शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

पीएम आवासच्या कारभाराविरुद्ध गाढव मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2021 05:00 IST

जिल्हा ग्रामीण यंत्रणा कार्यालयावर मोर्चाने धडक देत विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यात लाभार्थ्यांना घर उभारताना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागातील  बहुतांश लाभार्थी हे शेतकरी असून, निसर्गाच्या लहरीपणामुळे व ऐन हंगामात शेतमालाचे भाव पाडल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहेत. घरकूल योजनेत केंद्र सरकारने लागू केलेल्या जाचक अटी या लाभार्थ्यांना नाहक त्रासाला कारणीभूत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेच्या गलथान कारभाराने सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. अनावश्यक प्रशासकीय त्रास सुरू असून, घरकूल लाभार्थींना धनादेश रक्कम देताना ‘मस्टर’ची अट लादल्याने हैराण झाले आहे. या योजनेत पारदर्शकता यावी आणि नागरिकांना दिलासा मिळावा, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने गाढव मोर्चा काढण्यात आला.जिल्हा ग्रामीण यंत्रणा कार्यालयावर मोर्चाने धडक देत विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यात लाभार्थ्यांना घर उभारताना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागातील  बहुतांश लाभार्थी हे शेतकरी असून, निसर्गाच्या लहरीपणामुळे व ऐन हंगामात शेतमालाचे भाव पाडल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहेत. घरकूल योजनेत केंद्र सरकारने लागू केलेल्या जाचक अटी या लाभार्थ्यांना नाहक त्रासाला कारणीभूत आहेत. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुशील गावंडे व शहराध्यक्ष नीलेश शर्मा यांच्या नेतृत्वात मोर्चाचे आयोजन करण्यात आले. गाढव मोर्चा बस स्टँड ते जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, मालटेकडी कार्यालय येथे पोहचला तेथे प्रकल्प अधिकारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांना केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजने अंतर्गत येणाऱ्या घरकूल  लाभार्थ्यांच्या समस्या मांडल्या. यावेळी सुशील गावंडे, नीलेश शर्मा, गजानन रेवाळकर, विपीन शिंगणे, साहिल सोलीव, प्रफुल्ल सानप, कुणाल विधळे, अनिरुद्ध होले, शैलेश राऊत, प्रतीक भोकरे, मंगेश पोल्हाड, अजित काळबांडे,  राजू येरहोकर, हेमंत बोबडे, शुभम पारोदे, दिग्विजय गायगोले, नितीन गावंडे, श्रीकांत तेलंग, कुणाल ठाकूर, निरंजन खडसे, वैभव तायडे, वैभव शिंदे, जावेद शेख, वैभव ठाकरे आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Morchaमोर्चाNCPराष्ट्रवादी काँग्रेस