शहरं
Join us  
Trending Stories
1
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
2
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
3
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
4
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
5
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
6
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
7
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
8
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
9
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
10
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
11
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
12
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
13
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
14
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!
15
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
16
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
17
जुळ्या मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीला पुन्हा होणार होते 'ट्विन्स', पण एकाचा झाला मृत्यू; भावुक पोस्ट
18
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
19
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
20
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!

पेयजल योजना रखडल्या

By admin | Updated: July 17, 2017 01:43 IST

निधीअभावी जिल्ह्यातील राष्ट्रीय ग्रामीण पेयजलच्या १७ योजना अर्ध्यावरच रखडल्या आहेत.

१० कोटींची मागणी : १७ योजना अपूर्णच, पाणीपुरवठा विभाग हतबललोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निधीअभावी जिल्ह्यातील राष्ट्रीय ग्रामीण पेयजलच्या १७ योजना अर्ध्यावरच रखडल्या आहेत. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे पाणीपुरवठा विभागाने १० कोटींची मागणी केली आहे.जिल्ह्यात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत ४६ गावांमध्ये पाणी पुरवठा योजनांचे काम सुरू होते. तीव्र पाणीटंचाई असल्याने या गावांमध्ये या योजना सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र निधीअभावी त्या पूर्ण करणे कठीण झाले. अशाही स्थितीत जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने २९ गावांमधील योजना पूर्ण केल्या. मात्र आता उर्वरित गावांमधील काम करण्यासाठी निधीच उरला नाही. त्यामुळे पाणीपुरवठा विभाग हतबल झाला आहे.योजना सुरू असलेल्या १७ गावांमध्ये काम सुरू आहे. तथापि निधी नसल्याने अत्यंत संथगतीने काम सुरू आहे. या योजना पूर्ण करण्यासाठी किमान १० कोटींची गरज आहे. पाणीपुरवठा विभागाने राज्य शासनाकडे निधीची मागणी केली होती. मात्र राज्य शासनाने जिल्हा नियोजन समितीकडून हा निधी उपलब्ध करून घ्यावा, असे सूचविले आहे. त्यानुसार आता पाणीपुरवठा विभागाने जिल्हा नियोजन समितीकडे १० कोटींच्या निधीची मागणी केली. मात्र जिल्हा नियोजन समितीची बैठक होईल कधी, निधी मंजूर कधी होणार, असा प्रश्न आहे. पाणीपुरवठा विभागाने नियोजन समितीकडे १० कोटींची मागणी केली. मात्र नियोजन समितीच अस्तित्वात नाही. येत्या आॅगस्टमध्ये नियोजन समितीची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर या १७ योजना पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध होईल. त्यानंतर तरी किमान पुढील उन्हाळ्यापूर्वी या १७ गावांमधील योजना पूर्ण व्हाव्यात, अशी तेथील जनतेची अपेक्षा आहे.