शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

गारपीटग्रस्तांच्या मदतीत जिल्ह्याला ठेंगा

By admin | Updated: February 4, 2015 23:06 IST

राज्यात नोव्हेंबर - डिसेंबर २०१४ मध्ये झालेला अकाली पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विशेष मदत व सवलती देण्याचा निर्णय शासनाने मंगळवारी घेतला आहे.

अमरावती : राज्यात नोव्हेंबर - डिसेंबर २०१४ मध्ये झालेला अकाली पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विशेष मदत व सवलती देण्याचा निर्णय शासनाने मंगळवारी घेतला आहे. जिल्ह्यात या कालावधीत चांदूररेल्वे व वरुड तालुक्यामधील मृगबहराच्या संत्र्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या सर्वेक्षणात चांदूररेल्वे तालुक्यात ६४ हेक्टरचे नुकसान दाखविले तर वरुड तालुक्याच्या नुकसानीची नोंद नसल्याने शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत. खरिपाच्या हंगामात अपुरा पाऊस पडला असला तरी ११ नोव्हेंबर २०१४ ला जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट झाली. प्रत्येक तालुक्याला याचा कमी अधिक प्रमाणात फटका बसला. नदी-नाल्याकाठची शेती खरडली गेली. चांदूररेल्वे व वरुड तालुक्यामधील संत्रापिकाच्या मृगबहराचे मोठ्या प्रमाणात नुकसान या पावसामुळे व जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या पावसामुळे संत्र्याच्या आंबिया बहरासाठी ताण बसला नाही. त्यामुळे या बहराची फूट झाली नाही. अतिवृष्टी व गारपिटीमुळे जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात नुकसान झाले असताना कृषी विभागाद्वारा संत्रा पीक नुकसानीचे सर्वेक्षणच झाले नाही. केवळ चांदूररेल्वे तालुक्यामधील संत्रा पिकाचे ६४.१४ हेक्टरमध्ये व पपई पिकाचे ०.६० हेक्टर पिकाचे नुकसान झाल्याचा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचा २ डिसेंबरचा अहवाल आहे. अवकाळी पाऊस व गारपीट नुकसानग्रस्तांना विशेष मदतीचा शासन निर्णय झाला असला तरी सर्वेक्षणाअभावी शेतकऱ्यांना मदत मिळणार नसल्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)