शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

मनुष्यबळाअभावी जिल्ह्यातील अग्निशमन विभाग वाऱ्यावर, प्रभारींच्या भरवशावर डोलारा, आग न लागलेलीच बरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:15 IST

रात्री 12 नंतरही अग्निशमन कार्यालय अलर्ट. लोगो- रिॲलिटी चेक अग्निशमन विभाग कार्यालय@1:00am अनिल कडू परतवाडा : मनुष्यबळाअभावी जिल्ह्यातील अग्निशमन ...

रात्री 12 नंतरही अग्निशमन कार्यालय अलर्ट.

लोगो- रिॲलिटी चेक

अग्निशमन विभाग कार्यालय@1:00am

अनिल कडू

परतवाडा : मनुष्यबळाअभावी जिल्ह्यातील अग्निशमन विभाग वाऱ्यावर असून प्रभारीवर डोलारा उभा आहे. प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची वानवा आहे. लीडिंग फायरमन आणि चालकांची पदे रिक्त आहेत. प्रशिक्षण घेतलेले मदतनीस अग्निशमन विभागाकडे उपलब्ध नाहीत. या मनुष्यबळाअभावी अचलपूर नगर परिषदेची फायर ब्रिगेड काही दिवसांपूर्वी अमरावतीमधील केमिकल फॅक्टरीला लागलेली आग आटोक्यात आणण्याकरिता पोहोचू शकली नव्हती.

जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींची संख्या बघता अचलपूर, धामणगाव रेल्वे आणि दर्यापूर नगर परिषदांकडेच अग्निशमन पर्यवेक्षक कार्यरत आहेत. या तिघांकडे उरलेल्या नगर परिषद व नगरपंचायतींचा अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आला आहे या अतिरिक्त प्रभारामुळे त्या-त्या नगरपालिका व नगरपंचायतींच्या अग्निशमन विभागाचे कार्य प्रभावित झाले आहे. ज्या ‘अ’ वर्ग नगर परिषदांची लोकसंख्या एक ते दोन लाख आहे, अशा ठिकाणी अग्निशमन अधिकाऱ्याचे पद मान्य आहे. पण, जिल्ह्यातील एकमेव ‘अ’ वर्ग नगर परिषद असलेल्या अचलपूरलाही अग्निशमन अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे.

लोकमत रियालिटी चेक अंतर्गत १२ सप्टेंबरला रात्री १२ नंतर अचलपूर नगर परिषदेतील अग्निशमन दलाला भेट दिली असता, हे कार्यालय अलर्ट होते. या ठिकाणी प्रभारी चालक राधेश्याम शर्मा आणि त्यांचे मदतनीस दीपक गणेशे व अशोक नघाटे कर्तव्यावर हजर होते. पण, एकही फायरमन कर्तव्यावर नव्हता.

तयार स्थितीत तीन बंब

अचलपूर नगर परिषदेच्या फायर स्टेशन मध्ये फायर ब्रिगेडचे तीन बंब तयार होते. सोबतीला एक जुनी फायर ब्रिगेडची गाडीही पाणी घेऊन उभी होती. पण, चालक मात्र एकच, तेही प्रभारी कर्तव्यावर हजर होते.

चालक अलर्ट:--

अचलपूर नगर परिषदेच्या फायर स्टेशनमध्ये तीन बंब तयार असले तरी केवळ एक चालक कर्तव्यावर होता. कर्तव्यावरील चालकासह कर्मचारी जागृत अवस्थेत उपस्थित होते.

*** सर्वच कर्मचारी जागे--

अचलपूर नगर पालिकेतील अग्निशमन दलाच्या कार्यालयात रात्रपाळीला एक चालक आणि दोन मदतनीस कर्तव्यावर हजर होते. यातील हे तीनही कर्मचारी जागे होते. एकमेकांशी गप्पा करीत रात्र जागून काढताना अनाहूत फायर कॉलकडेही त्यांचे कान टवकारले होते.

नियम काय सांगतो?

अग्निशमन ही अत्यावश्यक सेवा आहे. नगर परिषदेच्या लोकसंख्येनुसार अग्निशमन विभागातील पदसंख्या मान्य आहे. अग्निशमन विभागात कार्यरत कर्मचारी, अधिकारी, फायरमन, चालक, मदतनीस या सर्वांना आठवड्यातील सातही दिवस २४ तास सतर्क राहणे आवश्यक आहे. ३० हजार ते एक लाख लोकसंख्येच्या नगर परिषदेला अग्निशमन विभागास दिवस पाळीमध्ये पुरेसे आवश्यक कर्मचारी विहित केले आहेत. रात्रपाळीमध्ये नियंत्रण कक्षामध्ये दोन कर्मचारी देण्यात आले असून आगीची वर्दी मिळाल्यानंतर आवश्यक कर्मचारी वर्ग बोलवून आगीच्या ठिकाणी गाडी पाठवायची आहे.

१ ते २ लाख लोकसंख्येच्या नगरपरिषदेतील अग्निशमन विभागासाठी दिवसपाळी व रात्रपाळी विहित केलेली आहे. रात्रपाळीमध्ये आगीची वर्दी मिळाल्यानंतर कमीत कमी एक अग्निशमन गाडी पाठवावी. दुसरी गाडी पाठविणे आवश्यक असल्यास दिवसपाळीतील कर्मचाऱ्यांना बोलावून ती दुसरी गाडी पाठवावी.

** अग्निशमन विभागप्रमुखाचा कोट--

अग्निशमन विभागात मनुष्यबळाचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. मनुष्यबळ नसल्यामुळे या अत्यावश्यक सेवेत अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. असे असतानाही उपलब्ध मनुष्यबळाचा वापर करून फायर कॉल अटेंड केले जात आहेत.

- संदेश जोगदंड, अग्निशमन पर्यवेक्षक, नगर परिषद अचलपूर.

दिनांक13/09/21 फोटो