शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
5
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
6
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
7
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
8
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
9
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
10
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
11
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
12
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
13
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
14
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
15
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
16
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
17
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
18
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
19
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
20
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"

बदलीसाठी दबावतंत्राचा वापर केल्यास शिस्तभंगाची कारवाई

By admin | Updated: May 15, 2015 00:05 IST

राज्य शासनाच्या विविध विभागातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना एप्रिल मे मध्ये प्रारंभ होत असतो.

अमरावती : राज्य शासनाच्या विविध विभागातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना एप्रिल मे मध्ये प्रारंभ होत असतो. त्यामुळे बदल्यांच्या काळात मोजक्याच जागी अथवा चांगले पद मिळविण्यासाठी आमदार, खासदार व अन्य लोकप्रतिनिधींकडून वशिला दबाव आणण्याचेही प्रमाण अधिक असते. मात्र दबाव तंत्राचा वापर केल्यास कर्मचारी अथवा अधिकाऱ्यांच्या विरोधात आश्यकतेप्रमाणे शिस्तभंगाच्या कारवाईचे निर्देश राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत. शासकीय कामात पारदर्शकता आणण्यासाठी व बदल्यांची प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी नवीन शासनाने बदली कायद्याचे काटेकोर पालन करण्याचे ठरविले आहे. मध्यावधी बदल्या करताना या कायद्यातील तरतुदीचे पालन करण्याच्या सूचना आणि आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत. त्यात म्हटले आहे की, तीन वर्षांचा कालावधी पूर्ण केल्याशिवाय कर्मचाऱ्यांची अथवा अधिकाऱ्यांची बदली करु नये. शासकीय कर्मचारी व अधिकारी यांच्या बदल्या एप्रिल - मे मध्ये केल्या जाव्यात. एखाद्या प्रकरणात ३ वर्षापेक्षा कमी कालावधी असलेल्या कर्मचाऱ्यांविरुद्ध गैरवर्तणुकीची तक्रार असल्यास आणि त्यात काही तथ्य आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्याला त्याच पदावर ठेवून त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करावी. तसेच त्या कर्मचाऱ्यांची बदली करायची की नाही, पुरावे झाल्याशिवाय शिफारस करता येणार नाही, असेही निर्देश देण्यात आले आहेत. गैरप्रकारांना आळा बसणारएखाद्या कर्मचाऱ्यांवर गैरवर्तणुकीचा आरोप अथवा कारवाई प्रस्तावित झाल्यास त्या कर्मचाऱ्याला त्याच पदावर ठेवून शिस्तभंगाची कारवाई करावी. मात्र त्या कर्मचाऱ्याला पदावर ठेवणे योग्य नाही, असे आढळून आले तर त्याची योग्य अशी कारणमीमांसा देत त्यांच्या बदलीची शिफारस वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करावी. स्वत:च्या सोयीसाठी अनेक कर्मचारी बदली करुन घेतात. अशा आहेत मार्गदर्शक सूचनावर्षातून केवळ एप्रिल, मे महिन्यातच बदल्या कराव्यात. तीन वर्षांचा कालावधी पूर्ण केल्याशिवाय बदली प्रस्तावित करु नये. कोणत्याही संवर्गासाठी धोरण सारखेच ठेवावे. तीन वर्षांच्या आधीच कर्मचाऱ्यांची बदली करायची झाल्यास त्यासाठी योग्य कारणे सादर करुन वरिष्ठ अधिकाऱ्यांची सहमती घ्यावी. दबावतंत्राचा वापर केल्यास आवश्यकतेप्रमाणे शिस्तभंगाची कारवाई करावी. बदली कायद्याचे काटेकोर पालन करावे.