शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष तोडू नका, चिमुकल्यांची आर्जव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 23:09 IST

शहरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या जवळपास ३५ हिरव्या वृक्षांना कापू नये, असी आर्जव चिमुकल्यांनी वृक्षांना मिठी मारत केली.

ठळक मुद्देआदिवासी पर्यावरण संघटनेचा पवित्रा : झाडांना मारली मिठी, वृक्ष संगोपनाचा जागर

आॅनलाईन लोकमतपरतवाडा : शहरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या जवळपास ३५ हिरव्या वृक्षांना कापू नये, असी आर्जव चिमुकल्यांनी वृक्षांना मिठी मारत केली. रस्ता चौपदरीकरणासाठी कंत्राटदाराने नगरपालिकेकडे परवानगी मागितली आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलन उभारले जात असून, त्यात बालकांचा सहभाग आहे.परतवाडा-अमरावती मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी ६० पेक्षा अधिक वृक्ष कापण्यात आले होते. आता पुन्हा अकोला-इंदूर महामार्गाला जोडण्यासाठी परतवाडा शहरातील ३५ वृक्ष कापण्याची परवानगी मागण्यात आली आहे. शहरातील झाडे कापू नये, यासाठी आदिवासी पर्यावरण संघटनेच्या माध्यमातून आंदोलन छडले आहे. शालेय विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला. शाळांमधून वृक्षांचे फायदे गिरविले जात असल्यामुळे शहरातील पर्यावरण सामाजिक संस्थेसह चिमुकल्यांनी आपल्या इवल्याश्या हातात महाकाय वृक्ष कवेत घेत ते कापू नका, अशी विनवणी केली. यामध्ये निर्भय खांझोडे, श्रुतिका डोंगर, संजित प्रजापती, समीर शहा, रजा खान या चिमुकल्यांचा सहभाग होता. संघटनेचे योगेश खानझोडे, प्रदीप चांदूरकर, सुरेश प्रजापती, मनिराम चिलाटी, बाबाराव बेठे, किसान जामकर, ममता डहाके आदींनी एसडीपीओंसह नगरपालिकेला निवेदन दिले.आधी वृक्षारोपण कराशासनाच्या विकासकामात अडथळा ठरणाऱ्यां झाडांची कापणी ठरलेली असल्याचे मत अधिकाºयांनी व्यक्त केले. तथापि, एक झाड कापल्यावर त्याऐवजी दहा वृक्ष लावा व साडेतीनशे वृक्षरोपण करा. त्याच्या संवधार्नाची जबाबदारी पूर्णपणे संबधित वृक्षतोड करणाऱ्यांनी घ्यावी आणि तसे लेखी द्यावे, अशी मागणी मान्य असेल, तरच वृक्षतोडीची परवानगी प्रशासनाने द्यावी, अन्यथा कुठल्याही परिस्थिती वृक्षतोड होऊ देणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे.आवाज कोण ऐकणार!गुरुवारी परतवाडा शहरातील आठवडी बाजार असतो. त्यामुळे शहरात ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने नागरिक येतात. अशात अंजनगाव ते बैतुल स्टॉपवरील झाडांना चिमुकल्यांनी आपल्या कवेत घेतल्याचे चित्र रस्त्याने ये-जा करणाºयांसाठी कौतुकाचा विषय ठरले होते. मात्र, त्यांची ही कळकळ प्रशासन ऐकेल का, हे आज तरी अनुत्तरित आहे.वृक्षतोड परवानगी नाकारावी, अशी आमची मागणी आहे. प्रत्येक झाडाच्या मोबदल्यात दहा झाडे लावण्यात यावी. तसे लेखी लिहून घ्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.- योगेश खानझोडेअध्यक्ष, आदिवासी पर्यावरण संघटना, परतवाडा