शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

अचलपुरात कोरोनासोबत पिण्याच्या पाण्याचेही संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:12 IST

शहरातील अब्बासपुरा, सारायपुरा, सरमसपुरा, माळवेशपुरा, देवडी, जीवनपुरा या भागात १५ दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित स्वरूपाने होत असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण ...

शहरातील अब्बासपुरा, सारायपुरा, सरमसपुरा, माळवेशपुरा, देवडी, जीवनपुरा या भागात १५ दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित स्वरूपाने होत असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. अचलपूर नगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागांतर्गत अचलपूर शहराला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी आहे. शहरात पाणीपुरवठा करण्याकरिता शासनाच्यावतीने आयएसएसडीपी व अमृत योजनेच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करून भरतीचे पाणी देण्यासाठी खर्च केले असताना अमृत योजनेतील गोंधळामुळे अचलपूर शहरातील बहुसंख्य भागात पाणी समस्या निर्माण झालेली आहे. एकीकडे कोरोनाने सर्वत्र थैमान घातले असताना अचलपुरात नागरिकांना कोरोनाशी सोबतच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची वेळ आलेली आहे. नगरपालिका कोणत्याही पर्यायी व्यवस्था करीत नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या संकटाला सामना करावा लागत आहे. एकीकडे उन्हाचे चटके बसत असताना पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा नागरिकांना कसरत करावी लागत आहे. अचलपूर नगरपालिका पाणीपुरवठा विभागाने या भागात पाण्याचे योग्य वितरण होत नाही त्या ठिकाणी व उन्हाळा पूर्वीच नियोजन करणे अपेक्षित होते. मात्र ते करण्यात दिरंगाई झाली असून, ९० लाखांच्या कामाचा तांत्रिक मंजुरी करतात पाठविलेला प्रस्ताव प्रलंबित असल्याने अडचणी येत असल्याचे प्रशासनातर्फे बोलल्या जात आहे.

अमृत योजनेचे काम निकृष्ट अमृत योजनेच्या पाईपलाईनचे काम अनेक भागात निकृष्ट झाल्याचा आरोप अनेक वेळा नगरसेवकांनी लावलेला आहे. अनेक भागांत अमृत योजनेच्यावतीने नवीन पाईपलाईन टाकण्यात आली. परंतु, अनेक भागात जुनी पाईपलाईन सुद्धा त्याला जोडण्यात आली आहे. त्यामुळे जुनी पाईपलाईन मधून कनेक्शन देण्यात येत असताना पाणीटंचाई निर्माण झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत अचलपुरात इतर अनेक भागात पाण्याचा थेंब पोहचत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.