शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुकांच्या लगीनघाईने पालिकेचा मांडव गजबजला

By admin | Updated: October 25, 2016 00:06 IST

निवडणुकीची घोषणा होताच सर्वत्र राजकीय मातब्बरांसह इच्छुकांची लगीनघाई सुरू झाली आहे.

जिल्हाभरात पालिकांना यात्रेचे स्वरुप : हवशा, नवशा, गवशांची चंगळ अमरावती : निवडणुकीची घोषणा होताच सर्वत्र राजकीय मातब्बरांसह इच्छुकांची लगीनघाई सुरू झाली आहे. कट्टयांवर निवडणुकीच्याच चर्चा रंगत आहेत. निवडणुकीच्या लगीनघाईमुळे ओस पडलेले जिल्हाभरातील पालिकेचे मांडव गजबजू लागले आहेत. यामुळे पालिकांना जत्रेचे स्वरूप आले असून प्रत्येकजण आपापले गणित जुळवून लॉबिंग करीत असल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे. निवडणूक आयोगाने राज्यातील १९२ नगरपालिका व २० नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. चार टप्प्यांमध्ये होणाऱ्या या निवडणुकीत जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांचे मतदान २७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यामुळे मागील दोन महिन्यांपासून चोरी-चोरी चुपके-चुपके सुरू असलेले लॉबिंग आता उघडपणे दिसू लागले आहे. पालिका निवडणूक म्हणजे राजकीय क्षेत्रातील प्रवेशाचे पहिले पाऊल समजले जाते. यामध्ये आपापल्या भागात असणारे वजन तसेच नेतेगिरी यातून दाखवून देता येते. पालिका निवडणुकीत एक-एक मत मोलाचे असल्याने गल्लीबोळातील कार्यकर्त्यांनाही सुगीचे दिवस येतात. त्यातच यावेळी नगरसेवकांबरोबरच नगराध्यक्षपदासाठीही थेट जनतेतून मतदान होणार असल्याने हवसे, नवसे गवस्यांची चांगलीच चंगळ होणार होणार असल्याचे दिसून येत आहे. यामुळे पांढऱ्या कपड्यांची मागणी वाढली असून चौकाचौकात राजकीय समीकरणा बाबतच्या चर्चा रंगत आहेत. त्याचबरोबर इच्छुकांकडूनही गणित जुळविणे सुरू असून सर्वत्र पालिका निवडणुकीचीच रणधुमाळी दिसून येत आहे. (प्रतिनिधी)इच्छुकांची पालिकेत वर्दळनगर पालिका क्षेत्रात वर्दळ वाढली आहे. निवडणुकीत आपणही कसे शर्यतीत आहोत, हेच दाखविण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करीत आहे. अनेक इच्छुकांनी निवडणुकीत अडचण नको म्हणून पालिकेची घरपट्टी, नळपट्टी व इतर काही देणे असेल तर ते भरण्याच्या अनुषंगाने विचारपूस सुरू केली आहे. एकंदरीत पालिकेचा मांडव इच्छुकांच्या लगीनघाईने गजबजू लागल्याचे दिसत आहे. लवकरच या निवडणुकीला रंगत येईल. नामांकन प्रक्रियेला सुरूवात झाली असली तरी खरी रंगत यापुढेच येणार आहे. मतदारांच्या गाठीभेटी वाढल्यापालिकेच्या मागील पंचवार्षिक योजनेचा आढावा घेतल्यास प्रत्येक पालिकेत बोटावर मोजण्याइतपतच नगरसेवकांनी जनतेच्या प्रश्नांवर तोंड उघडले. यातील बहुतांश लोक पुन्हा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. मतदारांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. इच्छुक मतदारांच्या गल्लोगल्ली जाऊन भेटी घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करीत आहेत.