शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मोबाईल टॉवरधारकांच्या मुजोरीला ‘सुको’चा चाप

By admin | Updated: December 23, 2016 00:15 IST

बेबंद झालेल्या मोबाईल टॉवरधारकांवर थेट सुप्रिम कोर्टाने (सुको) लगाम घातला आहे.

उत्पन्नात कोटींची भर : महापालिका वसूल करणार मालमत्ता कर अमरावती : बेबंद झालेल्या मोबाईल टॉवरधारकांवर थेट सुप्रिम कोर्टाने (सुको) लगाम घातला आहे. न्यायालयीन निर्देशानुसार आता महापालिका या मोबाईल टॉवरधारकांकडून मालमत्ता कर वसुलणार आहे. तसे निर्देशही सर्व सहायक आयुक्त आणि कर अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. महापालिका हद्दीतील १८२ टॉवर मालमत्ताकराच्या अख्त्यारित आल्याने वर्षाकाठी १ ते सव्वा कोटी रुपये कर वसूल होणार आहे. राज्य शासनाने मोबाईल टॉवरवर उभारणीबाबत धोरण निश्चित केले आहे. मात्र शहरातील काही मोबाईल टॉवर उभारणाऱ्या कंपन्या परस्पर टॉवर उभारून त्यानंतर परवानगीचा अर्ज सादर करीत असल्याचा प्रकार गतवर्षी उघड झाला. त्याच कालावधीत महापालिका प्रशासनाला ठेंगा दाखविणारे तीन मोबाईल टॉवर्स तत्कालीन आयुक्तांच्या निर्देशानुसार जमीनदोस्त करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चरने महापालिकेच्या विरोधात थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्या रीट पिटीशनवर १६ डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. त्यात मोबाईल टॉवर हे इमारत या संज्ञेत मोडत असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या निकालामुळे मोबाईल टॉवरधारकांच्या मनमानीला चाप बसला असून त्यांच्याकडून आता मलामत्ता कर वसुलण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त हेमंत पवार यांनी बुधवारी कार्यालयीन आदेश काढले. या सर्व मोबाईल टॉवरवर या मलामत्तेची थकीत कराची मागणी व वसुलीबाबत आवश्यक ती कार्यवाही विनाविलंब करावी, असे निर्देश त्यांनी पाचही सहायक आयुक्तांना दिले आहेत. मोबाईल टॉवरधारकांकडून (कंपनीकडून) मिळणाऱ्या मालमत्ताकरातून महानगरपालिकेच्या तिजोरीत घसघशीत वाढ होणार आहे. मोबाईल टॉवर उभारणीसह मालमत्ता म्हणूनही प्रशासनाला यातून उत्पन्न मिळणार आहे. (प्रतिनिधी) जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर ‘सुको’त जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चरने २०१५ साली अमरावती महापालिकेविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ५७७/२०१५ या क्रमांकाची रीट पिटिशन दाखल करून घेण्यात आली. त्यानंतर ६११/२०१६ मधील रीट पिटिशनवर १६ डिसेंबर २०१६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. त्या निकालानुसार मोबाईल टॉवरधारकांकडून मालमत्ता कर वसूल करण्याचा महापालिकेचा मार्ग प्रशस्त झाला आहे. १५३ मोबाईल टॉवर अनधिकृत डिसेंबर २०१५ मध्ये तत्कालीन आयुक्तांच्या आदेशान्वये फ्रेजरपुरा येथील इंडस् कंपनीचे टॉवर हटविण्यात आले होते. त्याचवेळी बडनेरा नवीवस्ती व पॅराडाईज कॉलनीमधील अनधिकृत टॉवर हटविण्यात आले होते. त्यावेळी अमरावती व बडनेरा शहर मिळून १५३ मोबाईल टॉवरला परवानगी नसल्याची माहिती उघड झाली होती. महापालिका हद्दीत एकूण १८२ मोबाईल टॉवर उभारण्यात आले होते. त्यापैकी केवळ २८ मोबाईल टॉवरलाच मान्यता होती. आताही परिस्थिती बदलली नाही.