शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

सिमेंट चौपदरीकरणामुळे मेळघाटचे वनक्षेत्र पोखरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 22:23 IST

विदर्भाचे नंदनवन असलेल्या मेळघाटातील चिखलदरा येथे जाण्यासाठी चौपदरीकरण सिमेंटचा रस्ता होणार आहे. यात हा रस्ता निर्मितीसाठी जवळपास २ लाख वृक्ष आणि शेकडो हेक्टर वनक्षेत्र बाधित होणार आहे. हे चौपदरीकरण घटांगमार्गे होत असल्याने ५७.५७ किमीचा रस्ता हा वनक्षेत्रात येणार आहे. याबाबत केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारची अधिसूचना जारी : ५८ कि.मी.च्या रस्त्यासाठी हजारो हेक्टर वनजमिनीवर घाला

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विदर्भाचे नंदनवन असलेल्या मेळघाटातील चिखलदरा येथे जाण्यासाठी चौपदरीकरण सिमेंटचा रस्ता होणार आहे. यात हा रस्ता निर्मितीसाठी जवळपास २ लाख वृक्ष आणि शेकडो हेक्टर वनक्षेत्र बाधित होणार आहे. हे चौपदरीकरण घटांगमार्गे होत असल्याने ५७.५७ किमीचा रस्ता हा वनक्षेत्रात येणार आहे. याबाबत केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली आहे.केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्रालयाने अमरावती जिल्ह्यात वलगाव, दर्यापूर, अंजनगाव ते दर्यापूर, अमरावती ते मार्डी, आर्वी, मोर्शी ते सालबर्डी आणि आसरा, भातकुली आणि परतवाडा ते घटांगमार्गे चिखलदरापर्यंत एकूण २०० कि.मी. लांबीचे रस्ते चौपदरीकरण करण्यास मंजुरी दिलेली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंबईच्या एका खासगी कंपनीला सिमेंट रस्ते बनविण्याचे कंत्राट सोपविले आहे. यासाठी या कंपनीने रस्त्यांचे सीमांकन सुरू केलेले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतातील काही भाग जाणार असून विशेषत: परतवाडा ते घटांग मार्गे होणार चिखलदरा रस्त्यासाठी वनक्षेत्र बाधीत होणार आहे.५७.५७ किमीच्या रस्ता चौपदरीकरणामध्ये परतवाडा ते गौरखेडापर्यंत वनक्षेत्र येत नसले तरी पुढे ५० किलोमीटर वनक्षेत्र रस्त्यासाठी बाधित होणार आहे. कारण यासाठी १० हजार हेक्टरच्यावर वनक्षेत्र संपणार असल्याचा अंदाज आहे. याशिवाय सागवान वनक्षेत्र संपणार असल्याचा अंदाज आहे. सागवान व इतर प्रजातीचे मोठमोठी २ लाखांच्याच्या वर वृक्ष कोसळणार असल्याने मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला धक्का बसणार आहे.भोपाळवरून मिळणार मंजुरीपेंच व्याघ्र प्रकल्पातून तयार करण्यात आलेल्या मार्गाप्रमाणे मेळघाट चिखलदरा चौपदरीकरण रस्ता तयार करण्यासाठी किती वनक्षेत्र संपणार आहे. यासाठी मध्यप्रदेशातील भोपाळ येथून सिमेंट काँक्रिटीकरण चौपदीकरण रस्त्यास मंजुरी मिळाल्यावर काम चालू होणार असल्याची माहिती आहे.वलगाव ते दर्यापूर मार्गावरील ५० हजार झाडे होणार नामशेषसन- २०१० मध्ये सामाजिक वनीकरण विभागाने वलगाव ते दर्यापूर मार्र्गावर २५ हजार वृक्ष लागवड करुन ती जगविली. चोख संगोपन आणि देखभालीमुळे आजमितीला ही झाडे डौलदारपणे उभी असताना हा रस्ता आता चौपदीकरण केला जाणार आहे. सिमेंट चौपदीकरणामुळे वनविभागासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचे सुमारे ५० हजार झाडे तोडली जातील, असा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे हा निर्णय निसर्गावर घाला घालणारा ठरेल, यात दुमत नाही.पोहरा ते मालखेड रस्त्याचे सर्वेक्षणअमरावती ते धामणगाव रेल्वे या दरम्यान सिमेंट रस्ता चौपदरीकरण केले जाणार आहे. त्याअनुषंगाने पोहरा ते मालखेड वनक्षेत्र, खासगी जमीन रस्ता निर्मितीत किती जागा हस्तांतरित करावी लागेल, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्वेक्षण सुरू केले असून, प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला जाईल.चौपदरीकरणामुळे जंगलाची कनेक्टिव्हीटी तुटणार असून, वन्यप्राण्यांसाठी ते धोकादायक ठरणारे आहे. विकास झाला पाहिजे पण, अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून रस्त्यांना अंडर, ओव्हर पासेस निर्माण व्हावे. जेणेकरुन जंगल आणि वन्यजीव सुरक्षित असतील.- जयंत वडतकर, एनजीओ, अमरावती