शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चौफेर नाकाबंदीमुळे शेतकऱ्यांचा संप उग्र

By admin | Updated: June 11, 2017 00:02 IST

देशातील सत्ताधिशांनी शेतकऱ्यांची चौफेर नाकाबंदी केली आहे. सरकार बदलले. मात्र, शेतकऱ्यांची स्थिती तशीच विदारक राहिली.

बच्चू कडू : मुख्यमंत्री वायफळ बोलत असल्याची टीका लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : देशातील सत्ताधिशांनी शेतकऱ्यांची चौफेर नाकाबंदी केली आहे. सरकार बदलले. मात्र, शेतकऱ्यांची स्थिती तशीच विदारक राहिली. त्या असंतोषातून शेतकऱ्यांनी स्वयंस्फुर्तीने आंदोलन पुकारले आहे. शासनाने रविवारी तोडगा न काढल्यास १२ आणि १३ जूनचे आंदोलन अधिक उग्र स्वरुपाचे असेल, असा इशारा आ. बच्चू कडू यांनी दिला. मुख्यमंत्री वायफळ बोलत असल्याची टीका त्यांनी केली. न भूतो न भविष्यती संपअमरावती : पक्ष कार्यकर्ते शेतकरी नाहीत का? असा सवाल आ. बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून केला.शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर आ.बच्चू कडू यांनी शनिवारी शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. एका गावातून सुरू झालेले आंदोलन राज्यातच नव्हे, तर देशात पसरते, ही भूतो न भविष्यती’ अशी बाब असल्याचे सांगत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नेत्याची गरज नसल्याचे या आंदोलनाने दाखवून दिल्याचे ते म्हणाले. काँग्रेसच्या काळातही आंदोलने झालीत. मात्र शेतकऱ्यांवर दरोड्याचे गुन्हे दाखल करणारे भाजप सरकार असू शकते, हे या सत्ताधिशांनी दर्शवून दिल्याचे ते म्हणाले. हे शेतकऱ्यांचे आंदोलन नसून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाड्याने आणलेल्या लोकांचे असल्याचे वक्तव्य करणारे मुख्यमंत्री वायफळ असल्याची टीका त्यांनी केली. इंग्रज सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भगतसिंगांनी आवाज करणारा बॉम्ब फोडला होता. आताचे सत्ताधीशही बहिरे असल्याने त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचविण्यासाठी आपण बॉम्ब फेकण्याची भाषा वापरली असल्याचे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांसाठी माझ्यासारखा एखादा आमदार शहीद झाला, तर काहीच बिघडणार नाही. आंदोलनकर्त्यांवर दरोड्याचे गुन्हे दाखल करून त्यांना नामशेष करण्याचा प्रयत्न भाजप सरकारने चालविल्याचा आरोप त्यांनी केला. १२ व १३ जूनचे आंदोलन अतिशय उग्र राहील. त्यात समस्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आग्रही आवाहन आ.बच्चू कडू यांनी केले. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी हाती घेतलेले हे आंदोलन असून नेत्यांविना सुरू असलेले हे आंदोलन न भूतो न भविष्यती असल्याचे ते म्हणाले.- तर त्यांनी तारीख सांगावीबच्चू कडू मारायला आणि मरायला भीत नाही. ज्यांना कुणाला मला मारायचे असेल तर त्यांनी तारीख सांगावी, अमरावतीच्या जयस्तंभ चौकात मी एकटाच येईल. शेतकऱ्यांसाठी मला हाणलेली चपराक माझ्यासाठी गौरवास्पद असेल, असेही त्यांनी सप्ष्ट केले. यू-टर्न घेणाऱ्यांमधला बच्चू नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला.आयएएसना द्याव्यात गाई म्हशी शेतकऱ्यांना जोडधंदा करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र दुग्ध व्यवसायही कमालीचा बेभरवशाचा झाला आहे. त्यामुळे सातवा वेतन आयोग लागू करण्यापेक्षा त्यांनाही म्हशी आणि बकऱ्या द्यव्यात आणि त्यांच्या वेतनातील ती तफावतीची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी, असे मत त्यांनी मांडले.भाजप कपटी, आतल्या गाठीचेभाजपवाले कपटी आहेत. ते अणुबॉम्ब टाकून भडकून टाकतील तरीही माहित होणार नाही,असा टोला आ.बच्चू कडू यांनी दिला. सध्या भाजपवालेच केवळ शेतकरी आहेत. त्यांना वगळून साऱ्यांना ते गुंडच समजतात. त्यामुळे आता आम्ही शेतकरी की दहशतवादी हे जाणून घेण्यासाठी आता डीएनए चाचणी करावी काय? असा प्रश्न कडू यांनी उपस्थित केला.