शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

इच्छुकांच्या लगीनघाईने पालिकेचा मांडव गजबजला

By admin | Updated: October 25, 2016 00:06 IST

निवडणुकीची घोषणा होताच सर्वत्र राजकीय मातब्बरांसह इच्छुकांची लगीनघाई सुरू झाली आहे.

जिल्हाभरात पालिकांना यात्रेचे स्वरुप : हवशा, नवशा, गवशांची चंगळ अमरावती : निवडणुकीची घोषणा होताच सर्वत्र राजकीय मातब्बरांसह इच्छुकांची लगीनघाई सुरू झाली आहे. कट्टयांवर निवडणुकीच्याच चर्चा रंगत आहेत. निवडणुकीच्या लगीनघाईमुळे ओस पडलेले जिल्हाभरातील पालिकेचे मांडव गजबजू लागले आहेत. यामुळे पालिकांना जत्रेचे स्वरूप आले असून प्रत्येकजण आपापले गणित जुळवून लॉबिंग करीत असल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे. निवडणूक आयोगाने राज्यातील १९२ नगरपालिका व २० नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. चार टप्प्यांमध्ये होणाऱ्या या निवडणुकीत जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांचे मतदान २७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यामुळे मागील दोन महिन्यांपासून चोरी-चोरी चुपके-चुपके सुरू असलेले लॉबिंग आता उघडपणे दिसू लागले आहे. पालिका निवडणूक म्हणजे राजकीय क्षेत्रातील प्रवेशाचे पहिले पाऊल समजले जाते. यामध्ये आपापल्या भागात असणारे वजन तसेच नेतेगिरी यातून दाखवून देता येते. पालिका निवडणुकीत एक-एक मत मोलाचे असल्याने गल्लीबोळातील कार्यकर्त्यांनाही सुगीचे दिवस येतात. त्यातच यावेळी नगरसेवकांबरोबरच नगराध्यक्षपदासाठीही थेट जनतेतून मतदान होणार असल्याने हवसे, नवसे गवस्यांची चांगलीच चंगळ होणार होणार असल्याचे दिसून येत आहे. यामुळे पांढऱ्या कपड्यांची मागणी वाढली असून चौकाचौकात राजकीय समीकरणा बाबतच्या चर्चा रंगत आहेत. त्याचबरोबर इच्छुकांकडूनही गणित जुळविणे सुरू असून सर्वत्र पालिका निवडणुकीचीच रणधुमाळी दिसून येत आहे. (प्रतिनिधी)इच्छुकांची पालिकेत वर्दळनगर पालिका क्षेत्रात वर्दळ वाढली आहे. निवडणुकीत आपणही कसे शर्यतीत आहोत, हेच दाखविण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करीत आहे. अनेक इच्छुकांनी निवडणुकीत अडचण नको म्हणून पालिकेची घरपट्टी, नळपट्टी व इतर काही देणे असेल तर ते भरण्याच्या अनुषंगाने विचारपूस सुरू केली आहे. एकंदरीत पालिकेचा मांडव इच्छुकांच्या लगीनघाईने गजबजू लागल्याचे दिसत आहे. लवकरच या निवडणुकीला रंगत येईल. नामांकन प्रक्रियेला सुरूवात झाली असली तरी खरी रंगत यापुढेच येणार आहे. मतदारांच्या गाठीभेटी वाढल्यापालिकेच्या मागील पंचवार्षिक योजनेचा आढावा घेतल्यास प्रत्येक पालिकेत बोटावर मोजण्याइतपतच नगरसेवकांनी जनतेच्या प्रश्नांवर तोंड उघडले. यातील बहुतांश लोक पुन्हा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. मतदारांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. इच्छुक मतदारांच्या गल्लोगल्ली जाऊन भेटी घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करीत आहेत.