शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
2
“वाह फडणवीस वाह, एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार”
3
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
4
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
5
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
6
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
7
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
8
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
9
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
10
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
11
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
12
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
13
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
14
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
15
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
16
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
17
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
18
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
19
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
20
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण

ग्राहकांना पावती न देताच अंत्योदय योजनेच्या धान्याचे वाटप

By admin | Updated: October 16, 2015 00:47 IST

तालुक्यात ग्रामीण भागात १३४ तर शहरात १० स्वस्त धान्य वितरकांची दुकाने आहेत.

भ्रष्टाचार : पुरवठा विभागाची बघ्याची भूमिकाउमेश होले दर्यापूरतालुक्यात ग्रामीण भागात १३४ तर शहरात १० स्वस्त धान्य वितरकांची दुकाने आहेत. परंतु काही दुकानदार शिधापत्रिकाधारकांना माल विक्रीच्या पावत्या न देताच विक्री करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. ग्रामीण भागात व शहरात अन्न सुरक्षा योजनेचे ९६ हजार ४२४ लाभार्थी आहेत. या योजनेंतर्गत प्रती व्यक्ती ५ किलो धान्य देणे अपेक्षित आहे. यामध्ये २ रुपये किलो गहू व ३ रुपये किलो तांदूळ देण्यात येते. आॅगस्ट महिन्यात अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांसाठी १३८१ क्विंटल धान्य विभागाला प्राप्त झाला व लाभार्थ्यांना वितरित झाल्याचे बोलले जात आहे. परंतु सप्टेंबरमध्ये या योजनेच्या गहू, तांदळाचा तुटवडा असल्यामुळे व मालच न प्राप्त झाल्याने आॅगस्टमधील उरलेला २८२ क्विंटल गहू व ८६५ क्विंटल तांदूळ वितरित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. परंतु अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत. दिवाळी, दसरा तोंडावर असताना गरिबांच्या घरात धान्य नाही, हा प्रकार गंभीर आहे. वडनेरगंगाई येथील एका लाभार्थ्याने तालुका पुरवठा अधिकाऱ्यांकडे तशी तक्रार केली आहे. लाभार्थ्यांना पावती मिळत नसल्यामुळे परस्परच हे धान्य दुकानदार पावत्या लिहून घेतात व लाखो रुपयांचा गौरखधंदा सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र या प्रकाराला तालुका पुरवठा अधिकारी बी.एन. राठोड यांचे अभय असल्याचे समजते. त्यांनी दोन वर्षांत ग्रामीण भागातील स्वस्त धान्य दुकानदारांची तपासणी केली नाही. पुरवठा अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुये गरीबांचा गहू, तांदूळ काही स्वस्त धान्य दुकानदारांच्या घश्यात जात आहे.