शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

चौफेर नाकाबंदीमुळे शेतकऱ्यांचा संप उग्र

By admin | Updated: June 11, 2017 00:02 IST

देशातील सत्ताधिशांनी शेतकऱ्यांची चौफेर नाकाबंदी केली आहे. सरकार बदलले. मात्र, शेतकऱ्यांची स्थिती तशीच विदारक राहिली.

बच्चू कडू : मुख्यमंत्री वायफळ बोलत असल्याची टीका लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : देशातील सत्ताधिशांनी शेतकऱ्यांची चौफेर नाकाबंदी केली आहे. सरकार बदलले. मात्र, शेतकऱ्यांची स्थिती तशीच विदारक राहिली. त्या असंतोषातून शेतकऱ्यांनी स्वयंस्फुर्तीने आंदोलन पुकारले आहे. शासनाने रविवारी तोडगा न काढल्यास १२ आणि १३ जूनचे आंदोलन अधिक उग्र स्वरुपाचे असेल, असा इशारा आ. बच्चू कडू यांनी दिला. मुख्यमंत्री वायफळ बोलत असल्याची टीका त्यांनी केली. न भूतो न भविष्यती संपअमरावती : पक्ष कार्यकर्ते शेतकरी नाहीत का? असा सवाल आ. बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून केला.शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर आ.बच्चू कडू यांनी शनिवारी शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. एका गावातून सुरू झालेले आंदोलन राज्यातच नव्हे, तर देशात पसरते, ही भूतो न भविष्यती’ अशी बाब असल्याचे सांगत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नेत्याची गरज नसल्याचे या आंदोलनाने दाखवून दिल्याचे ते म्हणाले. काँग्रेसच्या काळातही आंदोलने झालीत. मात्र शेतकऱ्यांवर दरोड्याचे गुन्हे दाखल करणारे भाजप सरकार असू शकते, हे या सत्ताधिशांनी दर्शवून दिल्याचे ते म्हणाले. हे शेतकऱ्यांचे आंदोलन नसून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाड्याने आणलेल्या लोकांचे असल्याचे वक्तव्य करणारे मुख्यमंत्री वायफळ असल्याची टीका त्यांनी केली. इंग्रज सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भगतसिंगांनी आवाज करणारा बॉम्ब फोडला होता. आताचे सत्ताधीशही बहिरे असल्याने त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचविण्यासाठी आपण बॉम्ब फेकण्याची भाषा वापरली असल्याचे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांसाठी माझ्यासारखा एखादा आमदार शहीद झाला, तर काहीच बिघडणार नाही. आंदोलनकर्त्यांवर दरोड्याचे गुन्हे दाखल करून त्यांना नामशेष करण्याचा प्रयत्न भाजप सरकारने चालविल्याचा आरोप त्यांनी केला. १२ व १३ जूनचे आंदोलन अतिशय उग्र राहील. त्यात समस्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आग्रही आवाहन आ.बच्चू कडू यांनी केले. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी हाती घेतलेले हे आंदोलन असून नेत्यांविना सुरू असलेले हे आंदोलन न भूतो न भविष्यती असल्याचे ते म्हणाले.- तर त्यांनी तारीख सांगावीबच्चू कडू मारायला आणि मरायला भीत नाही. ज्यांना कुणाला मला मारायचे असेल तर त्यांनी तारीख सांगावी, अमरावतीच्या जयस्तंभ चौकात मी एकटाच येईल. शेतकऱ्यांसाठी मला हाणलेली चपराक माझ्यासाठी गौरवास्पद असेल, असेही त्यांनी सप्ष्ट केले. यू-टर्न घेणाऱ्यांमधला बच्चू नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला.आयएएसना द्याव्यात गाई म्हशी शेतकऱ्यांना जोडधंदा करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र दुग्ध व्यवसायही कमालीचा बेभरवशाचा झाला आहे. त्यामुळे सातवा वेतन आयोग लागू करण्यापेक्षा त्यांनाही म्हशी आणि बकऱ्या द्यव्यात आणि त्यांच्या वेतनातील ती तफावतीची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी, असे मत त्यांनी मांडले.भाजप कपटी, आतल्या गाठीचेभाजपवाले कपटी आहेत. ते अणुबॉम्ब टाकून भडकून टाकतील तरीही माहित होणार नाही,असा टोला आ.बच्चू कडू यांनी दिला. सध्या भाजपवालेच केवळ शेतकरी आहेत. त्यांना वगळून साऱ्यांना ते गुंडच समजतात. त्यामुळे आता आम्ही शेतकरी की दहशतवादी हे जाणून घेण्यासाठी आता डीएनए चाचणी करावी काय? असा प्रश्न कडू यांनी उपस्थित केला.