शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

ना डॉक्टर, ना औषध रुग्ण सोसताहेत मरणयातना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 00:13 IST

गरीब रुग्णांसाठी ग्रामीण रुग्णालय आजारातून मुक्ती मिळविण्यासाठी आशेचा किरण असतो.

ठळक मुद्देअनास्था : नांदगावची आरोग्य यंत्रणाच आजारी, अस्वच्छतेचा कळस

मनोज मानवतकर।आॅनलाईन लोकमतनांदगाव खंडेश्वर : गरीब रुग्णांसाठी ग्रामीण रुग्णालय आजारातून मुक्ती मिळविण्यासाठी आशेचा किरण असतो. परंतु नांदगाव येथे आरोग्य यंत्रणेचाच बोजवारा उडाला असल्याने रुग्णांना मरणयातना सहन करण्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही. शहरातील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर नाही, औषध नाही. वॉर्डात अस्वच्छतेने कळस गाठला आहे. ही स्थिती तातडीने सुधारावी, या रुग्णांच्या मागणीकडे प्रशासनातील कुणीच अद्याप लक्ष दिले नाही.नांदगाव शहराची लोकसंख्या १५ हजारांवर आहे, तर ग्रामीण रुग्णालयात शहरासह तालुक्यातील दररोज २५० ते ३०० रुग्णांची ओ.पी.डी. होते. रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासनाने एम.बी.बी.एस. डॉक्टरांची नियुक्ती केली आहे. परंतु, सद्यस्थितीत याठिकाणी डॉक्टरच उपलब्ध नसल्याने रुग्णालयाचा कारभार राष्टÑीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत तपासणी पथकातील शिकाऊ डॉक्टरांद्वारे चालविला जात असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास येत आहे. या ठिकाणी औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. टायफॉइडच्या रुग्ण, मधुमेह व रक्तदाबाच्या रुग्णांकरिता औषध नाही. एवढेच नव्हे तर खोकल्याचे औषध नाही. लहान मुलांवर औषधोपचाराचीही येथे सुविधा नाही. खाज व लहान-सहान दुखण्यांसाठी क्रीम उपलब्ध नाही. रुग्णांकरिता ग्रामीण रुग्णालयात पाण्याची सुद्धा कमतरता आहे.रुग्णालय परिसरात तसेच रुग्णांच्या वॉर्डात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. रुग्ण कक्षातील संडास, बाथरूमची दयनीय अवस्थ झाली आहे. सगळीकडे घाण पसरल्याने ग्रामीण रुग्णालयच आजारी पडल्याचे दिसून येत आहे. ज्या रुग्णांची आर्थिक स्थिती अतिशय नाजूक आहे, ज्यांना खासगी दवाखान्यात उपचार घेणे आवाक्याबाहेरचे आहे, अशा गरीब रुग्णांना जर ग्रामीण रुग्णालयात पुरेशी आरोग्य सेवा मिळत नसेल, तर त्यांनी कुढत मरण जवळ करावे का, असा प्रश्न लोकमानसात विचारला जात आहे.पोस्टमार्टम अमरावतीलाग्रामीण रुग्णालयात समस्या वाढतीच आहे. येथे रुग्णांसाठी आॅक्सीजनची व्यवस्था नाही. पोस्टमार्टमसाठी अमरावतीला जावे लागते. त्यासाठी अ‍ॅम्ब्यूलन्सदेखील उपलब्ध नाही. रुग्णसेवेकरिता तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता तर आहेच, कर्मचारीदेखील पुरेशा संख्येने नसल्याने रुग्णांची आबाळ होते.मोखड येथील अस्थमा (दमा) च्या रुग्ण कांताबाई नानाजी पवार यांना ग्रामीण रुग्णालयात भरती केले. आॅक्सीजनअभावी तीन तास ताटकळत ठेवले. अखेर त्यांची स्थिती नाजूक झाल्याने औषधोपचारासाठी अमरावतीला न्यावे लागले.- दुर्गेश सोळंके,मोखड.