शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल उघडले म्हणून जिभेचे लाड नको, आला पावसाळा पोट सांभाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:11 IST

अमरावती/ संदीप मानकर मानसूनचा पाऊस सक्रिय झाला असून, अनलॉकमध्ये शहरातील हॉटेल तसेच जिल्ह्यातील हजारो किरकोळ खाद्यापदार्थ विक्रीचे व्यवसाय सुरू ...

अमरावती/ संदीप मानकर

मानसूनचा पाऊस सक्रिय झाला असून, अनलॉकमध्ये शहरातील हॉटेल तसेच जिल्ह्यातील हजारो किरकोळ खाद्यापदार्थ विक्रीचे व्यवसाय सुरू झाले आहे. मात्र, पावसाळ्यात बाहेरचे खाणे, उघड्यावरचे खाणे, अती तेलकट खाण्यामुळे पोेटाचे आजार वाढण्याची शक्यता आहे. हॉटेल उघडले म्हणून जिभेचे लाड नको, आला पावसाळा पोट सांभाळा, असे म्हणण्याची वेळ आली आहे. कोरोनानंतर आता आरोग्य जपणे महत्त्वाचे झाले आहे. शहरात शेकडो हॉटेल आहेत. तेवढ्याच हातगाड्या शहरातील विविध चौकात लागतात. त्याठिकाणी किरकोळ खाद्यपदार्थ विक्रेते उघड्यावरच चमचमीत खाद्यापदार्थांची विक्री करतात. अशा पदार्थांवर धूळ साचते. तसेच त्यावर अनेकदा माशासुद्धा बसतात. असे गरम चटकदार पदार्थ खाण्यात आल्याने पोटाचे विकार होण्याची शक्यता असते. अतिसार, मळमळ, डोके दुखणे व इतर पोटाचे आजार यातून होण्याची शक्यता असते असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

बॉक्स:

पावसाळ्यात हे खायला हवे

अ) हिरव्या फळ भाज्या, नारळ पाणी, प्रोटीनयुक्त पदार्थ

ब) रोज जेवणात ताक, दुधाचे पदार्थ असावे

क) मोड आलेले कडधान्य

ड) डाळीचे बेसनाचे पदार्थ

बॉक्स:

पावसाळ्यात हे खाणे टाळावे

अ) उघड्यावरील खाद्यपदार्थ, जंकफुड

ब) अति मसाल्याचे तसेच चायनिज पदार्थ

क) अती तलळलेले तेलकट पदार्थ

ड) फ्रिजमधील थंड पाणी पिणे किंवा बाहेरील पाणी

आहारतज्ज्ञ काय म्हणतात?

कोट

पावसाळ्यात उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळा, तसेच दूषित पाण्याचे सेवन करू नये, ताज्या फळभाज्या तसेच प्रोटीनयुक्त पदार्थ खावे तसेच मोड आलेले कडधान्य रोज वाटीभर खाणे आरोग्यासाठी लाभकारी आहे. रोजच्या आहारात ताक, दुधजन्य पदार्थांचा कमी प्रमाणात वापर करावा?

डॉ. किरण निचत, आयुर्वेदिक तज्ज्ञ अमरावती

कोट

उघड्यावरील अन्य पदार्थ व अशुद्ध पाणी पिण्यात आल्याने अतिसार, काविड, टायफाईड, तसेच जंताचे आजार व पोटाचे विविध आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे उघड्यावरील अन्यपदार्थ टाळावे.

- श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती

बॉक्स:

रस्त्यावरील अन्य नकोच

अनलॉकमध्ये पंचवटी चौक, इर्विन चौक, राजकमल, जयस्तंभ चौकात तसेच शहरातील विविध चौकात हातगाड्यावर विविध प्रकारच्या खाद्यपदर्थांची विक्री केली जाते. तसेच चायनिज पदार्थांचीसुद्धा मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. मात्र, असे उघड्यावरील पदार्थ पावसाळ्यात खाणे आरोग्यासाठी घातक ठरतात. त्यावर बसलेली धूळ व माशा अन्न पदार्थ दूषित करतात. त्यामुळे रस्त्यावरील अन्यपदार्थ टाळले पाहिजे, असे डॉक्टरांचे मत आहे.