शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

विलगीकरणाला फाटा, घनकचऱ्याची प्रक्रियेविनाच विल्हेवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 22:04 IST

प्रशासन व राजकीय कुरघोडीत अडकलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाअभावी शहरातील घनकचऱ्याची विनाप्रकियाच विल्हेवाट लावली जात आहे. कंत्राटदारांकडील वाहनांमध्ये कचरा विलगीकरणाची सुविधा उपलब्ध नसल्याने ओला व सुका कचरा एकत्रित संकलित करुन सुकळी कंपोस्ट डेपोत साठविला जात असल्याने तेथे कचºयाचा डोंगर साचला आहे.

ठळक मुद्देकचराकोंडी : सुकळीचे प्लास्टिक प्रेसिंग युनिट ठरले पांढरा हत्ती, डीपीआरला प्रशासकीय मान्यतेची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती :प्रशासन व राजकीय कुरघोडीत अडकलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाअभावी शहरातील घनकचऱ्याची विनाप्रकियाच विल्हेवाट लावली जात आहे. कंत्राटदारांकडील वाहनांमध्ये कचरा विलगीकरणाची सुविधा उपलब्ध नसल्याने ओला व सुका कचरा एकत्रित संकलित करुन सुकळी कंपोस्ट डेपोत साठविला जात असल्याने तेथे कचºयाचा डोंगर साचला आहे.आठ लाख लोकसंख्येच्या महापालिका क्षेत्रातून दिवसाकाठी २५० ते ३०० टन कचरा निघतो. कंत्राटदारांच्या माध्यमातून तो संकलित केला जातो. आॅटो व घंटीकटल्याच्या माध्यमातून संकलित केलेला एकत्रित कचरा विविध प्रभागात ठेवलेल्या कंटेनरमध्ये टाकला जातो किंवा नेमून दिलेल्या खुल्या जागेत साठविला जातो. तेथून कंत्रादाराच्या वाहनातून तो कचरा सुकळी कंपोस्ट डेपोत नेऊन साठविला जातो. सुकळी कंपोस्ट डेपोत आधीच ७ ते ८ लाख मेट्रीक टन कचरा विनाप्रक्रिया पडून आहे. त्यात दिवसाकाठी निघणाºया २५० ते ३०० टन कचºयाची भर पडत आहे. नगरविकास विभागाने वारंवार शासनादेश काढून १०० टक्के कचरा विलगीकरणाचे उद्दिष्ट महापालिकेला दिले. मात्र, महापालिकेला अद्यापही ते उद्दिष्ट गाठता आलेले नाही. दररोज १०० किलो व त्यापेक्षा अधिक कचरा निर्मिती होणाºया सदनिका व वसाहतींनी निर्मितीच्या जागीच कचºयावर प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. मात्र शहरात तसा प्रयोग करण्यास कुणीही धजावलेला नाही. स्वच्छ सर्वेक्षण २०१७ मध्ये शहर २४१ व्या क्रमांकावर राहिल्याने हॉटेल वेस्टवर प्रक्रिया करणारा प्रकल्प इतवारा बाजारात कसाबसा साकारण्यात आला. हॉटेल वेस्टवर प्रक्रिया करणारा १ मेट्रीक टन क्षमतेचा हा प्रकल्प वगळल्यास शहरातील घनकचºयाची विनाप्रक्रिया वाहतूक व विल्हेवाट लावली जाते. सुकळी ग्रामस्थांचा कचरा साठवणुकीला विरोध वाढू लागला आहे.‘तो’ प्रकल्प बंदचसुकळी कंपोस्ट डेपोत गाजावाजा करुन प्लास्टिक प्रेसिंग युनिट उभारण्यात आले. दैनंदिन कचºयातून निघणारे प्लास्टिक वेगळे करुन त्याचे आकारमान कमी करायचे व त्या प्लास्टिकच्या गाठी विकायच्या असा त्यामागील हेतू होता. २ आॅक्टोबर २०१६ रोजी त्याप्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. तथापि तेथे शहर फिडरवरुन थ्री फेज विजपुरवठा नसल्याने अपवाद वगळता तो प्रकल्प सुरुवातीपासून बंदावस्थेत आहे.तीन प्रकल्प प्रस्तावितसुकळी कंपोस्ट डेपोत २००, अकोली बायपास भागात १०० व बडनेरा कोंडेश्वर येथे ५० मेट्रीक टन क्षमतेचे तीन घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. या प्रकल्पांच्या ४०.७० कोटी रुपयांच्या डीपीआरला राज्यसरकारने आठवड्यापूर्वी तत्वत: मान्यता दिली आहे. महापालिका प्रशासनाला त्या प्रकल्पांच्या प्रशासकीय मान्यतेची प्रतीक्षा आहे.आरोग्याचा प्रश्नशहरातील कचऱ्याच्या समस्येने डेंग्यू व साथीच्या अन्य आजारांना सामोरे जावे लागत आहे. सुक ळी कंपोस्ट डेपोत साठविलेल्या कचºयाची दुर्गंधी व तेथील कचऱ्याला वारंवार लागणाºया आगीच्या घटनांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कचऱ्याच्या डोंगराला लागणाºया आगींमुळे प्रदुषणात भर पडली आहे. पावसाळयात या घनकचऱ्याला प्रचंड दुर्गंधी सुटत असल्याने नागरिकांना नाक दाबून ये-जा करावी लागते.