शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

क्यूरिंगअभावी महामार्गाची कामे धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 22:26 IST

पावसाळा तोंडावर आला असून तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाचे काम जोरात सुरू आहे. त्यात पिवळ्या मातीचे खनन करता येणार नाही, तसेच रस्त्यावर टाकलेल्या मातीवर पाऊस पडल्यास अपघातात वाढ होईल. त्यामुळे कंत्राटदारातर्फे काँक्रिट रस्त्यावर (क्यूरिंग)पाणी न टाकताच रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. तयार झालेला काँक्रिट रास्ता निकृष्ट दर्जाचा बनत आहे.

ठळक मुद्देकंत्राटदाराची मनमानी : पाणी टँकर वाढविण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कचांदुर बाजार : पावसाळा तोंडावर आला असून तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाचे काम जोरात सुरू आहे. त्यात पिवळ्या मातीचे खनन करता येणार नाही, तसेच रस्त्यावर टाकलेल्या मातीवर पाऊस पडल्यास अपघातात वाढ होईल. त्यामुळे कंत्राटदारातर्फे काँक्रिट रस्त्यावर (क्यूरिंग)पाणी न टाकताच रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. तयार झालेला काँक्रिट रास्ता निकृष्ट दर्जाचा बनत आहे.परतवाडा ते मोर्शी मार्गावर सुरू असलेल्या चांदूर बाजार भागातील राष्ट्रीय महामार्गाच्या कंत्राट एच. जी. इन्फ्रा कंपनीने घेतला आहे. कंत्रातदारातर्फे प्रचंड खनन करून परिसरातील पिवळी माती रास्ता बांधकामत वापरण्यात येत आहे. मात्र, या मातीच्या नागरिकांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत असताना कंत्रातदारातर्फे घाईने काँक्रीटचा मलमा चढविण्यात येत आहे. या रस्त्यावर पाणीचे क्यूरिंग केले जात नासल्याने हे काँक्रिट कच्चे राहिले आहे. या निकृष्ट काँक्रिट रस्त्यावरून कोणीही वाहतूक करू नये, याकरिता रस्त्यावर काटेरी झाडे टाकण्यात आले आहे. या महामार्गाचे काँक्रिटचा पहिलाच थर निकृष्ट झाला आहे. याकडे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. चांदूर बाजार ते परतवाडा मार्गावरील बांधकामात फक्त ३ पाण्याचे टँकर सुरू असून, केवळ रस्त्यावरील पिवळी माती उडू नये या करिता वापरले जात आहे. या करिता शेतकऱ्याचा शेतातील पाणी बोअरवेलने घेऊन टँकरच्या मदतीने मातीवर पाणी टाकले जात आहे. त्यामुळे केवळ मातीवर पाणी मारल्याने हा काँक्रिट रस्ता दर्जेदार कसा बनणार, असा प्रश्न रस्त्यावरून वाहतूक करणारे नागरिकांतर्फे केला जात आहे.काँक्रिट रस्त्याची पोत टिकविण्यासाठी त्या काँक्रिट रस्त्यावर पाणी टाकणे आवश्यक आहे. मात्र, कंत्राटदाराचा मनमानी कारभार व राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या हेतुपुरस्सर दुर्लक्षामुळे शासनाच्या पैशाची उधळपट्टी होत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांतर्फे होत आहे. राजकीय वरदहस्त असलेल्या एच.जी. इन्फ्रा या कंत्राटदार कंपनीचे शासकीय अधिकाºयांशी साटेलोटे असल्याने कंत्राटदार व त्यांचे कर्मचारी आपला कारभार चालवीत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांतर्फे करण्यात येत आहे.