शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

जिल्ह्यात २४९१ पाणी नमुने दूषित, विविध आजारांची लागण

By admin | Updated: April 8, 2017 00:06 IST

जिल्ह्यातील शासकीय व खासगी असे १८ हजार ६४६ पाणी नमुन्यांची तपासणी येथील जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत करण्यात आली आहे.

अमरावती : जिल्ह्यातील शासकीय व खासगी असे १८ हजार ६४६ पाणी नमुन्यांची तपासणी येथील जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत करण्यात आली आहे. त्यापैकी वर्षभरात २ हजार ४९१ पाणी नमुने दूषित आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विविध स्रोतांमधून दूषित पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. पाण्यामध्ये कोलीफार्म नावाचे बॅक्टेरीया (सूक्ष्म जंतू) नसायला पाहिजे, हे जंतु जर पाणी नमुन्यांमध्ये किंवा पाण्यामध्ये पॉझिटिव्ह असेल तर नमुने दूषित मानले जातात. यामुळे विविध प्रकारचे जलजन्य आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कावीळ टायफाईड, डायरिया, कॉलरा तसेच विविध प्रकारचे पोटाचे विकार होतात. महापालिकेचे क्षेत्र, जिल्ह्यातील विविध पालिका, शहरी व ग्रामीण रुग्णालय, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आदी शासकीय कार्यालये तसेच खासगी तपासणीचा यामध्ये समावेश आहे. सदर नमुने तपासणीसाठी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडे जानेवारी ते डिसेंबर २०१६ दरम्यान एकूण १८ हजार ६४६ नमुने पाठविण्यात आले होते. यापैकी २ हजार ४९१ पाणी नमुने आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीअंती दोषी आढळले. पाण्यात कोलीफार्म नावाचा बॅक्टेरीयाचे प्रमाण १३ टक्के एवढे आढळून आले आहे. जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी गेलेल्या पाणी नमुन्यातून सदर बाब स्पष्ट झाली. महापालिका क्षेत्रातील १० हजार २६७ पाणी नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी सर्वाधिक १४०३ पाणी नमुने सदोष आढळले. सदर पाणी पिण्यायोग्य नसल्याचे प्रमाणपत्र संबंधित विभागाला देण्यात आले. अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातून येणाऱ्या नमुन्यांची संख्या ८,३७९ एवढी आहे.कारवाईला नकारघंटाअमरावती : शहरातील अनेक हॉटेल्समध्ये ग्राहकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. यातून हजारो नागरिकांना विविध प्रकारचे आजार होत आहेत. अनेक हॉटेल्समधील पाणी पिण्यायोग्य नसल्याची माहिती आहे. तसा अहवालही संबंधित यंत्रणेला जिल्हा आरोग्य प्रयोेगशाळेतून प्राप्त झाला आहे. यावर कुढलीच कारवाई होताना दिसत नाही, ही खेदाची बाब आहे. हॉटेलमधील पाणी जर पिण्यायोग्य नसेल, तर अन्न व प्रशासन विभागाची ही जबाबदारी नव्हे काय, असा प्रश्न सुज्ञ नागरिक उपस्थित करीत आहेत.