शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
2
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
3
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
4
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
5
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
6
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
7
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
8
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
9
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
10
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
11
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
12
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
13
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
14
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
15
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
16
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
17
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
18
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
19
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
20
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...

अंदाजपत्रकाअभावी विहिरींचे काम रखडले

By admin | Updated: June 5, 2016 00:03 IST

सतत तीन वर्षांपासून अस्मानी संकटाने हवालदिल झालेल्या नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यावर अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचे सुल्तानी संकट ओढवले आहे.

शेतकरी संकटात : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून क्रूर थट्टानांदगाव खंडेश्वर : सतत तीन वर्षांपासून अस्मानी संकटाने हवालदिल झालेल्या नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यावर अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचे सुल्तानी संकट ओढवले आहे. विहिरीच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे. जिल्हा परिषदेचा जलसिंचन विभाग, बांधकाम विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अद्याप अंदाजपत्रक सादर न केल्याने ८६ विहिरींची कामे रखडली आहेत. ३० जूनपर्यंत ही कामे पूर्णत्वास जाणे अशक्य असल्याने शेतकऱ्यांचे विहिरीचे स्वप्न अधांतरी लटकले आहे. नोव्हेंबर २०१५ मध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत मंजूर झालेल्या ज्या विहिरींची कामे झाली नाही अशा विहिरींचे धडक सिंचन योजनेत वर्गीकरण करण्यात आलेत त्या विहिरींचे अंदाजपत्रक तयार करण्याची जबाबदारी जिल्हा परिषद जलसिंचन विभाग, बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पाटबंधारे विभागाकडे देण्यात आली. रोहयोमधून धडक सिंचनमध्ये वर्गीकरण करण्यात आलेल्या १३९ विहिरीपैकी ५३ विहिरींचे अंदाजपत्रक पाटबंधारे विभागाने सादर केले. परंतु उर्वरित ८६ विहिरींचे अंदाजपत्रक जिल्हा परिषद जलसिंचन विभाग, बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाने तहसीलदारांकडे सादर न केल्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरीच्या आशा धुसर झाल्या आहेत. एकीकडे पाटबंधारे विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या बाबतीत सतर्क असताना दुसरीकडे मात्र जि.प. व सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने शेतकऱ्यांची क्रूर थट्टा चालवल्या जात असल्याचे दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)अधिकारी शेतकऱ्यांशी उद्धट वागतातरखडलेल्या विहिरींबाबत जि. प. जलसिंचन विभागाचे उपअभियंता प्रदीप ढेरे यांचेशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता तुमचे काम माझ्याकडे नाही व माझे कुणीच वाकडे करू शकत नाही, अशी उद्धट वागणूक दिल्याचे सिलोडा येथील शेतकरी रवी डांगे व सुधीर सवटे यांनी सांगितले.धडक सिंचनमध्ये ४५ शेतकऱ्यांचा समावेशतालुक्यातील मोरगाव, मलकापूर, राजना, कोहळा जटेश्वर, नांदसावंगी, शिवणी (रसुलापूर), सार्सी, वाढोणा, कोदोरी, बोरगाव, चिखली, फुलआमला, चांदसुरा, अडगाव, सावनेर, जावरा, फुबगाव, वाघोडा, नांदगाव, सालोड, शेलू नटवा, पिंपळगाव, भगुरा, शिलोडा, पापळ, गावनेर, तळेगाव, सातरगाव, शिवरा, टाकळी गिलवा, दाभा, येणस, धानोरा, जळू, लोणी, मोखड, माहुली चोर, वाटपूर, खंडाळा, हरणी, वडूरा, पुसनेर, शहापूर इत्यादी गावातील शेतकऱ्यांचा धडक सिंचनाच्या विहीर योजनेत समावेश असून ४५ गावांतील शेतकऱ्यांना विहिरीचे काम होण्याची आशा लागली आहे. परंतु अधिकाऱ्यांच्या वक्रदृष्टीमुळे शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण होणार की नाही, ही शंकाच आहे.