शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

जिल्हा बंद उत्स्फूर्त, सर्व सेवा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:31 IST

राजकीय पक्ष, संघटनांचा सहभाग अमरावती : शेतकरी आंदोलनाचे समर्थनार्थ व केंद्र शासनाचे शेतकरीविरोधी कायदा हाणून पाडण्यासाठी विविध राजकीय पक्ष ...

राजकीय पक्ष, संघटनांचा सहभाग

अमरावती : शेतकरी आंदोलनाचे समर्थनार्थ व केंद्र शासनाचे शेतकरीविरोधी कायदा हाणून पाडण्यासाठी विविध राजकीय पक्ष व संघटनांनी मंगळवारी पुकारलेल्या जिल्हा बंदला शहरात संमिश्र व ग्रामीणमध्ये उस्फूर्त प्रतिसाद लाभला. अत्यावश्यक वगळता सर्व सेवा दुपारपर्यंत ठप्प होत्या.

महाविकास आघाडीने सकाळी १० वाजता येथील राजकमल चौकात शेतकरीविरोधी कायदे व केंद्र शासनाचा निषेध करीत रॅली काढली, राजकमल चौक, गांधी चौक, जवाहर गेट, इतवारा बाजार, जयस्तंभ चौक ते इर्विन चौक या मार्गाने रॅली काढण्यात येऊन डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून समारोप करण्यात आला. या रॅलीचे आयोजन महापालिकेचे विरोधी पक्षनेते बबलू शेखावत व माजी महापौर विलास इंगोले यांनी केले होते. यामध्ये आमदार सुलभा खोडके, माजी खासदार अनंत गुढे, शहर कॉग्रेसचे अध्यक्ष किशोर बोरकर, शिवसेनेचे महानगर प्रमुख पराग गुडधे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र महल्ले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे, नाना नागमोते, गटनेता भारत चौधरी, युवक काँग्रेसचे अध्यक्ष निलेश गुहे, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहर अध्यक्ष नंदकिशोर शेरे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने ही बंदची हाक देण्यात आली होती. मंगळवारी सकाळी १० वाजत इर्विन चौकातून डाव्या आघाडीचे घटकपक्ष व काही सामाजिक संघटनांद्वारे निषेध रॅली काढण्यात आली. वंचित बहुजन आघाडी, आप, भाकप, माकप आदींचा यामध्ये सहभाग होता. इतवारा बाजार मार्गाने निघालेली या रॅलीद्वारे चौकाचौकांत शेतकरीविरोधी कायदे व केंद्र शासनाच्या विरुद्ध निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. राजकमल चौकात या रॅलीचा समारोप करण्यात आला. यामध्ये तुकाराम भस्मे, अशोक सोनारकर, अलीम पटेल, सुभाष पांडे, सिद्धार्थ गायकवाड, जे.एम. कोठारी, चंद्रकांत बानुबाकोडे यांच्यासह विविध पक्षांचे पदधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

बॉक्स

मुख्य बाजारपेठ बंद

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व बंदला सहकार्य करण्यासाठी शहराच्या प्रमुख मार्गावरील सर्व मार्केट बंद होते. मात्र, अंतर्गत भागातील काही दुकाने उघडी होती. सकाळी १२ पर्यंत ऑटोरिक्षा सेवा विस्कळीत झालेली होती. काही व्यापारीदेखील बंदच्या रॅलीत सहभागी झाले होते.

बॉक्स

बस सेवा विस्कळीत, महामार्गही ठप्प

बंददरम्यान महामंडळाची एकही बसही आगारातून सुटली नाही. काही संघटनांनी आंदोलनास सहकार्य करण्याचा ठराव केला होता. याव्यतिरिक्त अन्य आगारांतील बस सेवा बंद असल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली, खासगी ट्रॅव्हल्सदेखील सकाळपासून बंद होत्या. महामागार्वरील वाहतूकही विस्कळीत झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आंदोलनात अनुचित प्रकाराची नोंद झाली नाही.