शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

कुणालाही भिक्षा देऊ नका, त्यांच्या हाताला काम द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 21:31 IST

भीक मागणे हा तसा कायद्याने गुन्हा आहे. पण घरातून काढून दिलेले, नैराश्य आलेले किंवा आळशी लोक भिक्षा मागतात. भीक मागताना नागरिकांना भावनिक करण्यासाठी लहान मुलांचा उपयोग केला जातो. त्याकरिता लहान मुलांना पळवून आणले जातात. गरजूंना ओळखा त्यांच्याकडून कामे होत असेल तर भिक्षा देण्याऐवजी त्यांना काम देऊन स्वालंबी बनावा, असे प्रतिपादन पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभिषेक सोनवणे यांनी केले.

ठळक मुद्देमुलाखत : डॉ.अभिजित सोनवणे यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भीक मागणे हा तसा कायद्याने गुन्हा आहे. पण घरातून काढून दिलेले, नैराश्य आलेले किंवा आळशी लोक भिक्षा मागतात. भीक मागताना नागरिकांना भावनिक करण्यासाठी लहान मुलांचा उपयोग केला जातो. त्याकरिता लहान मुलांना पळवून आणले जातात. गरजूंना ओळखा त्यांच्याकडून कामे होत असेल तर भिक्षा देण्याऐवजी त्यांना काम देऊन स्वालंबी बनावा, असे प्रतिपादन पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभिषेक सोनवणे यांनी केले.दिशा ग्रुप एज्युकेशन फांऊडेशन व प्रयास- सेवांकुर सामाजिक संस्थेच्यावतीने रविवारी येथील मातोश्री विमलाताई देशमुख सभागृहात ‘आम्ही बि घडलोे. तुम्ही बि घडाना’ या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार आनंदराव अडसूळ यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष नितीन धांडे, अरुण गावंडे उपस्थित होते.प्रयास-सेवांकुरचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अविनाश सावजी यांनी भिक्षेकरूसमुदायासाठी काम करणारे सोहम ट्रस्टचे डॉ.अभिजित सोनवने यांची व सन २०१५ च्या बॅचचे आयएएस झालेले राहुल कर्डिले यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यावेळी उपस्थितांसमोर दोघांनीही आपल्या खडतर जीवन प्रवासाचा धागा उलडला. डॉक्टर झाल्यानंतरही सुरुवातीच्या काळात मला अतिशय संघर्ष करावा लागला. परंतु, मला एका भिक्षा मागणाऱ्या बाबांकडून प्रेरणा मिळाली. तेव्हापासूनच मी या समुदायासाठी काम सुरू केले. या कामात माझी पत्नी डॉ. मनीषा यांचा सिंहाचा वाटा आहे. आज मी ही चळवळ पुढे नेण्यासाठी गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडली. पण, माझ्या पत्नीने कमाविलेल्या पैशातून ३० टक्के वाटा माझ्या सामाजिक कार्यावर खर्च करते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.मी प्रत्येक भिक्षेकरूंना हाच उपदेश देतो की, 'तुम्ही भिक्षा मागू नका. तुम्हाला जे काम शक्य असेल ते करा आणि स्वावलंबी बना'. त्यांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी माझा अहोरात्र प्रयत्न असतो. आतापर्यंत ४३ आजी - आजोबांना यातून बाहेर काढल्याचे समाधान त्यांनी यावेळी व्यक्त केले. त्यांचा मी मुलगा झालो. नातू झालो. त्यांचेही मला भरभरून प्रेम मिळते. आज राज्यात ७५० भिक्षेकरुंच्या आम्ही संपर्कात आहोत. ते माझ्या कुटुंबाचा भाग झाले आहे. ज्यांना डोळ्यांनी दिसत नाही. त्या १६० जणांचे मोतीबिंदूचे आम्ही शस्त्रक्रिया करविली. या कार्यासाठी मला अनेकांची मदतीची हाक मिळते. तेव्हा मी त्यांना सांगतो, तीन गोष्टी करा. आपल्या वृद्ध आई- वडिलांना घराबाहेर काढू नका, कुणालाही भीक देऊ नका, त्यांच्या हाताला काम मिळवून द्या. लहान मुलांना घेऊन तुम्हाला भावनिक होऊन भीक मागत असेल तर अशांना बळी पडू नका. कारण भिक्षा मागण्यासाठी लहान मुलांना पळविले जाते. अशांना भिक्षा दिली नाही तर हा प्रकार थांबविण्यास मदत होईल, असे अनेक अनुभव त्यांनी मुलाखतीदरम्यान कथन केले. संचालन मौसमी देशमुख यांनी केले.पूर्ण क्षमतेने अभ्यास करा, यश हमखासप्रामाणिक प्रयत्न, दृढ विश्वास, स्पर्धा परीक्षेचे योग्य नियोजन केले तर यश हमखास तुमच्याच हातात आहे. त्याकरिता तुमची पूर्ण क्षमता व शक्ती पणाला लावा, असा सल्ला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांना आयएएस अधिकारी तथा धारणीचे एसडीओ व एकात्मिक विकास प्रकल्प अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील असलेले राहुल कर्डिले यांचे वडील रयत शिक्षण संस्थेत माध्यमिक शिक्षक आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण नाशिकला, तर पुणे विद्यापीठातून इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रथम पुणे व नंतर दिल्ली येथे यूपीएससीची तयारी केली. यामध्ये कठोर मेहनत करून यश मिळविले. त्यांनी जलसंधारण चळवळीतही कार्य केल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. संगणकाचा व वर्तमानपत्राचा योग्य उपयोग करून जे कराल ते ताकदीने करा. यूपीएससीमध्ये यश न मिळाल्यास बी. प्लॅन तुमच्याकडे तयार ठेवा. पण निराश होऊ नका. यश हमखास तुम्हच्या हातात असेल, असे त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ. अविनाश सावजी यांनी घेतलेल्या मुलाखतीत राहुल कर्डिले यांनी अशाप्रकारे त्यांच्या आयुष्यातील आयएएसपर्यंतच्या जीवनप्रवासाचा धागा उलगडला.