शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
2
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
3
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
4
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ
5
समस्त बॉलिवूड हादरले! पैशांची तंगी होती, हा अभिनेता बनला ड्रग स्मगलर; ४० कोटींच्या ड्रगसह पकडले तेव्हा बिंग फुटले...
6
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
7
८ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! RBI च्या घोषणेनंतर बाजारात जोरदार उसळी! टॉप गेनर्स-लूजर्स पाहा
8
भारतावर टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पवर काय वेळ आली, कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत; शटडाऊनची नामुष्की
9
जिंकलंस मित्रा! कॉन्स्टेबलने IPS बनून घेतला अपमानाचा बदला; बॅक टू बॅक क्रॅक केली UPSC
10
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
11
मोठ्या पडद्यावर फ्लॉप पण बिझनेसमध्ये केली कमाल, चालवतोय १०००० कोटींची कंपनी; कमाईच्या बाबतीत अनेकांना टाकलं मागे
12
ट्रम्पसमोर नेतन्याहूंनी फोनवर कुणाची माफी मागितली? इस्रायल-गाझा युद्ध थांबवण्यात महत्वाची भूमिका
13
अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदाच सामील झाला शाहरुख खान, पाहा किती झाली संपत्ती?
14
सारा तेंडुलकर जेव्हा पापाराझी समोर मराठीत बोलते...; Viral Video पाहून नेटकरीही पडले प्रेमात
15
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
16
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
18
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
19
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
20
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर

शेतकऱ्यांमागे दुष्काळाची साडेसाती

By admin | Updated: December 9, 2015 00:26 IST

शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आर्थिकदृष्ट्या शेतकरी जर्जर झाला आहे. शेतकऱ्यांची स्थितीचा मागील सहा वर्षांचा....

सुमित हरकुट चांदूरबाजारशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आर्थिकदृष्ट्या शेतकरी जर्जर झाला आहे. शेतकऱ्यांची स्थितीचा मागील सहा वर्षांचा मागोवा घेतला असता एक वर्षाचा अपवाद वगळता पाच वर्षे शेतकरी दुष्काळात होरपळत असल्याचे स्पष्ट होते. २०१०-१० ते २०११-१६ या सहा वर्षाच्या कालावधीत फक्त २०१२-१३ वर्ष वगळला असता इतर सर्व वर्षे शेतकऱ्यांना सातत्याने दुष्काळाचा सामना करावा लागला आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या मागे साडेसाती लागल्याचे जाणवते. ५० पैशांच्या आत पैसेवारी असल्यास शासनाकडून दुष्काळसदृष्य स्थिती जाहीर केली जाते. या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना नाममात्र सवलती दिल्या जातात. नैसर्गिक आपत्तीच्या नावाखाली किरकोळ मदत दिल्या जाते. या मदतीवर शेतकऱ्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण झाले आहे. त्याचसोबत इतर जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांच्या जीवाची घालमेल होते. हा दुष्काळरुपी साडेसातीसह सरकाररुपी राहूचा कोपच म्हणावा लागेल. खरिपातील सोयाबीन, कपाशी, तूर व ज्वारी तर रबीतील गहू, हरभरा ही प्रमुख पिके आहेत. जिल्ह्यातील पर्जन्यमानाची सरासरी ८१५ किलोमीटर एवढी असतांना पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना वर्षानुवर्ष दुष्काळाचा फटका सहन करावा लागत आहे. खरिपातील पिकांना आवश्यक वेळी पाऊस न आल्याने सतत शेतकऱ्यांना फटका बसत आहे. मागील ३-४ रबी हंगाम अवेळी पाऊस व गारपीटीने धुतला गेला आहे. यावर्षीचा रबी हंगाम अति उष्णतामानामुळे हातून गेल्यातच जमा आहे. या सततच्या नैसर्गिक आपत्तींना व शासनाचा शेतकरी विरोधी धोरणांना शेतकरी आता पुरता कंटाळलेला आहे. जिल्ह्यात खरीपाचे सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख १५ हजार तर रब्बीचे १ लाख ८७ हजार हेक्टर इतके आहे. यापैकी अंदाजे २ लाख हेक्टर जमीन हलकी व उथळ आहे. २.१९ लाख हेक्टर जमीन मध्यम तर ३.७५ लाख हेक्टर जमीन भारी स्वरुपाची आहे. यापैकी १३ टक्के म्हणजे १ लाख ६० हजार हेक्टर इतके क्षेत्र खारपाणपट्ट्यातील आहे. नैसर्गिक व भौगोलिक स्थितीचा एकंदरीत स्थितीचा विचार करता खरीपच हा शेतकऱ्यांचा मुख्य व महत्वाचा हंगाम आहे. जिल्ह्यात ४ लाख ५३३ हजार ९७४ इतकी शेतकरी संख्या असून यापैकी अल्पभूधारक ४१ टक्के व ३४ टक्के अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत. त्यासोबत शेतकरी संख्येच्या चौपट कुटुंबे फक्त शेतमजुरीवरच आपला उदरनिर्वाह करतात. त्यानुसार अंदाजे १८ लाख कुटुंब जिल्हाभरातून फक्त शेतीवरच जगतात. ही स्थिती फक्त अमरावती जिल्ह्याची आहे.