शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

विद्यापीठाच्या परीक्षांना काही अर्थ आहे काय? गुणी विद्यार्थ्यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 05:01 IST

यूजीसीच्या निकषानुसार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार आहे. मात्र, या ऑनलाईन परीक्षांना काही अर्थ आहे काय, असा प्रश्न आता अनेक लोक उपस्थित करीत आहेत. कारण या परीक्षा ऑनलाईन आहेत. या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या व घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत विद्यापीठाचे कोणतेही मॉनिटरिंग नाही. कोण परीक्षा देत आहे, याची खातरजमा होत नाही. कशी परीक्षा दिली जात आहे, ते माहीत नाही.

ठळक मुद्देगाेपनीयता गुंडाळली, ऑनलाईन परीक्षांमध्ये पारदर्शकतेचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी-२०२० परीक्षा जून-जुलै महिन्यात आटोपल्या. आता ऑगस्ट महिन्यात उन्हाळी-२०२१ परीक्षेचे नियोजन विद्यापीठाने केले आहे. परंतु, हिवाळी-२०२० परीक्षेचे नियोजन, परीक्षेची पद्धती, परीक्षेची अंमलबजावणी व त्याचे स्वरूप लक्षात घेता विद्यापीठाच्या या ऑनलाईन परीक्षांमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचे वास्तव आहे. यात गुणी विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याची ओरड आहे.यूजीसीच्या निकषानुसार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार आहे. मात्र, या ऑनलाईन परीक्षांना काही अर्थ आहे काय, असा प्रश्न आता अनेक लोक उपस्थित करीत आहेत. कारण या परीक्षा ऑनलाईन आहेत. या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या व घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत विद्यापीठाचे कोणतेही मॉनिटरिंग नाही. कोण परीक्षा देत आहे, याची खातरजमा होत नाही. कशी परीक्षा दिली जात आहे, ते माहीत नाही. हिवाळी-२०२० परीक्षेतील अनेक विद्यार्थी त्यांच्या मोबाईलवरून कॉन्फरन्सिंगद्वारे पेपर सोडवल्याचे सांगत आहेत. पुस्तक उघडून अभ्यास न केलेल्या विद्यार्थ्यांनाही पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. हीच स्थिती उन्हाळी-२०२१ परीक्षेची राहणार आहे. महाविद्यालयाकडून परीक्षेसाठी पेपरची लिंक देण्यात येत असल्याने ‘जवळ’च्या अनेक विद्यार्थ्यांना आधीच प्रश्नांची उत्तरे माहीत असतात. अशा विद्यार्थ्यांनी पेपरची लिंक दिल्यानंतर अवघ्या १०-१५ मिनिटांत पेपर सोडवून तो पेपर सबमिट केल्याची माहिती आहे. परीक्षेची गोपनीयता केवळ नाममात्र आहे. परीक्षेसाठी पेपरची लिंक विद्यापीठाने दिली, तर या गोष्टीला आळा बसू शकतो. पण, विद्यापीठाने ती जबाबदारी महाविद्यालयांवर सोपवलेली आहे. त्यामुळे सर्व घोळ सुरू आहे. कशीबशी परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचा ‘निकाल’ लावणे‌ एवढेच विद्यापीठाचे धोरण दिसून येत आहे. त्यामुळे अशा परीक्षांना काही अर्थ आहे काय, असा प्रश्न आता गुणी विद्यार्थ्यांकडून उपस्थित होत आहे.

कोरोना संसर्गामुळे केंद्रावर परीक्षा घेता येत नाही. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निकषाचे पालन करून विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा घेण्यात येत आहे. प्राप्त परिस्थिती व विद्यार्थ्यांच्या हितानुसार परीक्षांबाबत  निर्णय घेण्यात आला आहे.- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मू्ल्यांकन मंडळ

ज्या विद्यार्थी कधी महाविद्यालयाचे तोंड पाहिले नाही, त्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळविले आहे. ही बाब गुणी विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी आहे. कोरोनाचा बागुलबुवा थांबयला हवा. ऑफलाईन परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता समाेर यावी.- समीर वानखडे, अमरावती.

 

टॅग्स :universityविद्यापीठexamपरीक्षा