शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंचांना हवे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:10 IST

५५२ ग्रामपंचायतींचे पदाधिकारी उपेक्षित, प्रशिक्षण नसल्याने ग्रामसेवक करतात दिशाभूल मोहन राऊत धामणगाव रेल्वे : आगामी पाच वर्षांत गावात केंद्र ...

५५२ ग्रामपंचायतींचे पदाधिकारी उपेक्षित, प्रशिक्षण नसल्याने ग्रामसेवक करतात दिशाभूल

मोहन राऊत

धामणगाव रेल्वे : आगामी पाच वर्षांत गावात केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी प्रशासनाच्या मदतीसोबतच जिल्ह्यातील ५५२ सरपंच, उपसरपंच यांना प्रशिक्षणाची गरज व्यक्त होत आहे. प्रशिक्षण नसल्याने ग्रामसेवक दिशाभूल करू शकतात, अशी भीती आहे.

पंचायत राजमधील सर्वात महत्त्वाच्या टप्पा असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्या मदतीने मुंबई ग्रामपंचायत कायदा १९५८ च्या कलम ५ अन्वये गावाचा कारभार चालतो. ग्रामपंचायतीचा वार्षिक आराखडा तयार करण्याचे अधिकार सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांना आहेत.

गतवर्षी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंच, उपसरपंच निवडून आले आहेत. नवखे असल्याने लोककल्याणकारी योजना राबविताना त्यांच्यापुढे अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. कोणत्या योजना कशा आहेत, किती खाते असतात, मासिक सभेमध्ये कोणते विषय घ्यावे, याचा अभ्यास नाही. सरपंच, उपसरपंच गोंधळात पडले आहेत. पंचायत राज व्यवस्थेनुसार या सरपंच, उपसरपंचांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाल्याने विस्तार अधिकारी तथा मास्टर ट्रेनर यांनी किमान मोठ्या ग्रामपंचायतींच्या गावांत जाऊन सरपंचांना प्रशिक्षण दिले द्यावे, अशी मागणी होत आहे.

२९ बाबींचे हवे प्रशिक्षण

गावात रस्ते बांधणे, रस्त्यांची दुरुस्ती, दिवाबत्तीची सोय, जन्म, मृत्यू व विवाह नोंदी, सार्वजनिक स्वच्छता, सांडपाण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, शिक्षण, आरोग्यविषयक सोयी, शेती विकासाच्या व पशुधन सुधारणेच्या योजना अंमलात आणणे, गावाचा बाजार, जत्रा, उत्सव, यांची व्यवस्था ठेवणे या २९ बाबी गावात ग्रामसेवक राबवित असतात. त्यांच्या कामाकडे लक्ष ठेवणे व प्रसंगी मदत सरपंच, उपसरपंचांनी करणे गरजेचे आहे.

--------------------

आम्ही पदावर येऊन आठ महिन्यांचा कालावधी लोटला. कोरोनामुळे आम्हाला प्रशिक्षण मिळाले नाही. प्रशिक्षण दिल्यास गावच्या विकासात आमचा हातभार लागू शकतो.

- संदीप इंगळे, उपसरपंच, कावली

सरपंच, उपसरपंच, ग्रामसचिव यांच्या समन्वयाने ग्रामपंचायतचा कारभार चालतो. आम्हा नवीन लोकांना प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे. आता तरी प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकत प्रशिक्षण द्यावे.

- ममता मुकेश राठी, सरपंच, गव्हा फरकाडे