शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

संसदेत २० वर्षांपासून अनुसूचित क्षेत्रातील कायद्याचा मसुदा प्रलंबित

By गणेश वासनिक | Updated: June 24, 2024 15:56 IST

राज्याच्या पेसा क्षेत्रात गठित नगरपंचायती, नगरपरिषदेचा कायदेशीर पेच कायम; आदिवासींना न्याय मिळणार केव्हा?

अमरावती : राज्यात गावांची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन राज्य शासनाने अस्तित्वात असलेल्या अनेक ग्रामपंचायतींना नगरपंचायतींचा दर्जा दिला. मात्र पेसा क्षेत्रात मोडणाऱ्या १८ नगरपंचायती व ४ नगरपरिषदेच्या कारभाराबाबत संसदेने स्वतंत्र कायदा न केल्यामुळे घटनात्मक पेचप्रसंग अद्यापही कायम आहे. गत २० वर्षांपासून संसदेत कायद्याचा मसुदा प्रलंबित असल्यामुळे या नगरपंचायतींचा कारभार बेकायदेशीर ठरत आहे.

नगरपरिषद संबंधी २००१ साली तयार केलेल्या कायद्याचा मसुदा २० वर्षे होऊनही संसदेने पारित केलेला नाही. असे असताना राज्य सरकारने अनुसूचित क्षेत्रात नगरपंचायती गठित केलेल्या आहेत. तेथे राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका घेऊन कारभार सुरू केला आहे. जोपर्यंत संसद अनुसूचित क्षेत्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींसाठी कायदा करीत नाही. तोपर्यंत अनुसूचित क्षेत्रात नगरपंचायत गठित करता येत नाही.

हे आहेत अनुसूचित क्षेत्रातील जिल्हे आणि तालुके◆ अमरावती : चिखलदरा नगर परिषद, धारणी नगरपंचायत◆ ठाणे : शहापूर नगरपंचायत◆ पालघर : मोखाडा, तलासरी, विक्रमगड, वाडा, जव्हार, डहाणू◆ नाशिक : कळवण, पेठ, सुरगाणा◆ नंदुरबार : नवापूर नगरपरिषद, तळोदा◆ गडचिरोली : भामरागड नगरपंचायत, सिरोंचा, धानोरा, कुरखेडा, कोरची, अहेरी, एटापल्ली, अंशतः घोषित तालुका◆ नाशिक : त्र्यंबकेश्वर नगर परिषद

अनुसूचित क्षेत्रातील तालुक्याच्या ठिकाणच्या आदिवासी बांधवांना २००१ च्या प्रस्तावित नगरपरिषद कायद्याच्या मसुद्यात अनेक सुविधा व जास्त प्रतिनिधित्व दिले आहेत. मात्र ते प्रस्तावित बिल अद्यापपर्यंत संसदेत मंजूर झाले नाही. त्यामुळे या गावांना पुन्हा अनुसूचित क्षेत्र गावाचा दर्जा देऊन त्यांना पेसा कक्षेत आणावे, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. - एकनाथ भोये, राज्य सचिव, ट्रायबल फोरम.