शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनची उत्पादकता वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:12 IST

अमरावती : सोयाबीनची उत्पादकता वाढविण्यासाठी बीजप्रक्रिया, खत व्यवस्थापन, किड व रोग व्यवस्थापन आदी बाबी सहाय्यभूत ठरत आहे. त्यावर शेतकरी ...

अमरावती : सोयाबीनची उत्पादकता वाढविण्यासाठी बीजप्रक्रिया, खत व्यवस्थापन, किड व रोग व्यवस्थापन आदी बाबी सहाय्यभूत ठरत आहे. त्यावर शेतकरी बांधवांनी भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बुधवारी केले.

सोयाबीन बियाणे नाजूक असल्याने व तीन वर्षांत पीक काढणीच्या वेळेत आलेल्या संततधार पावसाचा सोयाबीन पिकाच्या बियाणे उगवणक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होऊन बियाण्याची उगवण न झाल्याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी स्वत:चे घरगुती बियाणे ठेवणे व बियाणांची उगवणक्षमता तपासूनच पेरणीसाठी ते वापरणे आवश्यक आहे. रासायनिक व जैविक बीजप्रक्रियेचा सोयाबीन बियाण्याच्या उगवणक्षमतेवर चांगला परिणाम होतो. मात्र, सोयाबीन बियाणे कवच नाजूक असल्याने शास्त्रशुद्ध पद्धतीने बीज प्रक्रिया करून तदनंतरच बियाणांचा पेरणीसाठी वापर करणे आवश्यक असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

सोयाबीन पिकाच्या उत्पादनवाढीमध्ये पीक व्यवस्थापनातील लागवड तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका आहे. पीक धनतेसाठी बी.बी.एफ.तंत्रज्ञानाचा अवलंब, टोकन पद्धतीत पेरणी केल्यास मूलस्थानी जलसंधारणामुळे पिकाची वाढ जोमदार होऊन उत्पादनात वृद्धी होते. तसेच यामुळे पेरणीसाठी बियाणे मात्रा कमी लागत असल्याने उत्पादन खर्चात बचत होते, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी दिली.

बॉक्स

खताचा अनावश्यक वापर टाळा

सोयाबीन पिकावर आवश्यक खत मात्रा बहुतांशी पेरणीच्या वेळी देण्यात येतात. त्यामुळे आवश्यक खते शेतकऱ्यांना वेळेत व पुरेशा प्रमाणात उपलब्ध होण्याबाबत नियोजन करावे. सोयाबीन पिकावर चक्री भुंगा, खोडमाशी, पाने खाणाऱ्या अळ्या या प्रमुख किडींचा व शेंग करपा, तांबेरा व मोझॅक या प्रमुख रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते. कृषी विभागाच्या सल्ल्याने नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.

बॉक्स

प्रथ्येक टप्प्यावर व्यवस्स्थापन महत्त्वाचे

कृषी विभागामार्फत सोयाबीन बियाणे तयार करणे, बीज प्रक्रिया, पीक व खत व्यवस्थापन, किड व रोग व्यवस्थापन आदीबाबत जनजागृती करण्यात येत आहे. त्याव्दारे शेतकऱ्यांनी पीक पध्दती व सोयाबीन बियाणे व अनुषंगिक बाबींसंदर्भात मार्गदर्शन घ्यावे. सोयाबीन उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने आवश्यक ठरणाऱ्या उपरोक्त बाबींचा शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीसाठी अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.