शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

मधमाश्यांमुळे लागला जंगलातील नैसर्गिक पाणीस्रोताचा शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 02:39 IST

वन्यप्राण्यांना तहान भागवण्यास मिळणार मुबलक पाणी

- वैभव बाबरेकर अमरावती : उन्हाळ्यात भकास झालेल्या वडाळी वनपरिक्षेत्रात पाण्याचे नैसर्गिक स्रोत शोधून काढण्यात विभागाला मधमाशांच्या अस्तित्वामुळे यश आले. यामुळे वन्यप्राण्यांना तहान भागवण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे.वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर यांच्यासह वनरक्षक सुरेंद्र डहाके व निलेश करवाळे हे जंगल परिसरात गस्ती घालत होते. तेव्हा या वन कर्मचाऱ्यांनी मधमाश्यांच्या वास्तव्यातून पाण्याचा नैसर्गिक स्रोत शोधून काढला आहे. हे कर्मचारी आपआपल्या वनक्षेत्रात गस्त घालत असताना, त्यांना एके ठिकाणी दगडांवर मधमाश्यांना असल्याचे आढळले. त्यांनी जवळ जाऊन निरीक्षण केले असता, तेथे त्यांना ओलावा आढळला. त्यामुळे त्यांनी तेथील जागा खोदून मोठा खड्डा केल्यानंतर तेथे स्वच्छ पाणी आढळले. त्यांनी याबाबत माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर त्याच ठिकाणी नैसर्गिक पाणवठ्याची निर्मिती करण्यात आली. आता वडाळी वनपरिक्षेत्रात पूर्वीचा एक नैसर्गिक पाणवठा आहे, त्यात आणखी दोन नैसर्गिक पानवठ्यांची भर पडली आहे.मधमाशी अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटकमधमाशी नैसर्गिक अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे. मधमाशांमार्फत उत्कृष्ट परागीकरण घडते. त्यामुळे फळे, पिकांच्या गुणवत्तेत अनेकपटींनी वाढ होते. परागीकरणामुळे वनस्पतींची संख्या वाढते आणि अनेक प्रकारच्या वनस्पतींचे वाण टिकून राहण्यास मदत होते.अशाप्रकारे निसर्गात जैवविविधता राखण्यास मदत होते. जगंलातील पाण्याच्या स्थळाजवळ किंवा ओलाव्याच्या ठिकाणी ते आढळतात. उन्हाळ्यात ओलावा शोषून घेत मधमाशा तहान भागवित असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

टॅग्स :Waterपाणी