शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

जिल्ह्याला लाभला जैवविविधतेचा वारसा

By admin | Updated: May 22, 2016 00:10 IST

मेळघाट, पोहरा, मालखेड व महेंद्रीसारख्या समृध्द जंगलामुळे अमरावती जिल्ह्याला जैवविविधतेचा वारसा लाभला आहे.

जागतिक जैवविविधता दिवस : वाढती लोकवस्ती, जलप्रदूषणाचे संकटअमरावती : मेळघाट, पोहरा, मालखेड व महेंद्रीसारख्या समृध्द जंगलामुळे अमरावती जिल्ह्याला जैवविविधतेचा वारसा लाभला आहे. मात्र, वाढती लोकवस्ती व जलप्रदूषणामुळे ही जैवविविधता संकटात सापडली आहे. जागतिक जैवविविधता दिवसाचे औचित्य साधून नागरिकांनी ही जैवविविधता जोपासण्याचा प्रण केला, तरच भविष्यात ही जैवविविधता टिकेल. जिल्ह्यातील गवताळ माळरानात जल अधिवास असलेली तलाव, धरणे व वन विभागाने तयार केलेले कृत्रिम पाणी स्रोतामुळे जैवविविधता संपन्न झाली. जिल्ह्यात वाघापासून तर जंगलातील पक्ष्यांपर्यंत विविध प्रजातीचे पशूपक्षी आढळून येतात. जंगलात सस्तन प्राण्यांच्या ४० प्रजाती आढळून येत असून त्यामध्ये सर्वोच्च स्थान हे वाघाचे आहे. मेळघाटात जवळपास वाघांची संख्या ४० आहे.जिल्ह्यातील जगंलात वाघ बिबट, चितळ, काळवीट, तडस, नीलगाय आदी वन्यप्राण्यांसोबत पक्ष्यांच्या शेकडो प्रजातीसुद्धा आढळून आल्या आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत जंगलाच्या दिशेने वाढती लोकवस्ती वन्यप्राण्यांच्या अधिवासावर घाला घालत आहे. लोकवस्तीतील नागरिक जंगलाच्या दिशेने आगेकूच करीत असल्यामुळे वन्यप्राणी अधिवास सोडून शहराच्या दिशेने वाटचाल करताना आढळून आले आहे. शिकारीचे वाढते जाळे जैवविविधता नष्ट करण्याचे प्रयत्न करीत आहेत. त्यातच जंगलातील पाणी स्त्रोतामध्ये वाढते प्रदूषणसुद्धा जैवविविधतेला गालबोट लावीत आहे. त्यामुळे नागरिकांनी जंगल आणखी समृध्द बनविण्यासाठी व पुढील पिढीसाठी ही जैवविविधता टिकून ठेवण्यासाठी नागरिकांनी आतापासून पाऊल उचलणे गरजेचे आहे.८०० प्रकारचे वृक्ष -वेलीमेळघाट हा विविध वनस्पतीने संपन्न असून तेथे ८०० पेक्षा अधिक वृक्ष, गवत व वेली अशा विविध वनस्पती आढळतात. मात्र, दिवसेंदिवस वाढती वृक्षतोड ही जैवविविधता नष्ट करण्यास कारणीभूत ठरत आहे. (प्रतिनिधी)जैवविविधतेतील प्रत्येक घटक पर्यावरण संतुलन राखण्यासाठी महत्वपूर्ण आहे. पर्यावरण संतुलीत असल्यास मानवी जीवन सुसह्य होईल. त्यासाठी जल, जमीन, जंगल व पर्यायाने त्यांतील जैवविविधता टिकून ठेवण्याचे प्रयत्न करणे गरजेचे आहे. - जयंत वडतकर,मानद वन्यजीव रक्षक.