शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
6
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
7
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
8
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
9
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
10
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
11
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
12
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
13
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
14
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
15
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
16
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
17
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
18
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
19
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
20
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!

कुणालाही भिक्षा देऊ नका, त्यांच्या हाताला काम द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 21:31 IST

भीक मागणे हा तसा कायद्याने गुन्हा आहे. पण घरातून काढून दिलेले, नैराश्य आलेले किंवा आळशी लोक भिक्षा मागतात. भीक मागताना नागरिकांना भावनिक करण्यासाठी लहान मुलांचा उपयोग केला जातो. त्याकरिता लहान मुलांना पळवून आणले जातात. गरजूंना ओळखा त्यांच्याकडून कामे होत असेल तर भिक्षा देण्याऐवजी त्यांना काम देऊन स्वालंबी बनावा, असे प्रतिपादन पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभिषेक सोनवणे यांनी केले.

ठळक मुद्देमुलाखत : डॉ.अभिजित सोनवणे यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भीक मागणे हा तसा कायद्याने गुन्हा आहे. पण घरातून काढून दिलेले, नैराश्य आलेले किंवा आळशी लोक भिक्षा मागतात. भीक मागताना नागरिकांना भावनिक करण्यासाठी लहान मुलांचा उपयोग केला जातो. त्याकरिता लहान मुलांना पळवून आणले जातात. गरजूंना ओळखा त्यांच्याकडून कामे होत असेल तर भिक्षा देण्याऐवजी त्यांना काम देऊन स्वालंबी बनावा, असे प्रतिपादन पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभिषेक सोनवणे यांनी केले.दिशा ग्रुप एज्युकेशन फांऊडेशन व प्रयास- सेवांकुर सामाजिक संस्थेच्यावतीने रविवारी येथील मातोश्री विमलाताई देशमुख सभागृहात ‘आम्ही बि घडलोे. तुम्ही बि घडाना’ या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार आनंदराव अडसूळ यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष नितीन धांडे, अरुण गावंडे उपस्थित होते.प्रयास-सेवांकुरचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अविनाश सावजी यांनी भिक्षेकरूसमुदायासाठी काम करणारे सोहम ट्रस्टचे डॉ.अभिजित सोनवने यांची व सन २०१५ च्या बॅचचे आयएएस झालेले राहुल कर्डिले यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यावेळी उपस्थितांसमोर दोघांनीही आपल्या खडतर जीवन प्रवासाचा धागा उलडला. डॉक्टर झाल्यानंतरही सुरुवातीच्या काळात मला अतिशय संघर्ष करावा लागला. परंतु, मला एका भिक्षा मागणाऱ्या बाबांकडून प्रेरणा मिळाली. तेव्हापासूनच मी या समुदायासाठी काम सुरू केले. या कामात माझी पत्नी डॉ. मनीषा यांचा सिंहाचा वाटा आहे. आज मी ही चळवळ पुढे नेण्यासाठी गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडली. पण, माझ्या पत्नीने कमाविलेल्या पैशातून ३० टक्के वाटा माझ्या सामाजिक कार्यावर खर्च करते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.मी प्रत्येक भिक्षेकरूंना हाच उपदेश देतो की, 'तुम्ही भिक्षा मागू नका. तुम्हाला जे काम शक्य असेल ते करा आणि स्वावलंबी बना'. त्यांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी माझा अहोरात्र प्रयत्न असतो. आतापर्यंत ४३ आजी - आजोबांना यातून बाहेर काढल्याचे समाधान त्यांनी यावेळी व्यक्त केले. त्यांचा मी मुलगा झालो. नातू झालो. त्यांचेही मला भरभरून प्रेम मिळते. आज राज्यात ७५० भिक्षेकरुंच्या आम्ही संपर्कात आहोत. ते माझ्या कुटुंबाचा भाग झाले आहे. ज्यांना डोळ्यांनी दिसत नाही. त्या १६० जणांचे मोतीबिंदूचे आम्ही शस्त्रक्रिया करविली. या कार्यासाठी मला अनेकांची मदतीची हाक मिळते. तेव्हा मी त्यांना सांगतो, तीन गोष्टी करा. आपल्या वृद्ध आई- वडिलांना घराबाहेर काढू नका, कुणालाही भीक देऊ नका, त्यांच्या हाताला काम मिळवून द्या. लहान मुलांना घेऊन तुम्हाला भावनिक होऊन भीक मागत असेल तर अशांना बळी पडू नका. कारण भिक्षा मागण्यासाठी लहान मुलांना पळविले जाते. अशांना भिक्षा दिली नाही तर हा प्रकार थांबविण्यास मदत होईल, असे अनेक अनुभव त्यांनी मुलाखतीदरम्यान कथन केले. संचालन मौसमी देशमुख यांनी केले.पूर्ण क्षमतेने अभ्यास करा, यश हमखासप्रामाणिक प्रयत्न, दृढ विश्वास, स्पर्धा परीक्षेचे योग्य नियोजन केले तर यश हमखास तुमच्याच हातात आहे. त्याकरिता तुमची पूर्ण क्षमता व शक्ती पणाला लावा, असा सल्ला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांना आयएएस अधिकारी तथा धारणीचे एसडीओ व एकात्मिक विकास प्रकल्प अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील असलेले राहुल कर्डिले यांचे वडील रयत शिक्षण संस्थेत माध्यमिक शिक्षक आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण नाशिकला, तर पुणे विद्यापीठातून इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रथम पुणे व नंतर दिल्ली येथे यूपीएससीची तयारी केली. यामध्ये कठोर मेहनत करून यश मिळविले. त्यांनी जलसंधारण चळवळीतही कार्य केल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. संगणकाचा व वर्तमानपत्राचा योग्य उपयोग करून जे कराल ते ताकदीने करा. यूपीएससीमध्ये यश न मिळाल्यास बी. प्लॅन तुमच्याकडे तयार ठेवा. पण निराश होऊ नका. यश हमखास तुम्हच्या हातात असेल, असे त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ. अविनाश सावजी यांनी घेतलेल्या मुलाखतीत राहुल कर्डिले यांनी अशाप्रकारे त्यांच्या आयुष्यातील आयएएसपर्यंतच्या जीवनप्रवासाचा धागा उलगडला.