शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रेती उत्खननामुळे ‘पाणीबाणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 05:00 IST

चार वर्षांपासून तालुका पाण्याअभावी दुष्काळात होरपळतो आहे. या भागातील विहिरी उन्हाळ्यापूर्वीच आटल्या आहेत. ३००-३५० फूट खोल खोदल्यानंतर बोअरवेलला पाणी लागत होते. मात्र, ती पातळी आता १००० ते १५०० फुटांपर्यंत पोहोचली आहे. अशी बिकट परिस्थिती असताना शहानूर नदीचे खोलीकरण व जलसंधारण महत्त्वाचे होते. मात्र, तसे झाले नाही. १० ते १५ वर्षांपूर्वी शहानूर नदीचे पात्र अतिशय व्यापक होते.

ठळक मुद्देमहसूल प्रशासनाकडून अभय : नर्सरी नष्ट होण्याच्या मार्गावर, नदीपात्रात मोठमोठे खड्डे

लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : शहरालगतच्या शहानूर नदीचे पात्र रेतीतस्करांनी लक्ष्य केले आहे. नदीपात्रातील हजारो ब्रास रेतीची अवैधरीत्या उत्खनन करून अवैध वाहतूक केली जाते. येथील शहरवासीयांसह अकोटकडे जाणाऱ्या प्रत्येकाच्या नजरेतून ही रेतीचोरी सुटत नाही. मात्र, महसूल विभागाने झोपेचे सोंग घेतले आहे. या रेती उत्खननामुळे तालुक्यावर ‘पाणीबाणी’ ओढविण्याचे दाट संकेत आहेत.चार वर्षांपासून तालुका पाण्याअभावी दुष्काळात होरपळतो आहे. या भागातील विहिरी उन्हाळ्यापूर्वीच आटल्या आहेत. ३००-३५० फूट खोल खोदल्यानंतर बोअरवेलला पाणी लागत होते. मात्र, ती पातळी आता १००० ते १५०० फुटांपर्यंत पोहोचली आहे. अशी बिकट परिस्थिती असताना शहानूर नदीचे खोलीकरण व जलसंधारण महत्त्वाचे होते. मात्र, तसे झाले नाही. १० ते १५ वर्षांपूर्वी शहानूर नदीचे पात्र अतिशय व्यापक होते. पिण्यासाठी नदीच्या पाण्याचा वापर होत होता. मात्र, अलीकडे शहानूर नदीपात्राला रेतीतस्करांची नजर लागली आहे. या नदीपात्रातून रोज हजारो ब्रास रेती काढली जाते. त्याची दिवसाढवळ्या वाहतूक केली जाते. त्यासाठी बैलगाडी, ट्रक, ट्रॅक्टर वापरले जातात. नदीपात्रात मोठमोठे खड्डे रेती उत्खननाचे पुरावे ठरले आहेत. लाखो रुपये खर्च करुन नगरपालिकेच्या वतीने १५ वर्षांपूर्वी खोडगाव मार्गावरील नर्सरीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. ती नर्सरी आज आॅक्सिजन पार्क म्हणून दिमाखात उभी आहे. मात्र, या नर्सरीमधील झाडांच्या बुंध्यातून रेती चोरीला गेली. महसूल प्रशासनाने रेती तस्करांवर अंकुश लावला नाही, तर ही नर्सरीसुद्धा नष्ट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत जागरूक नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्यात. मात्र, ना तहसीलदार फिरकले, ना त्यांचे अधिनिस्थ पथक. त्यामुळे कारवाई कोण करेल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.खोडगाव, देवगाव मार्गावरील शहानूर पात्रातील, नाल्यातील रेतीचे उत्खनन अतिशय चुकीचे आहे. तहसीलदार कारवाई करीत नसतील, तर आपण स्वत: पाहणी करून रेतीचोरांविरूद्ध कारवाई करू.- प्रियंका आंबेकर,उपविभागीय अधिकारी, दर्यापूर