शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

घाबरू नका, ८७ रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 05:01 IST

जिल्ह्यात व प्रामुख्याने महानगरात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी व्यापक प्रमाणात होत आहे. याला नागरिकांचाही सकारात्मक प्रतिसाद आहे. आता कोरोनामुक्त घोषित करण्यासंदर्भात ‘आयसीएमआर’ने ९ मे रोजी नव्या गाइड लाइन दिल्या आहेत. त्यानुसार संक्रमित व्यक्तींना प्रथम पाच दिवस औषधांचा कोर्स दिला जातो. त्यानंतर पाच दिवस निरीक्षणात ठेवल्या जाते.

ठळक मुद्दे‘पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह’चा आलेख चढता : जिल्ह्यात उपचारानंतर बरे होण्याचा दर ४८ टक्क्यांवर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढती असली तरी उपचारानंतर बरे होण्याचे प्रमाण त्यापेक्षाही कितीतरी जास्त असल्याचे दिलासादायक चित्र आहे. सद्यस्थितीत कोविड रुग्णालयात ८३ संक्रमित व्यक्तींवर उपचार सुरू आहेत, त्याच्या तुलनेत ८७ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. हे प्रमाण आतापर्यंत नोंद झालेल्या पॉझिटिव्ह रुग्णसंख्येच्या ४८ टक्के आहे. सद्यस्थितीत दाखल रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या जास्त असल्याचे सुखद चित्र शहरासह जिल्ह्यात आहे.जिल्ह्यात व प्रामुख्याने महानगरात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी व्यापक प्रमाणात होत आहे. याला नागरिकांचाही सकारात्मक प्रतिसाद आहे. आता कोरोनामुक्त घोषित करण्यासंदर्भात ‘आयसीएमआर’ने ९ मे रोजी नव्या गाइड लाइन दिल्या आहेत. त्यानुसार संक्रमित व्यक्तींना प्रथम पाच दिवस औषधांचा कोर्स दिला जातो. त्यानंतर पाच दिवस निरीक्षणात ठेवल्या जाते. अहवाल निगेटिव्ह आल्यास व लक्षणे नसल्यास त्यांना सुटी दिली जाते. मात्र, पुढील सात दिवस त्यांना गृह विलगीकरणात राहावे लागते. केवळ आयसीयूमध्ये असणाऱ्या व्यक्तींनाच रुग्णालयात ठेवले जात आहे. उपचाराच्या परिणामी सात वर्षाच्या चिमुरडीसह ७० वर्षाच्या आजी उपचारानंतर कोरोनामुक्त झाल्या. मंगळवारी चौघे कोरोनामुक्त झाले आले.आरोग्य यंत्रणाद्वारे उपचारानंतर बरे झालेल्या व्यक्तींचे जिल्हा व आरोग्य प्रशासनाद्वारे पुष्पगुच्छ व मिठाई देऊन तसेच टाळ्या वाजवून स्वागत केले गेले. तत्पूर्वी, त्यांच्याकडून सात दिवस गृह विलगीकरणात राहण्याविषयी हमीपत्र लिहून घेतले. या कालावधीत त्यांनी काय करावे, काय करू नये, याविषयी कोरोनामुक्त झालेल्यांना माहिती दिली गेली असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी सांगितले.जिल्ह्यात असे झाले कोरोनामुक्तअमरावती शहरातील ताजनगर १२, खोलापुरी गेट ९, मसानगंज ६, हनुमाननगर ६, हैदरपुरा ५, बडनेरा ४, कमेला ग्राऊंड ४, नालसाबपुरा ४, हाथीपुरा ३, लालखडी ३, तारखेडा ३, कंवरनगर ३, हबीबनगर २, एसआरपीएफ कॅम्प २, गौसनगर १, सुफियाननगर १, कॉटन मार्केट १, आझादनगर १, बेलपुरा १, अंबिकानगर १, खरकाडीपुरा १, सिंधुनगर १, नांदगाव पेठ १, याशिवाय जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शिराळा ४, वरूड ३ व परतवाडा येथील १ रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झालेला आहे.दक्षता महत्त्वाचीकोरोनासंदर्भात दक्षता महत्त्वाची आहे. चेहºयावर मास्क लावणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन, गर्दी टाळणे, सॅनिटायझरने हात धुणे, सॅनिटायझर नसल्यास हँडवॉश, साबणचा वापर करुन आरोग्य यंत्रणेकडून सांगितल्याप्रमाणे हात धुणे याशिवाय शासनाने निर्देशित केलेल्या सूचनांचे व नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. घरीच राहा, सुरक्षित राहा, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले.उपचारादरम्यान रुग्णालयातील स्टाफने सहकार्य केले. आमचे मनोबल वाढविले. योग्य उपचारांनी हा आजार बरा होतो. नागरिकांनी कुठलीही लक्षणे दिसली की, तत्काळ रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत. कुठलीही माहिती लपवू नये.- कोरोनामुक्त नागरिकहाथीपुरा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या