शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

कालव्याच्या पाण्यामुळे पार्डी येथील शेतकऱ्याचे नुकसान

By admin | Updated: August 24, 2015 00:34 IST

अप्परवर्धा कालव्याच्या पुलावर नाल्याचे पाणी अडून १० वर्षांपासून पार्डी येथील प्रदीप सोलव आणि प्रशांत सोलव यांच्या शेतातील पीक नष्ट होत आहे.

मोर्शी : अप्परवर्धा कालव्याच्या पुलावर नाल्याचे पाणी अडून १० वर्षांपासून पार्डी येथील प्रदीप सोलव आणि प्रशांत सोलव यांच्या शेतातील पीक नष्ट होत आहे. अप्परवर्धा प्रकल्पाच्या उपविभागीय अभियंत्यांने तीन वर्षांपूर्वी भाडे तत्त्वावर पर्यायी जागा उपलब्ध करुन देण्याचे लेखी आश्वासनही दिले. मात्र अद्याप पूर्तता झालेली नाही. अप्परवर्धा कालव्याच्या पुलामुळे नाल्याचे पाणी अडल्यामुळे प्रदीप सोलव आणि प्रशांत सोलव यांच्या शेत सर्वे नं ३२/१ मधील पीक पाण्याखाली येते. याप्रकरणी सर्व संबंधित अधिकाऱ्यांकडे विनंती व अर्ज त्यांनी केले. आमदारांनाही निववणी केली. २०१२ मध्ये अप्पर वर्धा धरणाचे उपविभागीय अभियंता यांनी भाडे तत्त्वावर जमीन उपलब्ध करुन देण्याची हमी दिली. मात्र जमीन उपलब्ध करुन दिली नाही. यावर्षी ११ आॅगस्ट रोजी पुराच्या पाण्याने सोलव यांचे शेतातील पीक वाहून गेले. पिकाकरिता सोलव यांनी बँकेकडून कर्जसुध्दा घेतले आहे. पुरात पीक वाहून गेल्यामुळे कर्ज परताव्याचा आणि प्रपंच चालविण्याचा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. सोलव यांनी आ.अनिल बोंडे यांना निवेदन दिले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष शेताची पाहणी करण्याचे निर्देश दिले. अधिकाऱ्यांनी पीक शंभरटक्के वाहून गेल्याचे कबूल केले. मात्र त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही.मागील दहा वर्षांपासून स्वत:च्या शेतातील पीक हाती येत नाही. नुकसान भरपाई मिळत नाही. शिवाय अधिकाऱ्यांनी लेखी कबुली दिल्यावरही पर्यायी जमीन भाडेतत्त्वावरही दिली जात नाही. या सर्व जाचापोटी दोन्ही शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी आली असून आत्महत्येशिवाय दुसरा कोणताही पर्याय त्यांच्यासमोर नसल्याची जाणीव अप्पर वर्धा प्रकल्पाच्या उपविभागीय अभियंत्यांना लेखी निवेदनाव्दारे सोलव बंधंनी करून दिली आहे. भविष्यात काही अप्रीय घटना घडल्यास त्याला अप्पर वर्धा प्रकल्पाचे अधिकारी आणि शासन जबाबदार राहील, असा इशारादेखील सोलव बंधूंनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)