शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

जलयुक्त शिवार अभियानात निविदेचा खोडा

By admin | Updated: March 16, 2015 00:18 IST

महाराष्ट्र दुष्काळमुक्तीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी राज्य शासनाने सुरु केलेल्या जलयुक्त शिवार अभियानात निविदा प्रक्रियेचा खोडा येत आहे.

अमरावती : महाराष्ट्र दुष्काळमुक्तीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी राज्य शासनाने सुरु केलेल्या जलयुक्त शिवार अभियानात निविदा प्रक्रियेचा खोडा येत आहे. अवघे पाच दिवस उणेपुरे असताना अभियंते, कर्मचाऱ्यांची वानवा असल्याने निविदा प्रक्रिया कशी पूर्ण करावी, या विवंचनेत अधिकारीवर्ग आहे. मात्र, काहीही करा हे अभियान यशस्वी झालेच पाहिजे अशी तंबी जिल्हाधिकाऱ्यांची असल्याने संबंधित विभाग हतबल झाला आहे.येथील शासकीय विश्राम भवनात पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या अध्यक्षस्थानी शनिवारी पार पडलेल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या पार्श्वभूमीवर आयोजित कृषी विभागाच्या आढावा बैठकीत ही बाब स्पष्ट झाली. जलयुक्त शिवार अभियानात नैसर्गिकरीत्या पडणारे पाणी त्याच गावात साठवून ठेवण्यासाठी नाले खोलीकरण, सिमेंट बंधारे बांधण्याचे प्रस्तावित आहे. एकट्या अमरावती जिल्ह्यातील १४ तालुक्यांत २८५ गावांचा या योजनेत समावेश आहे. २१० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या योजनेतील कामे ही जेसीबी अथवा पोकलँड मशीनद्वारे करण्याचे धोरण आहे. शासन निर्णयानुसार ई निविदा प्रक्रिया राबवूनच या योजनतील कामे सोपवावी लागणार आहे. मात्र कृषी विभागात पारंपरिक पद्धतीने निविदा प्रक्रिया राबविण्याची तयारी असल्याने जलयुक्त शिवार अभियानाच्या निविदा प्रक्रिया या जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन, भूजल सर्वेक्षण आणि जलसंधारण विभागामार्फत राबविले जाणार आहे. मोठा गाजावाजा करुन या योजनेला प्रारंभ करण्यात आला असला तरी सर्वेक्षणानंतर गावे निश्चित करणे ही पाच दिवसांत पूर्ण न होणारी प्रक्रिया आहे. एकिकडे मनुष्यबळाचा अभाव असून शासन स्तरावरुन ही योजना चांगल्या पद्धतीने राबविण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबावतंत्र येत आहे. ई निविदा प्रक्रिया राबविताना अभियंते, कर्मचाऱ्यांची वानवा ही बाब असताना २० मार्च पूर्वी जलयुक्त शिवार अभियानाची निविदा प्रक्रिया राबवून कामे सुरु करण्याची सक्ती असल्याने अधिकारी ‘कोमात’ जात आहे. सर्वेक्षण, दरकरार, निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदारांना कामे सोपविणे हे पाच दिवसात शक्य होणार नाही, अ‍ेस खासगीत काही अधिकारी बोलू लागले आहेत. मनुष्यबळ ही बाब सर्वश्रूत असून पाच दिवसात योजनेची कामे सुरु करणे अशक्य असल्याची भावना अधिकाऱ्यांची आहे.