शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

कालव्याच्या पाण्यामुळे पार्डी येथील शेतकऱ्याचे नुकसान

By admin | Updated: August 24, 2015 00:34 IST

अप्परवर्धा कालव्याच्या पुलावर नाल्याचे पाणी अडून १० वर्षांपासून पार्डी येथील प्रदीप सोलव आणि प्रशांत सोलव यांच्या शेतातील पीक नष्ट होत आहे.

मोर्शी : अप्परवर्धा कालव्याच्या पुलावर नाल्याचे पाणी अडून १० वर्षांपासून पार्डी येथील प्रदीप सोलव आणि प्रशांत सोलव यांच्या शेतातील पीक नष्ट होत आहे. अप्परवर्धा प्रकल्पाच्या उपविभागीय अभियंत्यांने तीन वर्षांपूर्वी भाडे तत्त्वावर पर्यायी जागा उपलब्ध करुन देण्याचे लेखी आश्वासनही दिले. मात्र अद्याप पूर्तता झालेली नाही. अप्परवर्धा कालव्याच्या पुलामुळे नाल्याचे पाणी अडल्यामुळे प्रदीप सोलव आणि प्रशांत सोलव यांच्या शेत सर्वे नं ३२/१ मधील पीक पाण्याखाली येते. याप्रकरणी सर्व संबंधित अधिकाऱ्यांकडे विनंती व अर्ज त्यांनी केले. आमदारांनाही निववणी केली. २०१२ मध्ये अप्पर वर्धा धरणाचे उपविभागीय अभियंता यांनी भाडे तत्त्वावर जमीन उपलब्ध करुन देण्याची हमी दिली. मात्र जमीन उपलब्ध करुन दिली नाही. यावर्षी ११ आॅगस्ट रोजी पुराच्या पाण्याने सोलव यांचे शेतातील पीक वाहून गेले. पिकाकरिता सोलव यांनी बँकेकडून कर्जसुध्दा घेतले आहे. पुरात पीक वाहून गेल्यामुळे कर्ज परताव्याचा आणि प्रपंच चालविण्याचा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. सोलव यांनी आ.अनिल बोंडे यांना निवेदन दिले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष शेताची पाहणी करण्याचे निर्देश दिले. अधिकाऱ्यांनी पीक शंभरटक्के वाहून गेल्याचे कबूल केले. मात्र त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही.मागील दहा वर्षांपासून स्वत:च्या शेतातील पीक हाती येत नाही. नुकसान भरपाई मिळत नाही. शिवाय अधिकाऱ्यांनी लेखी कबुली दिल्यावरही पर्यायी जमीन भाडेतत्त्वावरही दिली जात नाही. या सर्व जाचापोटी दोन्ही शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी आली असून आत्महत्येशिवाय दुसरा कोणताही पर्याय त्यांच्यासमोर नसल्याची जाणीव अप्पर वर्धा प्रकल्पाच्या उपविभागीय अभियंत्यांना लेखी निवेदनाव्दारे सोलव बंधंनी करून दिली आहे. भविष्यात काही अप्रीय घटना घडल्यास त्याला अप्पर वर्धा प्रकल्पाचे अधिकारी आणि शासन जबाबदार राहील, असा इशारादेखील सोलव बंधूंनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)