शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
2
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
4
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
5
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
6
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
7
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
8
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
9
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
10
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
11
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
12
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
13
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
14
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश
15
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
16
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
17
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
18
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
19
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
20
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम

वृक्ष तोडू नका, चिमुकल्यांची आर्जव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 23:09 IST

शहरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या जवळपास ३५ हिरव्या वृक्षांना कापू नये, असी आर्जव चिमुकल्यांनी वृक्षांना मिठी मारत केली.

ठळक मुद्देआदिवासी पर्यावरण संघटनेचा पवित्रा : झाडांना मारली मिठी, वृक्ष संगोपनाचा जागर

आॅनलाईन लोकमतपरतवाडा : शहरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या जवळपास ३५ हिरव्या वृक्षांना कापू नये, असी आर्जव चिमुकल्यांनी वृक्षांना मिठी मारत केली. रस्ता चौपदरीकरणासाठी कंत्राटदाराने नगरपालिकेकडे परवानगी मागितली आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलन उभारले जात असून, त्यात बालकांचा सहभाग आहे.परतवाडा-अमरावती मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी ६० पेक्षा अधिक वृक्ष कापण्यात आले होते. आता पुन्हा अकोला-इंदूर महामार्गाला जोडण्यासाठी परतवाडा शहरातील ३५ वृक्ष कापण्याची परवानगी मागण्यात आली आहे. शहरातील झाडे कापू नये, यासाठी आदिवासी पर्यावरण संघटनेच्या माध्यमातून आंदोलन छडले आहे. शालेय विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला. शाळांमधून वृक्षांचे फायदे गिरविले जात असल्यामुळे शहरातील पर्यावरण सामाजिक संस्थेसह चिमुकल्यांनी आपल्या इवल्याश्या हातात महाकाय वृक्ष कवेत घेत ते कापू नका, अशी विनवणी केली. यामध्ये निर्भय खांझोडे, श्रुतिका डोंगर, संजित प्रजापती, समीर शहा, रजा खान या चिमुकल्यांचा सहभाग होता. संघटनेचे योगेश खानझोडे, प्रदीप चांदूरकर, सुरेश प्रजापती, मनिराम चिलाटी, बाबाराव बेठे, किसान जामकर, ममता डहाके आदींनी एसडीपीओंसह नगरपालिकेला निवेदन दिले.आधी वृक्षारोपण कराशासनाच्या विकासकामात अडथळा ठरणाऱ्यां झाडांची कापणी ठरलेली असल्याचे मत अधिकाºयांनी व्यक्त केले. तथापि, एक झाड कापल्यावर त्याऐवजी दहा वृक्ष लावा व साडेतीनशे वृक्षरोपण करा. त्याच्या संवधार्नाची जबाबदारी पूर्णपणे संबधित वृक्षतोड करणाऱ्यांनी घ्यावी आणि तसे लेखी द्यावे, अशी मागणी मान्य असेल, तरच वृक्षतोडीची परवानगी प्रशासनाने द्यावी, अन्यथा कुठल्याही परिस्थिती वृक्षतोड होऊ देणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे.आवाज कोण ऐकणार!गुरुवारी परतवाडा शहरातील आठवडी बाजार असतो. त्यामुळे शहरात ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने नागरिक येतात. अशात अंजनगाव ते बैतुल स्टॉपवरील झाडांना चिमुकल्यांनी आपल्या कवेत घेतल्याचे चित्र रस्त्याने ये-जा करणाºयांसाठी कौतुकाचा विषय ठरले होते. मात्र, त्यांची ही कळकळ प्रशासन ऐकेल का, हे आज तरी अनुत्तरित आहे.वृक्षतोड परवानगी नाकारावी, अशी आमची मागणी आहे. प्रत्येक झाडाच्या मोबदल्यात दहा झाडे लावण्यात यावी. तसे लेखी लिहून घ्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.- योगेश खानझोडेअध्यक्ष, आदिवासी पर्यावरण संघटना, परतवाडा