शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

ग्रामसेवकांच्या संपामुळे गावगाड्याचा कारभार ठप्प

By admin | Updated: July 17, 2014 23:51 IST

मागील पंधरा दिवसांपासून ग्रामसेवकांनी संप पुकारला आहे. परिणामी ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीअंतर्गत येणारा गावगाड्याचा कारभार पूर्णत: ठप्प झाला आहे. ग्रामीण भागातील सर्व सामान्यांची

चांदूरबाजार : मागील पंधरा दिवसांपासून ग्रामसेवकांनी संप पुकारला आहे. परिणामी ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीअंतर्गत येणारा गावगाड्याचा कारभार पूर्णत: ठप्प झाला आहे. ग्रामीण भागातील सर्व सामान्यांची गैरसोय टाळण्यासाठी शासनाने ग्रामसेवकांच्या मागण्यांबाबत त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनकडून होत आहे. ग्रामसेवकांच्या संपामुळे तालुक्यातील ६० ग्रामपंंचायतींचे कामकाज मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहे. यात रोजगार हमी योजना अनुसूचित जाती वस्ती सुधार योजना, बीआरजीएफ योजना, शौचालय बांधकाम तेरावा वित्त आयोग योजना, वृक्षलागवड योजना, पाणीपुरवठा, विद्यार्थ्यांना लागणारे विविध दाखले यांच्यासह इतर सर्वच कामकाज ठप्प झाल्यामुळे गावगाड्याच्या विकासाचे नियोजन पूर्णत: कोलमडले आहे.२ जुलैपासून ग्रामसेवकांनी आपल्या मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामाकरिता लागणारे जन्म तारखेचा दाखला, रहिवासी दाखला, दारिद्रय रेषेखालील दाखला मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील पालकांची फारच ओढाताण होत आहे. तसेच ग्रामपंचायतीअंतर्गत येणारी दिवाबत्ती, सार्वजनिक आरोग्य सेवा, पाणीपुरवठा आदी नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा विस्कळीत झाल्या आहेत. निर्मल भारत अभियानअंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणारी अनुदानाची वाटपेही रखडली आहे. त्यामुळे शौचालयांची कामेही ठप्प पडली आहेत. त्याचप्रमाणे घरकुलाची देयके ही प्रलंबित आहेत. वृक्ष लागवडीची प्राथमिक स्वरुपाची कामे, केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणीही थांबली आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुरांची मजुरी व कुशल कामगारांची देयके मिळत नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोेष निर्माण झाला आहे.आधीच तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतींचा कारभार ४४ ग्रामसेवक पाहत आहेत. यात पाच ग्रामसेवक कंत्राटी असून ३९ ग्रामसेवक नियमित आहेत. यात ग्राम विकास अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. ग्रामसेवकांची संख्या कमी असल्यामुळे काही ग्रामसेवकांकडे २ ते ३ ग्रामपंचायतीचा कारभार एकाच ग्रामसेवकाकडे आहे. त्यामुळे रेंगाळलेला ग्रामपंचायतींचा कारभार या संपामुळे ढेपाळलेला आहे. यावर येत्या २ ते ३ दिवसांत यशस्वी तोडगा न निघाल्यास ग्रामीण नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या रोषाचे परिवर्तन उद्रेकात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)