शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

अंदाजपत्रकाअभावी विहिरींचे काम रखडले

By admin | Updated: June 5, 2016 00:03 IST

सतत तीन वर्षांपासून अस्मानी संकटाने हवालदिल झालेल्या नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यावर अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचे सुल्तानी संकट ओढवले आहे.

शेतकरी संकटात : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून क्रूर थट्टानांदगाव खंडेश्वर : सतत तीन वर्षांपासून अस्मानी संकटाने हवालदिल झालेल्या नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यावर अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचे सुल्तानी संकट ओढवले आहे. विहिरीच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे. जिल्हा परिषदेचा जलसिंचन विभाग, बांधकाम विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अद्याप अंदाजपत्रक सादर न केल्याने ८६ विहिरींची कामे रखडली आहेत. ३० जूनपर्यंत ही कामे पूर्णत्वास जाणे अशक्य असल्याने शेतकऱ्यांचे विहिरीचे स्वप्न अधांतरी लटकले आहे. नोव्हेंबर २०१५ मध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत मंजूर झालेल्या ज्या विहिरींची कामे झाली नाही अशा विहिरींचे धडक सिंचन योजनेत वर्गीकरण करण्यात आलेत त्या विहिरींचे अंदाजपत्रक तयार करण्याची जबाबदारी जिल्हा परिषद जलसिंचन विभाग, बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पाटबंधारे विभागाकडे देण्यात आली. रोहयोमधून धडक सिंचनमध्ये वर्गीकरण करण्यात आलेल्या १३९ विहिरीपैकी ५३ विहिरींचे अंदाजपत्रक पाटबंधारे विभागाने सादर केले. परंतु उर्वरित ८६ विहिरींचे अंदाजपत्रक जिल्हा परिषद जलसिंचन विभाग, बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाने तहसीलदारांकडे सादर न केल्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरीच्या आशा धुसर झाल्या आहेत. एकीकडे पाटबंधारे विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या बाबतीत सतर्क असताना दुसरीकडे मात्र जि.प. व सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने शेतकऱ्यांची क्रूर थट्टा चालवल्या जात असल्याचे दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)अधिकारी शेतकऱ्यांशी उद्धट वागतातरखडलेल्या विहिरींबाबत जि. प. जलसिंचन विभागाचे उपअभियंता प्रदीप ढेरे यांचेशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता तुमचे काम माझ्याकडे नाही व माझे कुणीच वाकडे करू शकत नाही, अशी उद्धट वागणूक दिल्याचे सिलोडा येथील शेतकरी रवी डांगे व सुधीर सवटे यांनी सांगितले.धडक सिंचनमध्ये ४५ शेतकऱ्यांचा समावेशतालुक्यातील मोरगाव, मलकापूर, राजना, कोहळा जटेश्वर, नांदसावंगी, शिवणी (रसुलापूर), सार्सी, वाढोणा, कोदोरी, बोरगाव, चिखली, फुलआमला, चांदसुरा, अडगाव, सावनेर, जावरा, फुबगाव, वाघोडा, नांदगाव, सालोड, शेलू नटवा, पिंपळगाव, भगुरा, शिलोडा, पापळ, गावनेर, तळेगाव, सातरगाव, शिवरा, टाकळी गिलवा, दाभा, येणस, धानोरा, जळू, लोणी, मोखड, माहुली चोर, वाटपूर, खंडाळा, हरणी, वडूरा, पुसनेर, शहापूर इत्यादी गावातील शेतकऱ्यांचा धडक सिंचनाच्या विहीर योजनेत समावेश असून ४५ गावांतील शेतकऱ्यांना विहिरीचे काम होण्याची आशा लागली आहे. परंतु अधिकाऱ्यांच्या वक्रदृष्टीमुळे शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण होणार की नाही, ही शंकाच आहे.