शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंचांना हवे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:10 IST

५५२ ग्रामपंचायतींचे पदाधिकारी उपेक्षित, प्रशिक्षण नसल्याने ग्रामसेवक करतात दिशाभूल मोहन राऊत धामणगाव रेल्वे : आगामी पाच वर्षांत गावात केंद्र ...

५५२ ग्रामपंचायतींचे पदाधिकारी उपेक्षित, प्रशिक्षण नसल्याने ग्रामसेवक करतात दिशाभूल

मोहन राऊत

धामणगाव रेल्वे : आगामी पाच वर्षांत गावात केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी प्रशासनाच्या मदतीसोबतच जिल्ह्यातील ५५२ सरपंच, उपसरपंच यांना प्रशिक्षणाची गरज व्यक्त होत आहे. प्रशिक्षण नसल्याने ग्रामसेवक दिशाभूल करू शकतात, अशी भीती आहे.

पंचायत राजमधील सर्वात महत्त्वाच्या टप्पा असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्या मदतीने मुंबई ग्रामपंचायत कायदा १९५८ च्या कलम ५ अन्वये गावाचा कारभार चालतो. ग्रामपंचायतीचा वार्षिक आराखडा तयार करण्याचे अधिकार सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांना आहेत.

गतवर्षी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंच, उपसरपंच निवडून आले आहेत. नवखे असल्याने लोककल्याणकारी योजना राबविताना त्यांच्यापुढे अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. कोणत्या योजना कशा आहेत, किती खाते असतात, मासिक सभेमध्ये कोणते विषय घ्यावे, याचा अभ्यास नाही. सरपंच, उपसरपंच गोंधळात पडले आहेत. पंचायत राज व्यवस्थेनुसार या सरपंच, उपसरपंचांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाल्याने विस्तार अधिकारी तथा मास्टर ट्रेनर यांनी किमान मोठ्या ग्रामपंचायतींच्या गावांत जाऊन सरपंचांना प्रशिक्षण दिले द्यावे, अशी मागणी होत आहे.

२९ बाबींचे हवे प्रशिक्षण

गावात रस्ते बांधणे, रस्त्यांची दुरुस्ती, दिवाबत्तीची सोय, जन्म, मृत्यू व विवाह नोंदी, सार्वजनिक स्वच्छता, सांडपाण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, शिक्षण, आरोग्यविषयक सोयी, शेती विकासाच्या व पशुधन सुधारणेच्या योजना अंमलात आणणे, गावाचा बाजार, जत्रा, उत्सव, यांची व्यवस्था ठेवणे या २९ बाबी गावात ग्रामसेवक राबवित असतात. त्यांच्या कामाकडे लक्ष ठेवणे व प्रसंगी मदत सरपंच, उपसरपंचांनी करणे गरजेचे आहे.

--------------------

आम्ही पदावर येऊन आठ महिन्यांचा कालावधी लोटला. कोरोनामुळे आम्हाला प्रशिक्षण मिळाले नाही. प्रशिक्षण दिल्यास गावच्या विकासात आमचा हातभार लागू शकतो.

- संदीप इंगळे, उपसरपंच, कावली

सरपंच, उपसरपंच, ग्रामसचिव यांच्या समन्वयाने ग्रामपंचायतचा कारभार चालतो. आम्हा नवीन लोकांना प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे. आता तरी प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकत प्रशिक्षण द्यावे.

- ममता मुकेश राठी, सरपंच, गव्हा फरकाडे