शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

दुष्काळग्रस्त भागात थेंब-थेंब पाण्यासाठी 'ती'ची धडपड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 22:19 IST

घराघरांत शोषखड्डे : राज्यातील पहिला प्रयोग धामणगावात

मोहन राऊत/धामणगाव रेल्वे (अमरावती) : तीन वर्षांपासून पडणारा अल्प पाऊस, त्यातून पाण्यासाठी होणारी भटकंती पाहता पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी राज्यात लोकमत सखी मंचने पुढाकार घेतला आहे. त्याचा पहिला प्रयोग धामणगाव शहरातील लोकमत सखी मंचच्या विभागप्रमुखांनी यशस्वी केला. शहरातील एक हजार सखींच्या घरी शोषखड्ड्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.

 अलीकडच्या काळात राज्याच्या विविध भागांत कोरडा दुष्काळ पडू लागला आहे. भूगर्भातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत असल्याने पाणीसंकट अधिक तीव्र बनले आहे. जलसंधारण व जलसंवर्धनाची ‘अभी नही तो कभी नही’ अशा स्थिती आलेली आहे. आगामी काही वर्षांत राज्यात सर्वदूर पाणीसंकट उद्भवण्याची भीती अस्वस्थ वर्तमानातून प्रतिबिंबित होत आहे. त्यावर मात करण्यासाठी घरच्या घरी शोषखड्ड्यांची निर्मिती करून जलसंधारणास हातभार लावण्याची सुरुवात धामणगावातून करण्यात आली. पावसाळ्यात पडणाºया पावसाचा थेंब न् थेंब जमिनीत झिरपावा, यासाठी दररोज वापरण्यात येणारे पाणी तसेच पावसाळ्यात स्लॅबवरून खाली येणारे पाणी पाइप टाकून थेट शोषखड्ड्यात सोडण्यात येणार आहे. शहरातील एक हजार सखींकडे हा प्रयोग राबविण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या. 

भूजल पुनर्भरणासाठी पावसाचा प्रत्येक थेंब व दररोजचे वापरलेले पाणी जमिनीत मुरावे म्हणून येथील लोकमत सखी मंच विभागप्रमुख सविता मेंडुले यांनी प्रथम स्वत:च्या घरी शोष खड्डा तयार केला. घरातील स्वयंपाकगृह, स्नानगृह व अन्य सांडपाणी घराबाहेर सोडून न देता ते घराच्या अंगणात शोषखड्डा करून त्यात मुरविण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे.  आपल्या घरातून दिवसाकाठी दरडोई २० लिटर पाणी सांडपाणी म्हणून नालीतून सोडण्यात येते. घरी शोषखड्डा तयार केल्यानंतर त्यांनी सर्व सखी सदस्यांना याबाबत माहिती दिली.

टॅग्स :AmravatiअमरावतीWaterपाणी