शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

पेयजल योजना रखडल्या

By admin | Updated: July 17, 2017 01:43 IST

निधीअभावी जिल्ह्यातील राष्ट्रीय ग्रामीण पेयजलच्या १७ योजना अर्ध्यावरच रखडल्या आहेत.

१० कोटींची मागणी : १७ योजना अपूर्णच, पाणीपुरवठा विभाग हतबललोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निधीअभावी जिल्ह्यातील राष्ट्रीय ग्रामीण पेयजलच्या १७ योजना अर्ध्यावरच रखडल्या आहेत. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे पाणीपुरवठा विभागाने १० कोटींची मागणी केली आहे.जिल्ह्यात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत ४६ गावांमध्ये पाणी पुरवठा योजनांचे काम सुरू होते. तीव्र पाणीटंचाई असल्याने या गावांमध्ये या योजना सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र निधीअभावी त्या पूर्ण करणे कठीण झाले. अशाही स्थितीत जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने २९ गावांमधील योजना पूर्ण केल्या. मात्र आता उर्वरित गावांमधील काम करण्यासाठी निधीच उरला नाही. त्यामुळे पाणीपुरवठा विभाग हतबल झाला आहे.योजना सुरू असलेल्या १७ गावांमध्ये काम सुरू आहे. तथापि निधी नसल्याने अत्यंत संथगतीने काम सुरू आहे. या योजना पूर्ण करण्यासाठी किमान १० कोटींची गरज आहे. पाणीपुरवठा विभागाने राज्य शासनाकडे निधीची मागणी केली होती. मात्र राज्य शासनाने जिल्हा नियोजन समितीकडून हा निधी उपलब्ध करून घ्यावा, असे सूचविले आहे. त्यानुसार आता पाणीपुरवठा विभागाने जिल्हा नियोजन समितीकडे १० कोटींच्या निधीची मागणी केली. मात्र जिल्हा नियोजन समितीची बैठक होईल कधी, निधी मंजूर कधी होणार, असा प्रश्न आहे. पाणीपुरवठा विभागाने नियोजन समितीकडे १० कोटींची मागणी केली. मात्र नियोजन समितीच अस्तित्वात नाही. येत्या आॅगस्टमध्ये नियोजन समितीची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर या १७ योजना पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध होईल. त्यानंतर तरी किमान पुढील उन्हाळ्यापूर्वी या १७ गावांमधील योजना पूर्ण व्हाव्यात, अशी तेथील जनतेची अपेक्षा आहे.