शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

स्वागताला हार, बुके नकोत; रोपटे अन् गोरगरीब शालेय विद्यार्थ्यांना साहित्य द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 11:13 IST

Amravati : सीईओ संजीता मोहपात्रा यांच्या संकल्पनेतून स्तुत्य उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : स्वागताला हार-तुऱ्यांऐवजी रोपटे किंवा शालेय साहित्य देण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा यांनी केले आहे. त्यांनी दालनाबाहेर यासंदर्भात लावलेली सूचना लक्षवेधी ठरत असून त्यांच्या या उपक्रमास सर्व स्तरांतून प्रतिसाद मिळत आहे.

ग्रामीण भागातील शाळांतील विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही. त्यामुळे मुलांना शालेय साहित्याची मदत देणे गरजेचे आहे. त्या भूमिकेतूनच नोटबुक, पेन, पेन्सिल, कंपास बॉक्स असे साहित्य द्यावे, असे आवाहन केले आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावण्याचीही आत्यंतिक गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे स्वागताला येणाऱ्या प्रत्येकाने हार, बुके याऐवजी रोपटे आणल्यास अधिक बरे. दरम्यान, सीईओंच्या या आवाहनाला अनुसरून त्यांना भेटण्यास येणारा प्रत्येकजण या सूचनेचे पालन करत आहे.

"जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना मदतीचा उद्देश समोर ठेवून ही संकल्पना मांडली. या उपक्रमास नागरिकांचा व अभ्यागतांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे."- संजीता मोहपात्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अमरावती

इमारतींची डागडुजी सुरू जिल्हा परिषदेच्या काही शाळा इमारतीचे बांधकामही नादुरुस्त झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने शासकीय निधीतून डागडुजीची सोय केली आहे. त्याचवेळी विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही पुढाकार घेतला आहे. जि. प. कर्मचारी संघटनेने सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन करीत शालेय साहित्याची मदत करावी, अशा सूचना दिल्या आहेत. 

टॅग्स :Amravatiअमरावती