २ लाख लोकसंख्येच्या नगरपरिषदेतील अग्निशमन विभागासाठी दिवसपाळी व रात्रपाळी विहित केलेली आहे. रात्रपाळीमध्ये आगीची वर्दी मिळाल्यानंतर कमीत कमी एक अग्निशमन गाडी पाठवावी. दुसरी गाडी पाठविणे आवश्यक असल्यास दिवसपाळीतील कर्मचाऱ्यांना बोलावून ती दुसरी गाडी पाठवावी.

** अग्निशमन विभागप्रमुखाचा कोट--

अग्निशमन विभागात मनुष्यबळाचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. मनुष्यबळ नसल्यामुळे या अत्यावश्यक सेवेत अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. असे असतानाही उपलब्ध मनुष्यबळाचा वापर करून फायर कॉल अटेंड केले जात आहेत.

- संदेश जोगदंड, अग्निशमन पर्यवेक्षक, नगर परिषद अचलपूर.

दिनांक13/09/21 फोटो