शहरं
Join us  
Trending Stories
1
'जात नाही, तर आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण हवे', सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
2
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
3
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
4
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
5
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
6
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
7
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
8
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
9
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
10
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
11
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
12
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
13
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
14
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
15
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
16
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
18
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
19
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
20
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान

विलगीकरणाला फाटा, घनकचऱ्याची प्रक्रियेविनाच विल्हेवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 22:04 IST

प्रशासन व राजकीय कुरघोडीत अडकलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाअभावी शहरातील घनकचऱ्याची विनाप्रकियाच विल्हेवाट लावली जात आहे. कंत्राटदारांकडील वाहनांमध्ये कचरा विलगीकरणाची सुविधा उपलब्ध नसल्याने ओला व सुका कचरा एकत्रित संकलित करुन सुकळी कंपोस्ट डेपोत साठविला जात असल्याने तेथे कचºयाचा डोंगर साचला आहे.

ठळक मुद्देकचराकोंडी : सुकळीचे प्लास्टिक प्रेसिंग युनिट ठरले पांढरा हत्ती, डीपीआरला प्रशासकीय मान्यतेची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती :प्रशासन व राजकीय कुरघोडीत अडकलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाअभावी शहरातील घनकचऱ्याची विनाप्रकियाच विल्हेवाट लावली जात आहे. कंत्राटदारांकडील वाहनांमध्ये कचरा विलगीकरणाची सुविधा उपलब्ध नसल्याने ओला व सुका कचरा एकत्रित संकलित करुन सुकळी कंपोस्ट डेपोत साठविला जात असल्याने तेथे कचºयाचा डोंगर साचला आहे.आठ लाख लोकसंख्येच्या महापालिका क्षेत्रातून दिवसाकाठी २५० ते ३०० टन कचरा निघतो. कंत्राटदारांच्या माध्यमातून तो संकलित केला जातो. आॅटो व घंटीकटल्याच्या माध्यमातून संकलित केलेला एकत्रित कचरा विविध प्रभागात ठेवलेल्या कंटेनरमध्ये टाकला जातो किंवा नेमून दिलेल्या खुल्या जागेत साठविला जातो. तेथून कंत्रादाराच्या वाहनातून तो कचरा सुकळी कंपोस्ट डेपोत नेऊन साठविला जातो. सुकळी कंपोस्ट डेपोत आधीच ७ ते ८ लाख मेट्रीक टन कचरा विनाप्रक्रिया पडून आहे. त्यात दिवसाकाठी निघणाºया २५० ते ३०० टन कचºयाची भर पडत आहे. नगरविकास विभागाने वारंवार शासनादेश काढून १०० टक्के कचरा विलगीकरणाचे उद्दिष्ट महापालिकेला दिले. मात्र, महापालिकेला अद्यापही ते उद्दिष्ट गाठता आलेले नाही. दररोज १०० किलो व त्यापेक्षा अधिक कचरा निर्मिती होणाºया सदनिका व वसाहतींनी निर्मितीच्या जागीच कचºयावर प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. मात्र शहरात तसा प्रयोग करण्यास कुणीही धजावलेला नाही. स्वच्छ सर्वेक्षण २०१७ मध्ये शहर २४१ व्या क्रमांकावर राहिल्याने हॉटेल वेस्टवर प्रक्रिया करणारा प्रकल्प इतवारा बाजारात कसाबसा साकारण्यात आला. हॉटेल वेस्टवर प्रक्रिया करणारा १ मेट्रीक टन क्षमतेचा हा प्रकल्प वगळल्यास शहरातील घनकचºयाची विनाप्रक्रिया वाहतूक व विल्हेवाट लावली जाते. सुकळी ग्रामस्थांचा कचरा साठवणुकीला विरोध वाढू लागला आहे.‘तो’ प्रकल्प बंदचसुकळी कंपोस्ट डेपोत गाजावाजा करुन प्लास्टिक प्रेसिंग युनिट उभारण्यात आले. दैनंदिन कचºयातून निघणारे प्लास्टिक वेगळे करुन त्याचे आकारमान कमी करायचे व त्या प्लास्टिकच्या गाठी विकायच्या असा त्यामागील हेतू होता. २ आॅक्टोबर २०१६ रोजी त्याप्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. तथापि तेथे शहर फिडरवरुन थ्री फेज विजपुरवठा नसल्याने अपवाद वगळता तो प्रकल्प सुरुवातीपासून बंदावस्थेत आहे.तीन प्रकल्प प्रस्तावितसुकळी कंपोस्ट डेपोत २००, अकोली बायपास भागात १०० व बडनेरा कोंडेश्वर येथे ५० मेट्रीक टन क्षमतेचे तीन घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. या प्रकल्पांच्या ४०.७० कोटी रुपयांच्या डीपीआरला राज्यसरकारने आठवड्यापूर्वी तत्वत: मान्यता दिली आहे. महापालिका प्रशासनाला त्या प्रकल्पांच्या प्रशासकीय मान्यतेची प्रतीक्षा आहे.आरोग्याचा प्रश्नशहरातील कचऱ्याच्या समस्येने डेंग्यू व साथीच्या अन्य आजारांना सामोरे जावे लागत आहे. सुक ळी कंपोस्ट डेपोत साठविलेल्या कचºयाची दुर्गंधी व तेथील कचऱ्याला वारंवार लागणाºया आगीच्या घटनांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कचऱ्याच्या डोंगराला लागणाºया आगींमुळे प्रदुषणात भर पडली आहे. पावसाळयात या घनकचऱ्याला प्रचंड दुर्गंधी सुटत असल्याने नागरिकांना नाक दाबून ये-जा करावी लागते.