शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

अंदाजपत्रकाअभावी विहिरींचे काम रखडले

By admin | Updated: June 5, 2016 00:03 IST

सतत तीन वर्षांपासून अस्मानी संकटाने हवालदिल झालेल्या नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यावर अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचे सुल्तानी संकट ओढवले आहे.

शेतकरी संकटात : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून क्रूर थट्टानांदगाव खंडेश्वर : सतत तीन वर्षांपासून अस्मानी संकटाने हवालदिल झालेल्या नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यावर अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचे सुल्तानी संकट ओढवले आहे. विहिरीच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे. जिल्हा परिषदेचा जलसिंचन विभाग, बांधकाम विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अद्याप अंदाजपत्रक सादर न केल्याने ८६ विहिरींची कामे रखडली आहेत. ३० जूनपर्यंत ही कामे पूर्णत्वास जाणे अशक्य असल्याने शेतकऱ्यांचे विहिरीचे स्वप्न अधांतरी लटकले आहे. नोव्हेंबर २०१५ मध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत मंजूर झालेल्या ज्या विहिरींची कामे झाली नाही अशा विहिरींचे धडक सिंचन योजनेत वर्गीकरण करण्यात आलेत त्या विहिरींचे अंदाजपत्रक तयार करण्याची जबाबदारी जिल्हा परिषद जलसिंचन विभाग, बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पाटबंधारे विभागाकडे देण्यात आली. रोहयोमधून धडक सिंचनमध्ये वर्गीकरण करण्यात आलेल्या १३९ विहिरीपैकी ५३ विहिरींचे अंदाजपत्रक पाटबंधारे विभागाने सादर केले. परंतु उर्वरित ८६ विहिरींचे अंदाजपत्रक जिल्हा परिषद जलसिंचन विभाग, बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाने तहसीलदारांकडे सादर न केल्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरीच्या आशा धुसर झाल्या आहेत. एकीकडे पाटबंधारे विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या बाबतीत सतर्क असताना दुसरीकडे मात्र जि.प. व सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने शेतकऱ्यांची क्रूर थट्टा चालवल्या जात असल्याचे दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)अधिकारी शेतकऱ्यांशी उद्धट वागतातरखडलेल्या विहिरींबाबत जि. प. जलसिंचन विभागाचे उपअभियंता प्रदीप ढेरे यांचेशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता तुमचे काम माझ्याकडे नाही व माझे कुणीच वाकडे करू शकत नाही, अशी उद्धट वागणूक दिल्याचे सिलोडा येथील शेतकरी रवी डांगे व सुधीर सवटे यांनी सांगितले.धडक सिंचनमध्ये ४५ शेतकऱ्यांचा समावेशतालुक्यातील मोरगाव, मलकापूर, राजना, कोहळा जटेश्वर, नांदसावंगी, शिवणी (रसुलापूर), सार्सी, वाढोणा, कोदोरी, बोरगाव, चिखली, फुलआमला, चांदसुरा, अडगाव, सावनेर, जावरा, फुबगाव, वाघोडा, नांदगाव, सालोड, शेलू नटवा, पिंपळगाव, भगुरा, शिलोडा, पापळ, गावनेर, तळेगाव, सातरगाव, शिवरा, टाकळी गिलवा, दाभा, येणस, धानोरा, जळू, लोणी, मोखड, माहुली चोर, वाटपूर, खंडाळा, हरणी, वडूरा, पुसनेर, शहापूर इत्यादी गावातील शेतकऱ्यांचा धडक सिंचनाच्या विहीर योजनेत समावेश असून ४५ गावांतील शेतकऱ्यांना विहिरीचे काम होण्याची आशा लागली आहे. परंतु अधिकाऱ्यांच्या वक्रदृष्टीमुळे शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण होणार की नाही, ही शंकाच आहे.