शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

ग्रामसेवक आंदोलनावर तोडगा काढा : मनोहर जाधव

By admin | Updated: July 3, 2015 00:38 IST

जिल्हाभरातील ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन मागील आठवड्यापासून सुरु आहे. परिणामी शैक्षणिक सत्र व कृषी कामासह नागरिकांना आवश्यक असलेले दाखले

अचलपूर : जिल्हाभरातील ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन मागील आठवड्यापासून सुरु आहे. परिणामी शैक्षणिक सत्र व कृषी कामासह नागरिकांना आवश्यक असलेले दाखले मिळण्याची प्रक्रियाच ठप्प झाल्यामुळे नागरिकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याचा विकासकामांवर परिणाम झाल्याने ग्रामसेवकांच्या आंदोलनाचा तोडगा काढण्याची मागणी अचलपूर सरपंच संघटनेचे अध्यक्ष मनोहर जाधव यांनी केले आहे.ग्रामसेवकांनी अंजनगाव तालुक्यातील निलंबित ग्रामसेवकाला पुन्हा कामावर रुजू करण्यासह इतर काही मागण्यांसाठी जिल्हाभर कामबंद आंदोलन पुकारले आहे. मागील आठ दिवसांपासून सुरु असलेल्या या आंदोलनाचा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. शैक्षणिक सत्रामध्ये शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले मिळणे बंद झाले आहे. शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक असलेले दाखलेसुध्दा लाभार्थ्यांना मिळत नाहीत. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून नापिकीचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे. ग्रामसेवकांच्या कामबंद आंदोलनामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांची परवड होत आहे. या बाबीचा विचार करून आंदोलनावर तोडगा काढण्याची मागणी होत आहे. योग्य तोडगा काढून ग्रामसेवकांना पुन्हा कामावर रुजू करण्यासाठी पर्याय शोधण्याची मागणी अचलपूर सरपंच संघटनेचे अध्यक्ष मनोहर जाधव यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)