शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होणार की नाही? संभ्रम वाढला; मनसे नेते म्हणतात, “एकटे लढू, तयारी आहे”
2
मोठी बातमी : केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला होणारी फाशी टळली, भारताच्या मुत्सद्देगिरीला यश, पडद्यामागे घडल्या अशा घडामोडी 
3
चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याच्या किंमतीतही झाला बदल; १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार
4
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
5
असं काय घडलं की लिव्हइनमध्ये राहणाऱ्या बॉयफ्रेंडनं दोन मुलांच्या आईला यमसदनी धाडलं?
6
WTC Points Table : ऑस्ट्रेलिया १०० टक्केसह टॉपर! टीम इंडियापेक्षा अजूनही श्रीलंकन भारी!
7
"झोप येत नाहीये...!"; राधिका यादव हत्या प्रकरणात 'लव्ह जिहाद'च्या चर्चेवर आईची शपथ घेत काय म्हणाला इनामुल हक?
8
अंगठी विकता विकता कोट्यधीश बनला, दुबईहून यायचे मौलाना; गरीब युवतींना 'असं' जाळ्यात अडकवायचे, मग...
9
अमेरिकेत ३८ लाख, मग भारतात Tesla ची कार इतकी महाग का? जाणून घ्या कारण...
10
हृदयद्रावक! आधी सासू-सासरे अन् आता २९ वर्षीय नवऱ्याचा मृत्यू; घरात एकटीच राहिली सून
11
धावत्या बसमध्येच प्रसूती, नंतर बाळाला बाहेर फेकलं; कथित पती-पत्नीचा अमानुष प्रकार
12
"एकनाथ शिंदे पण त्यातलेच!" संजय गायकवाड आणि संजय शिरसाठ यांचे नाव घेत अंबादास दानवे संतापले!
13
शिंदेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये पडणार खिंडार, माजी खासदार हेमंत गोडसेही भाजपच्या वाटेवर?
14
SBI, HDFC सह ६ म्युच्युअल फंडांनी 'या' १३ स्मॉल कॅप कंपन्यांमधून काढले हात! तुमचे तर पैसे नाहीत ना?
15
अमेरिकेने भारताला दिले गिफ्ट, पाकिस्तानचा थयथयाट; घातक फायटर जेटसाठी पाठवले खास इंजिन
16
Ganpati Extra Buses for Konkan : गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
17
SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेला ATM, UPI, IMPS, NEFT सेवा राहणार बंद; पाहा डिटेल्स
18
Air India Plane Crash : मोठा दावा! विमान अपघातापूर्वीच इंधन नियंत्रण स्विच खराब असल्याचा इशारा'CAA'ने दिला होता
19
Raigad Heavy Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
20
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार

बदलीसाठी दबावतंत्राचा वापर केल्यास शिस्तभंगाची कारवाई

By admin | Updated: May 15, 2015 00:05 IST

राज्य शासनाच्या विविध विभागातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना एप्रिल मे मध्ये प्रारंभ होत असतो.

अमरावती : राज्य शासनाच्या विविध विभागातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना एप्रिल मे मध्ये प्रारंभ होत असतो. त्यामुळे बदल्यांच्या काळात मोजक्याच जागी अथवा चांगले पद मिळविण्यासाठी आमदार, खासदार व अन्य लोकप्रतिनिधींकडून वशिला दबाव आणण्याचेही प्रमाण अधिक असते. मात्र दबाव तंत्राचा वापर केल्यास कर्मचारी अथवा अधिकाऱ्यांच्या विरोधात आश्यकतेप्रमाणे शिस्तभंगाच्या कारवाईचे निर्देश राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत. शासकीय कामात पारदर्शकता आणण्यासाठी व बदल्यांची प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी नवीन शासनाने बदली कायद्याचे काटेकोर पालन करण्याचे ठरविले आहे. मध्यावधी बदल्या करताना या कायद्यातील तरतुदीचे पालन करण्याच्या सूचना आणि आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत. त्यात म्हटले आहे की, तीन वर्षांचा कालावधी पूर्ण केल्याशिवाय कर्मचाऱ्यांची अथवा अधिकाऱ्यांची बदली करु नये. शासकीय कर्मचारी व अधिकारी यांच्या बदल्या एप्रिल - मे मध्ये केल्या जाव्यात. एखाद्या प्रकरणात ३ वर्षापेक्षा कमी कालावधी असलेल्या कर्मचाऱ्यांविरुद्ध गैरवर्तणुकीची तक्रार असल्यास आणि त्यात काही तथ्य आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्याला त्याच पदावर ठेवून त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करावी. तसेच त्या कर्मचाऱ्यांची बदली करायची की नाही, पुरावे झाल्याशिवाय शिफारस करता येणार नाही, असेही निर्देश देण्यात आले आहेत. गैरप्रकारांना आळा बसणारएखाद्या कर्मचाऱ्यांवर गैरवर्तणुकीचा आरोप अथवा कारवाई प्रस्तावित झाल्यास त्या कर्मचाऱ्याला त्याच पदावर ठेवून शिस्तभंगाची कारवाई करावी. मात्र त्या कर्मचाऱ्याला पदावर ठेवणे योग्य नाही, असे आढळून आले तर त्याची योग्य अशी कारणमीमांसा देत त्यांच्या बदलीची शिफारस वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करावी. स्वत:च्या सोयीसाठी अनेक कर्मचारी बदली करुन घेतात. अशा आहेत मार्गदर्शक सूचनावर्षातून केवळ एप्रिल, मे महिन्यातच बदल्या कराव्यात. तीन वर्षांचा कालावधी पूर्ण केल्याशिवाय बदली प्रस्तावित करु नये. कोणत्याही संवर्गासाठी धोरण सारखेच ठेवावे. तीन वर्षांच्या आधीच कर्मचाऱ्यांची बदली करायची झाल्यास त्यासाठी योग्य कारणे सादर करुन वरिष्ठ अधिकाऱ्यांची सहमती घ्यावी. दबावतंत्राचा वापर केल्यास आवश्यकतेप्रमाणे शिस्तभंगाची कारवाई करावी. बदली कायद्याचे काटेकोर पालन करावे.