शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पेयजल योजना रखडल्या

By admin | Updated: July 17, 2017 01:43 IST

निधीअभावी जिल्ह्यातील राष्ट्रीय ग्रामीण पेयजलच्या १७ योजना अर्ध्यावरच रखडल्या आहेत.

१० कोटींची मागणी : १७ योजना अपूर्णच, पाणीपुरवठा विभाग हतबललोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निधीअभावी जिल्ह्यातील राष्ट्रीय ग्रामीण पेयजलच्या १७ योजना अर्ध्यावरच रखडल्या आहेत. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे पाणीपुरवठा विभागाने १० कोटींची मागणी केली आहे.जिल्ह्यात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत ४६ गावांमध्ये पाणी पुरवठा योजनांचे काम सुरू होते. तीव्र पाणीटंचाई असल्याने या गावांमध्ये या योजना सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र निधीअभावी त्या पूर्ण करणे कठीण झाले. अशाही स्थितीत जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने २९ गावांमधील योजना पूर्ण केल्या. मात्र आता उर्वरित गावांमधील काम करण्यासाठी निधीच उरला नाही. त्यामुळे पाणीपुरवठा विभाग हतबल झाला आहे.योजना सुरू असलेल्या १७ गावांमध्ये काम सुरू आहे. तथापि निधी नसल्याने अत्यंत संथगतीने काम सुरू आहे. या योजना पूर्ण करण्यासाठी किमान १० कोटींची गरज आहे. पाणीपुरवठा विभागाने राज्य शासनाकडे निधीची मागणी केली होती. मात्र राज्य शासनाने जिल्हा नियोजन समितीकडून हा निधी उपलब्ध करून घ्यावा, असे सूचविले आहे. त्यानुसार आता पाणीपुरवठा विभागाने जिल्हा नियोजन समितीकडे १० कोटींच्या निधीची मागणी केली. मात्र जिल्हा नियोजन समितीची बैठक होईल कधी, निधी मंजूर कधी होणार, असा प्रश्न आहे. पाणीपुरवठा विभागाने नियोजन समितीकडे १० कोटींची मागणी केली. मात्र नियोजन समितीच अस्तित्वात नाही. येत्या आॅगस्टमध्ये नियोजन समितीची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर या १७ योजना पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध होईल. त्यानंतर तरी किमान पुढील उन्हाळ्यापूर्वी या १७ गावांमधील योजना पूर्ण व्हाव्यात, अशी तेथील जनतेची अपेक्षा आहे.