शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
4
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
5
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
6
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
7
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
8
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
9
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
10
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
11
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
12
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
13
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
14
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
15
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
16
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
17
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
18
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
19
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
20
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड

डॉ. आंबेडकरांचे अंबादेवी सत्याग्रह परिषदेपुढे संबोधन

By admin | Updated: November 12, 2014 22:36 IST

अस्पृश्यांना महाडच्या चवदार तळ्याचे पाणी पिता येत नाही. नाशिकच्या काळारामाचे व अमरावतीच्या अंबादेवीचे दर्शन घेता येत नाही. या विषम व्यवस्थेविरूध्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत

त्र्यंबक ढोके - अमरावतीअस्पृश्यांना महाडच्या चवदार तळ्याचे पाणी पिता येत नाही. नाशिकच्या काळारामाचे व अमरावतीच्या अंबादेवीचे दर्शन घेता येत नाही. या विषम व्यवस्थेविरूध्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सभेद्वारे सत्याग्रह, सभा, संमेलने, लेखनकार्य आदींद्वारे तुफान झंझावात सुरू केला. या दरम्यान त्यांनी अंबानगरीला १३ नोव्हेंबर १९२७ साली दुपारी १.३० वाजता भेट दिली होती. डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांच्या पुढाकाराने आयोजित अंबादेवी सत्याग्रह परिषदेला यावेळी बाबासाहेबांनी संबोधित केले. १३ नोव्हेंबर १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बडनेरा येथे आगमन झाले. यावेळी दादासाहेब गवईंनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर स्थानिक इंद्रभुवन थिएटरमध्ये दुपारी ३.३० वाजता डॉ. बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली अंबादेवी सत्याग्रह परिषद सुरू झाली. या सभेला स्पृश्य, अस्पृश्य, सवर्णांसह अनेक दिग्गजांची उपस्थिती होती. दुसऱ्या दिवशी १४ नोव्हेंबरला सकाळी ७ वाजता बाबासाहेबांना मानपत्र देण्यात आले. डॉ. बाबासाहेबांनी मार्गदर्शन केल्यानंतर नागपूरचे वामराव घोरपडे, बॅ. नानासाहेब तिडके यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन अमरावती देवस्थान कमिटीच्या निर्णयाविरूध्द झगडण्याचा निर्णय घेण्यात आला. या लढ्यात आर्वीचे दलपतसिंग चव्हाण, अमरावतीचे गोपाळराव देशमुख, चौबळ, खापर्डे, एस.वाय.पाटील, ठवरे, उत्तम कदम, संपत नाईक, राजाराम अकाती गायकवाड, पी.एच.तायडे, मोहोड, एस.पी.धंदर आदींसह अनेकांचा समावेश होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भेटीने या लढ्याला अधिक धार आली होती. सकाळी आठ वाजता डॉ. बाबासाहेबांची सभा सुरू झाल्यानंतर मुंबईहून तार आली. त्यात १२ नोव्हेंबर रोजी १२ वाजता डॉ. आंबेडकरांचे वडीलबंधून बाळाराम उपाख्य दादासाहेब आंबेडकर यांचे निधन झाल्याची दु:खद वार्ता होती. परंतु बाबासाहेबांनी या दु:खद वार्तेने खचून न जाता सभा पुढे सुरू ठेवली. त्यावेळी अंबानगरीवासियांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धैर्यशिल वृत्तीचा अनुभव घेतला. (लेखक हे अमरावती येथील सद्धम्म प्रचार केंद्राचे अध्यक्ष आहेत.)