शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

संसदेत २० वर्षांपासून अनुसूचित क्षेत्रातील कायद्याचा मसुदा प्रलंबित

By गणेश वासनिक | Updated: June 24, 2024 15:56 IST

राज्याच्या पेसा क्षेत्रात गठित नगरपंचायती, नगरपरिषदेचा कायदेशीर पेच कायम; आदिवासींना न्याय मिळणार केव्हा?

अमरावती : राज्यात गावांची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन राज्य शासनाने अस्तित्वात असलेल्या अनेक ग्रामपंचायतींना नगरपंचायतींचा दर्जा दिला. मात्र पेसा क्षेत्रात मोडणाऱ्या १८ नगरपंचायती व ४ नगरपरिषदेच्या कारभाराबाबत संसदेने स्वतंत्र कायदा न केल्यामुळे घटनात्मक पेचप्रसंग अद्यापही कायम आहे. गत २० वर्षांपासून संसदेत कायद्याचा मसुदा प्रलंबित असल्यामुळे या नगरपंचायतींचा कारभार बेकायदेशीर ठरत आहे.

नगरपरिषद संबंधी २००१ साली तयार केलेल्या कायद्याचा मसुदा २० वर्षे होऊनही संसदेने पारित केलेला नाही. असे असताना राज्य सरकारने अनुसूचित क्षेत्रात नगरपंचायती गठित केलेल्या आहेत. तेथे राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका घेऊन कारभार सुरू केला आहे. जोपर्यंत संसद अनुसूचित क्षेत्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींसाठी कायदा करीत नाही. तोपर्यंत अनुसूचित क्षेत्रात नगरपंचायत गठित करता येत नाही.

हे आहेत अनुसूचित क्षेत्रातील जिल्हे आणि तालुके◆ अमरावती : चिखलदरा नगर परिषद, धारणी नगरपंचायत◆ ठाणे : शहापूर नगरपंचायत◆ पालघर : मोखाडा, तलासरी, विक्रमगड, वाडा, जव्हार, डहाणू◆ नाशिक : कळवण, पेठ, सुरगाणा◆ नंदुरबार : नवापूर नगरपरिषद, तळोदा◆ गडचिरोली : भामरागड नगरपंचायत, सिरोंचा, धानोरा, कुरखेडा, कोरची, अहेरी, एटापल्ली, अंशतः घोषित तालुका◆ नाशिक : त्र्यंबकेश्वर नगर परिषद

अनुसूचित क्षेत्रातील तालुक्याच्या ठिकाणच्या आदिवासी बांधवांना २००१ च्या प्रस्तावित नगरपरिषद कायद्याच्या मसुद्यात अनेक सुविधा व जास्त प्रतिनिधित्व दिले आहेत. मात्र ते प्रस्तावित बिल अद्यापपर्यंत संसदेत मंजूर झाले नाही. त्यामुळे या गावांना पुन्हा अनुसूचित क्षेत्र गावाचा दर्जा देऊन त्यांना पेसा कक्षेत आणावे, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. - एकनाथ भोये, राज्य सचिव, ट्रायबल फोरम.