शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

ग्रामसेवक आंदोलनावर तोडगा काढा : मनोहर जाधव

By admin | Updated: July 3, 2015 00:38 IST

जिल्हाभरातील ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन मागील आठवड्यापासून सुरु आहे. परिणामी शैक्षणिक सत्र व कृषी कामासह नागरिकांना आवश्यक असलेले दाखले

अचलपूर : जिल्हाभरातील ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन मागील आठवड्यापासून सुरु आहे. परिणामी शैक्षणिक सत्र व कृषी कामासह नागरिकांना आवश्यक असलेले दाखले मिळण्याची प्रक्रियाच ठप्प झाल्यामुळे नागरिकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याचा विकासकामांवर परिणाम झाल्याने ग्रामसेवकांच्या आंदोलनाचा तोडगा काढण्याची मागणी अचलपूर सरपंच संघटनेचे अध्यक्ष मनोहर जाधव यांनी केले आहे.ग्रामसेवकांनी अंजनगाव तालुक्यातील निलंबित ग्रामसेवकाला पुन्हा कामावर रुजू करण्यासह इतर काही मागण्यांसाठी जिल्हाभर कामबंद आंदोलन पुकारले आहे. मागील आठ दिवसांपासून सुरु असलेल्या या आंदोलनाचा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. शैक्षणिक सत्रामध्ये शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले मिळणे बंद झाले आहे. शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक असलेले दाखलेसुध्दा लाभार्थ्यांना मिळत नाहीत. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून नापिकीचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे. ग्रामसेवकांच्या कामबंद आंदोलनामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांची परवड होत आहे. या बाबीचा विचार करून आंदोलनावर तोडगा काढण्याची मागणी होत आहे. योग्य तोडगा काढून ग्रामसेवकांना पुन्हा कामावर रुजू करण्यासाठी पर्याय शोधण्याची मागणी अचलपूर सरपंच संघटनेचे अध्यक्ष मनोहर जाधव यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)