शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
4
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
5
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
6
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
7
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
8
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
9
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
10
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
11
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
12
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
13
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
14
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
15
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
16
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
17
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
18
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
19
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
20
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा

सोयाबीनची उत्पादकता वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:12 IST

अमरावती : सोयाबीनची उत्पादकता वाढविण्यासाठी बीजप्रक्रिया, खत व्यवस्थापन, किड व रोग व्यवस्थापन आदी बाबी सहाय्यभूत ठरत आहे. त्यावर शेतकरी ...

अमरावती : सोयाबीनची उत्पादकता वाढविण्यासाठी बीजप्रक्रिया, खत व्यवस्थापन, किड व रोग व्यवस्थापन आदी बाबी सहाय्यभूत ठरत आहे. त्यावर शेतकरी बांधवांनी भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बुधवारी केले.

सोयाबीन बियाणे नाजूक असल्याने व तीन वर्षांत पीक काढणीच्या वेळेत आलेल्या संततधार पावसाचा सोयाबीन पिकाच्या बियाणे उगवणक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होऊन बियाण्याची उगवण न झाल्याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी स्वत:चे घरगुती बियाणे ठेवणे व बियाणांची उगवणक्षमता तपासूनच पेरणीसाठी ते वापरणे आवश्यक आहे. रासायनिक व जैविक बीजप्रक्रियेचा सोयाबीन बियाण्याच्या उगवणक्षमतेवर चांगला परिणाम होतो. मात्र, सोयाबीन बियाणे कवच नाजूक असल्याने शास्त्रशुद्ध पद्धतीने बीज प्रक्रिया करून तदनंतरच बियाणांचा पेरणीसाठी वापर करणे आवश्यक असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

सोयाबीन पिकाच्या उत्पादनवाढीमध्ये पीक व्यवस्थापनातील लागवड तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका आहे. पीक धनतेसाठी बी.बी.एफ.तंत्रज्ञानाचा अवलंब, टोकन पद्धतीत पेरणी केल्यास मूलस्थानी जलसंधारणामुळे पिकाची वाढ जोमदार होऊन उत्पादनात वृद्धी होते. तसेच यामुळे पेरणीसाठी बियाणे मात्रा कमी लागत असल्याने उत्पादन खर्चात बचत होते, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी दिली.

बॉक्स

खताचा अनावश्यक वापर टाळा

सोयाबीन पिकावर आवश्यक खत मात्रा बहुतांशी पेरणीच्या वेळी देण्यात येतात. त्यामुळे आवश्यक खते शेतकऱ्यांना वेळेत व पुरेशा प्रमाणात उपलब्ध होण्याबाबत नियोजन करावे. सोयाबीन पिकावर चक्री भुंगा, खोडमाशी, पाने खाणाऱ्या अळ्या या प्रमुख किडींचा व शेंग करपा, तांबेरा व मोझॅक या प्रमुख रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते. कृषी विभागाच्या सल्ल्याने नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.

बॉक्स

प्रथ्येक टप्प्यावर व्यवस्स्थापन महत्त्वाचे

कृषी विभागामार्फत सोयाबीन बियाणे तयार करणे, बीज प्रक्रिया, पीक व खत व्यवस्थापन, किड व रोग व्यवस्थापन आदीबाबत जनजागृती करण्यात येत आहे. त्याव्दारे शेतकऱ्यांनी पीक पध्दती व सोयाबीन बियाणे व अनुषंगिक बाबींसंदर्भात मार्गदर्शन घ्यावे. सोयाबीन उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने आवश्यक ठरणाऱ्या उपरोक्त बाबींचा शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीसाठी अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.