शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

संसदेत २० वर्षांपासून अनुसूचित क्षेत्रातील कायद्याचा मसुदा प्रलंबित

By गणेश वासनिक | Updated: June 24, 2024 15:56 IST

राज्याच्या पेसा क्षेत्रात गठित नगरपंचायती, नगरपरिषदेचा कायदेशीर पेच कायम; आदिवासींना न्याय मिळणार केव्हा?

अमरावती : राज्यात गावांची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन राज्य शासनाने अस्तित्वात असलेल्या अनेक ग्रामपंचायतींना नगरपंचायतींचा दर्जा दिला. मात्र पेसा क्षेत्रात मोडणाऱ्या १८ नगरपंचायती व ४ नगरपरिषदेच्या कारभाराबाबत संसदेने स्वतंत्र कायदा न केल्यामुळे घटनात्मक पेचप्रसंग अद्यापही कायम आहे. गत २० वर्षांपासून संसदेत कायद्याचा मसुदा प्रलंबित असल्यामुळे या नगरपंचायतींचा कारभार बेकायदेशीर ठरत आहे.

नगरपरिषद संबंधी २००१ साली तयार केलेल्या कायद्याचा मसुदा २० वर्षे होऊनही संसदेने पारित केलेला नाही. असे असताना राज्य सरकारने अनुसूचित क्षेत्रात नगरपंचायती गठित केलेल्या आहेत. तेथे राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका घेऊन कारभार सुरू केला आहे. जोपर्यंत संसद अनुसूचित क्षेत्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींसाठी कायदा करीत नाही. तोपर्यंत अनुसूचित क्षेत्रात नगरपंचायत गठित करता येत नाही.

हे आहेत अनुसूचित क्षेत्रातील जिल्हे आणि तालुके◆ अमरावती : चिखलदरा नगर परिषद, धारणी नगरपंचायत◆ ठाणे : शहापूर नगरपंचायत◆ पालघर : मोखाडा, तलासरी, विक्रमगड, वाडा, जव्हार, डहाणू◆ नाशिक : कळवण, पेठ, सुरगाणा◆ नंदुरबार : नवापूर नगरपरिषद, तळोदा◆ गडचिरोली : भामरागड नगरपंचायत, सिरोंचा, धानोरा, कुरखेडा, कोरची, अहेरी, एटापल्ली, अंशतः घोषित तालुका◆ नाशिक : त्र्यंबकेश्वर नगर परिषद

अनुसूचित क्षेत्रातील तालुक्याच्या ठिकाणच्या आदिवासी बांधवांना २००१ च्या प्रस्तावित नगरपरिषद कायद्याच्या मसुद्यात अनेक सुविधा व जास्त प्रतिनिधित्व दिले आहेत. मात्र ते प्रस्तावित बिल अद्यापपर्यंत संसदेत मंजूर झाले नाही. त्यामुळे या गावांना पुन्हा अनुसूचित क्षेत्र गावाचा दर्जा देऊन त्यांना पेसा कक्षेत आणावे, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. - एकनाथ भोये, राज्य सचिव, ट्रायबल फोरम.