शहरं
Join us  
Trending Stories
1
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या प्रवाशांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
2
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
3
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 
4
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीचे धक्कादायक खुलासे, टोळीत अनेकांचा समावेश
5
आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला-
6
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
7
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
8
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
9
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
10
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
11
Astro Tips: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी सोमवारी करा २ लवंगांचा सोपा उपाय; विसरून जाल सगळे अपाय!
12
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
13
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
14
अवकाशातून अत्यंत स्पष्ट फोटो मिळाले असते, पण...; पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपणाची मोहीम अयशस्वी
15
अबोल वेदना, गोंधळलेली मने : पुरुषांच्या मानसिक आरोग्याची वेळीच दखल घ्या! मानसोपचारतज्ज्ञांचे आवाहन
16
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
17
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
18
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
19
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
20
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव

जिल्हा काँग्रेसची विधानभवनावर धडक

By admin | Updated: December 12, 2015 00:11 IST

केंद्र व राज्यातील भाजप शिवसेना सरकारच्या कारभाराविरुद्ध रोष व्यक्त करीत जिल्ह्यातील सहा हजार काँग्रेस कार्यकर्त्यांसह शेतकरी, शेतमजुरांनी विधानभवनावर धडक दिली.

अमरावती : केंद्र व राज्यातील भाजप शिवसेना सरकारच्या कारभाराविरुद्ध रोष व्यक्त करीत जिल्ह्यातील सहा हजार काँग्रेस कार्यकर्त्यांसह शेतकरी, शेतमजुरांनी विधानभवनावर धडक दिली. दीक्षाभूमी ते विधानभवनादरम्यान निघालेल्या राज्यस्तरीय मोर्चात अमरावती जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची उपस्थिती जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात लक्षणीय ठरली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्र्वासनाची पूर्ती तर सोडाच परंतु सर्वसामान्य व गरीब जनतेची कोणतीही अपेक्षा युती सरकाने पूर्ण केली नाही. राज्यातील तमाम जनतेची व शेतकऱ्याच्या पाठीशी आजही काँग्रेस पक्ष ठामपणे उभा आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीने काढलेल्या मोर्चात शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करावी, पिकांची नुकसान भरपाई द्यावी, महागाई तातडीने कमी करावी, केशर रेशनधारकांना तातडीने स्वस्त धान्य द्यावे, आरक्षणावर भूमिका जाहीर करावी, संत्रा उत्पादकांना मदत द्यावी आदी मागण्यांसाठी हा धडक मोर्चा विधानभवनावर निघाला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, आमदार वीरेंद्र जगतापल यशोमती ठाकूर, माजी आमदार केवलराम काळे, नरेंशचंद्र ठाकरे, रावसाहेब शेखावत, सुलभा खोडके, प्रदेश सरचिटणीस संजय खोडके, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीश कराळे, अरूणा गोरले, यशवंतराव शेरेकर, दिलीप महल्ले, पुष्पा बोंडे, छाया दंडाळे आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)