शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

ग्रामसेवकांच्या संपामुळे गावगाड्याचा कारभार ठप्प

By admin | Updated: July 17, 2014 23:51 IST

मागील पंधरा दिवसांपासून ग्रामसेवकांनी संप पुकारला आहे. परिणामी ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीअंतर्गत येणारा गावगाड्याचा कारभार पूर्णत: ठप्प झाला आहे. ग्रामीण भागातील सर्व सामान्यांची

चांदूरबाजार : मागील पंधरा दिवसांपासून ग्रामसेवकांनी संप पुकारला आहे. परिणामी ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीअंतर्गत येणारा गावगाड्याचा कारभार पूर्णत: ठप्प झाला आहे. ग्रामीण भागातील सर्व सामान्यांची गैरसोय टाळण्यासाठी शासनाने ग्रामसेवकांच्या मागण्यांबाबत त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनकडून होत आहे. ग्रामसेवकांच्या संपामुळे तालुक्यातील ६० ग्रामपंंचायतींचे कामकाज मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहे. यात रोजगार हमी योजना अनुसूचित जाती वस्ती सुधार योजना, बीआरजीएफ योजना, शौचालय बांधकाम तेरावा वित्त आयोग योजना, वृक्षलागवड योजना, पाणीपुरवठा, विद्यार्थ्यांना लागणारे विविध दाखले यांच्यासह इतर सर्वच कामकाज ठप्प झाल्यामुळे गावगाड्याच्या विकासाचे नियोजन पूर्णत: कोलमडले आहे.२ जुलैपासून ग्रामसेवकांनी आपल्या मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामाकरिता लागणारे जन्म तारखेचा दाखला, रहिवासी दाखला, दारिद्रय रेषेखालील दाखला मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील पालकांची फारच ओढाताण होत आहे. तसेच ग्रामपंचायतीअंतर्गत येणारी दिवाबत्ती, सार्वजनिक आरोग्य सेवा, पाणीपुरवठा आदी नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा विस्कळीत झाल्या आहेत. निर्मल भारत अभियानअंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणारी अनुदानाची वाटपेही रखडली आहे. त्यामुळे शौचालयांची कामेही ठप्प पडली आहेत. त्याचप्रमाणे घरकुलाची देयके ही प्रलंबित आहेत. वृक्ष लागवडीची प्राथमिक स्वरुपाची कामे, केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणीही थांबली आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुरांची मजुरी व कुशल कामगारांची देयके मिळत नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोेष निर्माण झाला आहे.आधीच तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतींचा कारभार ४४ ग्रामसेवक पाहत आहेत. यात पाच ग्रामसेवक कंत्राटी असून ३९ ग्रामसेवक नियमित आहेत. यात ग्राम विकास अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. ग्रामसेवकांची संख्या कमी असल्यामुळे काही ग्रामसेवकांकडे २ ते ३ ग्रामपंचायतीचा कारभार एकाच ग्रामसेवकाकडे आहे. त्यामुळे रेंगाळलेला ग्रामपंचायतींचा कारभार या संपामुळे ढेपाळलेला आहे. यावर येत्या २ ते ३ दिवसांत यशस्वी तोडगा न निघाल्यास ग्रामीण नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या रोषाचे परिवर्तन उद्रेकात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)