शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

ग्राहकांना पावती न देताच अंत्योदय योजनेच्या धान्याचे वाटप

By admin | Updated: October 16, 2015 00:47 IST

तालुक्यात ग्रामीण भागात १३४ तर शहरात १० स्वस्त धान्य वितरकांची दुकाने आहेत.

भ्रष्टाचार : पुरवठा विभागाची बघ्याची भूमिकाउमेश होले दर्यापूरतालुक्यात ग्रामीण भागात १३४ तर शहरात १० स्वस्त धान्य वितरकांची दुकाने आहेत. परंतु काही दुकानदार शिधापत्रिकाधारकांना माल विक्रीच्या पावत्या न देताच विक्री करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. ग्रामीण भागात व शहरात अन्न सुरक्षा योजनेचे ९६ हजार ४२४ लाभार्थी आहेत. या योजनेंतर्गत प्रती व्यक्ती ५ किलो धान्य देणे अपेक्षित आहे. यामध्ये २ रुपये किलो गहू व ३ रुपये किलो तांदूळ देण्यात येते. आॅगस्ट महिन्यात अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांसाठी १३८१ क्विंटल धान्य विभागाला प्राप्त झाला व लाभार्थ्यांना वितरित झाल्याचे बोलले जात आहे. परंतु सप्टेंबरमध्ये या योजनेच्या गहू, तांदळाचा तुटवडा असल्यामुळे व मालच न प्राप्त झाल्याने आॅगस्टमधील उरलेला २८२ क्विंटल गहू व ८६५ क्विंटल तांदूळ वितरित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. परंतु अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत. दिवाळी, दसरा तोंडावर असताना गरिबांच्या घरात धान्य नाही, हा प्रकार गंभीर आहे. वडनेरगंगाई येथील एका लाभार्थ्याने तालुका पुरवठा अधिकाऱ्यांकडे तशी तक्रार केली आहे. लाभार्थ्यांना पावती मिळत नसल्यामुळे परस्परच हे धान्य दुकानदार पावत्या लिहून घेतात व लाखो रुपयांचा गौरखधंदा सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र या प्रकाराला तालुका पुरवठा अधिकारी बी.एन. राठोड यांचे अभय असल्याचे समजते. त्यांनी दोन वर्षांत ग्रामीण भागातील स्वस्त धान्य दुकानदारांची तपासणी केली नाही. पुरवठा अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुये गरीबांचा गहू, तांदूळ काही स्वस्त धान्य दुकानदारांच्या घश्यात जात आहे.