शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पीएम आवासच्या कारभाराविरुद्ध गाढव मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2021 05:00 IST

जिल्हा ग्रामीण यंत्रणा कार्यालयावर मोर्चाने धडक देत विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यात लाभार्थ्यांना घर उभारताना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागातील  बहुतांश लाभार्थी हे शेतकरी असून, निसर्गाच्या लहरीपणामुळे व ऐन हंगामात शेतमालाचे भाव पाडल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहेत. घरकूल योजनेत केंद्र सरकारने लागू केलेल्या जाचक अटी या लाभार्थ्यांना नाहक त्रासाला कारणीभूत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेच्या गलथान कारभाराने सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. अनावश्यक प्रशासकीय त्रास सुरू असून, घरकूल लाभार्थींना धनादेश रक्कम देताना ‘मस्टर’ची अट लादल्याने हैराण झाले आहे. या योजनेत पारदर्शकता यावी आणि नागरिकांना दिलासा मिळावा, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने गाढव मोर्चा काढण्यात आला.जिल्हा ग्रामीण यंत्रणा कार्यालयावर मोर्चाने धडक देत विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यात लाभार्थ्यांना घर उभारताना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागातील  बहुतांश लाभार्थी हे शेतकरी असून, निसर्गाच्या लहरीपणामुळे व ऐन हंगामात शेतमालाचे भाव पाडल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहेत. घरकूल योजनेत केंद्र सरकारने लागू केलेल्या जाचक अटी या लाभार्थ्यांना नाहक त्रासाला कारणीभूत आहेत. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुशील गावंडे व शहराध्यक्ष नीलेश शर्मा यांच्या नेतृत्वात मोर्चाचे आयोजन करण्यात आले. गाढव मोर्चा बस स्टँड ते जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, मालटेकडी कार्यालय येथे पोहचला तेथे प्रकल्प अधिकारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांना केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजने अंतर्गत येणाऱ्या घरकूल  लाभार्थ्यांच्या समस्या मांडल्या. यावेळी सुशील गावंडे, नीलेश शर्मा, गजानन रेवाळकर, विपीन शिंगणे, साहिल सोलीव, प्रफुल्ल सानप, कुणाल विधळे, अनिरुद्ध होले, शैलेश राऊत, प्रतीक भोकरे, मंगेश पोल्हाड, अजित काळबांडे,  राजू येरहोकर, हेमंत बोबडे, शुभम पारोदे, दिग्विजय गायगोले, नितीन गावंडे, श्रीकांत तेलंग, कुणाल ठाकूर, निरंजन खडसे, वैभव तायडे, वैभव शिंदे, जावेद शेख, वैभव ठाकरे आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Morchaमोर्चाNCPराष्ट्रवादी काँग्रेस