शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
2
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
3
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
4
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
5
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
6
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
7
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
8
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
9
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
10
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
11
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
12
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
13
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
14
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
15
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश
16
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
17
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन
18
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
19
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
20
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"

बदलीसाठी दबावतंत्राचा वापर केल्यास शिस्तभंगाची कारवाई

By admin | Updated: May 15, 2015 00:05 IST

राज्य शासनाच्या विविध विभागातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना एप्रिल मे मध्ये प्रारंभ होत असतो.

अमरावती : राज्य शासनाच्या विविध विभागातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना एप्रिल मे मध्ये प्रारंभ होत असतो. त्यामुळे बदल्यांच्या काळात मोजक्याच जागी अथवा चांगले पद मिळविण्यासाठी आमदार, खासदार व अन्य लोकप्रतिनिधींकडून वशिला दबाव आणण्याचेही प्रमाण अधिक असते. मात्र दबाव तंत्राचा वापर केल्यास कर्मचारी अथवा अधिकाऱ्यांच्या विरोधात आश्यकतेप्रमाणे शिस्तभंगाच्या कारवाईचे निर्देश राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत. शासकीय कामात पारदर्शकता आणण्यासाठी व बदल्यांची प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी नवीन शासनाने बदली कायद्याचे काटेकोर पालन करण्याचे ठरविले आहे. मध्यावधी बदल्या करताना या कायद्यातील तरतुदीचे पालन करण्याच्या सूचना आणि आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत. त्यात म्हटले आहे की, तीन वर्षांचा कालावधी पूर्ण केल्याशिवाय कर्मचाऱ्यांची अथवा अधिकाऱ्यांची बदली करु नये. शासकीय कर्मचारी व अधिकारी यांच्या बदल्या एप्रिल - मे मध्ये केल्या जाव्यात. एखाद्या प्रकरणात ३ वर्षापेक्षा कमी कालावधी असलेल्या कर्मचाऱ्यांविरुद्ध गैरवर्तणुकीची तक्रार असल्यास आणि त्यात काही तथ्य आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्याला त्याच पदावर ठेवून त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करावी. तसेच त्या कर्मचाऱ्यांची बदली करायची की नाही, पुरावे झाल्याशिवाय शिफारस करता येणार नाही, असेही निर्देश देण्यात आले आहेत. गैरप्रकारांना आळा बसणारएखाद्या कर्मचाऱ्यांवर गैरवर्तणुकीचा आरोप अथवा कारवाई प्रस्तावित झाल्यास त्या कर्मचाऱ्याला त्याच पदावर ठेवून शिस्तभंगाची कारवाई करावी. मात्र त्या कर्मचाऱ्याला पदावर ठेवणे योग्य नाही, असे आढळून आले तर त्याची योग्य अशी कारणमीमांसा देत त्यांच्या बदलीची शिफारस वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करावी. स्वत:च्या सोयीसाठी अनेक कर्मचारी बदली करुन घेतात. अशा आहेत मार्गदर्शक सूचनावर्षातून केवळ एप्रिल, मे महिन्यातच बदल्या कराव्यात. तीन वर्षांचा कालावधी पूर्ण केल्याशिवाय बदली प्रस्तावित करु नये. कोणत्याही संवर्गासाठी धोरण सारखेच ठेवावे. तीन वर्षांच्या आधीच कर्मचाऱ्यांची बदली करायची झाल्यास त्यासाठी योग्य कारणे सादर करुन वरिष्ठ अधिकाऱ्यांची सहमती घ्यावी. दबावतंत्राचा वापर केल्यास आवश्यकतेप्रमाणे शिस्तभंगाची कारवाई करावी. बदली कायद्याचे काटेकोर पालन करावे.