शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

ना डॉक्टर, ना औषध रुग्ण सोसताहेत मरणयातना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 00:13 IST

गरीब रुग्णांसाठी ग्रामीण रुग्णालय आजारातून मुक्ती मिळविण्यासाठी आशेचा किरण असतो.

ठळक मुद्देअनास्था : नांदगावची आरोग्य यंत्रणाच आजारी, अस्वच्छतेचा कळस

मनोज मानवतकर।आॅनलाईन लोकमतनांदगाव खंडेश्वर : गरीब रुग्णांसाठी ग्रामीण रुग्णालय आजारातून मुक्ती मिळविण्यासाठी आशेचा किरण असतो. परंतु नांदगाव येथे आरोग्य यंत्रणेचाच बोजवारा उडाला असल्याने रुग्णांना मरणयातना सहन करण्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही. शहरातील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर नाही, औषध नाही. वॉर्डात अस्वच्छतेने कळस गाठला आहे. ही स्थिती तातडीने सुधारावी, या रुग्णांच्या मागणीकडे प्रशासनातील कुणीच अद्याप लक्ष दिले नाही.नांदगाव शहराची लोकसंख्या १५ हजारांवर आहे, तर ग्रामीण रुग्णालयात शहरासह तालुक्यातील दररोज २५० ते ३०० रुग्णांची ओ.पी.डी. होते. रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासनाने एम.बी.बी.एस. डॉक्टरांची नियुक्ती केली आहे. परंतु, सद्यस्थितीत याठिकाणी डॉक्टरच उपलब्ध नसल्याने रुग्णालयाचा कारभार राष्टÑीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत तपासणी पथकातील शिकाऊ डॉक्टरांद्वारे चालविला जात असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास येत आहे. या ठिकाणी औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. टायफॉइडच्या रुग्ण, मधुमेह व रक्तदाबाच्या रुग्णांकरिता औषध नाही. एवढेच नव्हे तर खोकल्याचे औषध नाही. लहान मुलांवर औषधोपचाराचीही येथे सुविधा नाही. खाज व लहान-सहान दुखण्यांसाठी क्रीम उपलब्ध नाही. रुग्णांकरिता ग्रामीण रुग्णालयात पाण्याची सुद्धा कमतरता आहे.रुग्णालय परिसरात तसेच रुग्णांच्या वॉर्डात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. रुग्ण कक्षातील संडास, बाथरूमची दयनीय अवस्थ झाली आहे. सगळीकडे घाण पसरल्याने ग्रामीण रुग्णालयच आजारी पडल्याचे दिसून येत आहे. ज्या रुग्णांची आर्थिक स्थिती अतिशय नाजूक आहे, ज्यांना खासगी दवाखान्यात उपचार घेणे आवाक्याबाहेरचे आहे, अशा गरीब रुग्णांना जर ग्रामीण रुग्णालयात पुरेशी आरोग्य सेवा मिळत नसेल, तर त्यांनी कुढत मरण जवळ करावे का, असा प्रश्न लोकमानसात विचारला जात आहे.पोस्टमार्टम अमरावतीलाग्रामीण रुग्णालयात समस्या वाढतीच आहे. येथे रुग्णांसाठी आॅक्सीजनची व्यवस्था नाही. पोस्टमार्टमसाठी अमरावतीला जावे लागते. त्यासाठी अ‍ॅम्ब्यूलन्सदेखील उपलब्ध नाही. रुग्णसेवेकरिता तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता तर आहेच, कर्मचारीदेखील पुरेशा संख्येने नसल्याने रुग्णांची आबाळ होते.मोखड येथील अस्थमा (दमा) च्या रुग्ण कांताबाई नानाजी पवार यांना ग्रामीण रुग्णालयात भरती केले. आॅक्सीजनअभावी तीन तास ताटकळत ठेवले. अखेर त्यांची स्थिती नाजूक झाल्याने औषधोपचारासाठी अमरावतीला न्यावे लागले.- दुर्गेश सोळंके,मोखड.