शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

अहवालापूर्वीच स्वाईन फ्लूच्या रुग्णाला डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 23:12 IST

भातकुली तालुक्यातील कामनापूर येथील रहिवासी असलेल्या एका महिलेला स्वाईन फ्लू संशयित म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले होते.

ठळक मुद्देरुग्णांच्या जीवाशी खेळ : मृत्यूनंतर आरोग्य यंत्रणा कामनापूरमध्ये दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कटाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यातील कामनापूर येथील रहिवासी असलेल्या एका महिलेला स्वाईन फ्लू संशयित म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले होते. रुग्णाच्या नातेवाईकांच्या मागणीवरून त्या रुग्णाला गुरूवारी 'डिस्चार्ज' देण्यात आला. मात्र, शुक्रवारी स्वाईन फ्लूचा पॉझिटिव्ह अहवाल इर्विनला प्राप्त होताच आरोग्य यंत्रणेत एकच खळबळ उडाली. त्या महिलेला शुक्रवारी इर्विनमध्ये दाखल केले आणि आज शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे आरोग्य यंत्रणा गावात दाखल झाली व अख्ख्या गावाची आरोग्य तपासणी करीत १५ ते २० रुग्णांना संशयित म्हणून इर्विनमध्ये दाखल केले.प्रभा बाबूलाल कांबळे (६०) असे या रुग्णाचे नाव आहे. दसºयाच्या दिवशी ३० सप्टेंबरला या महिलेला दमा, अस्थमा, ताप व उच्च रक्तदाबामुळे आयसीयूत भरती केले होते. त्यानंतर ३ आॅक्टोबरला या महिलेला सुटी देण्यात आली. पुन्हा ४ आॅक्टोबर रोजी भरती केले. इर्विनमधून ६ आॅक्टोबरला चांदूरबाजार येथील खासगी रुग्णालयात तिला हलविण्यात आले. १० आॅक्टोबरपर्यंत ती चांदूरबाजार येथील रुग्णालयात दाखल होती. त्यानंतर पुन्हा १० आॅक्टोबरला इर्विनमध्ये दाखल करण्यात आले. ११ आॅक्टोबरला त्यांच्यावर स्वाई फ्लूचे उपचार करण्यात आले. परंतु, १२ आॅक्टोबर रोजी त्यांच्या नातेवाईकांच्या मागणीवरून तिला डिस्चार्ज देण्यात आला. परंतु, १३ आॅक्टोबरला जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून नागपूर येथे पाठविण्यात आलेल्या आरोग्य तपासणीचा अहवाल प्राप्त झाला आणि आरोग्य यंत्रणेमध्ये एकच खळबळ उडाली कारण सदर रुग्ण स्वाईन फ्लूसदृश असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे शुक्रवारी तत्काळ या रुग्णाला कामनापूर येथून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि शनिवारी दुपारी त्या महिला रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे आरोग्य यंत्रणेमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले यांच्या आष्टी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी राजेंद्र दाळू व त्यांचे पथक कामनापुरात दाखल झाले. त्यांनी गावातील संशयितांची तपासणी करून त्यांना इर्विनला रेफर केले होते.अख्ख्या गावाची तपासणीकामनापूर हे ७६८ लोकसंख्येचे गाव आहे. रुग्णाच्या मृत्यूनंतर आज आरोग्य यंत्रणा गावात दाखल झाली. प्रत्येक घारत आरोग्य तपासणी यातील १५ ते २० जणांना खोकला, ताप, असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले आहे. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सुरूवातीला सदर रुग्णाला दमा, ताप, रक्तदाबामुळे इर्विनमध्ये दाखल केले होते. परंतु संशय असल्याने आम्ही ४ आॅक्टोबरला स्वाईन फ्लूची तपासणी करून त्यांचा अहवाल नागपूरला पाठविला होता. दरम्यान, रुग्णाच्या नातेवाईकांनी विनंती केल्यानंतर व त्यांनी स्वत: लेखी दिल्यानंतर या रुग्णाला सुटी दिली होती. १२ आॅक्टोबरला स्वाईनफ्लूचा अहवाल प्राप्त होताच सदर रुग्णाला आम्ही पुन्हा भरती करून घेतले होते.-श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सककामनापूर येथे स्वाईन फ्लूचा रुग्ण असल्याचे सिद्ध झाल्याने आम्ही दक्षता म्हणून संपूर्ण गावाची पाहणी केली आहे. यातील ताप, खोकला, असलेल्या १५ ते २० जणांना इर्विनमध्ये उपचाराकरिता नेले आहे. सध्या कोणताही रुग्ण संशयीत नाही.- सुरेश आसोले, जिल्हा आरोग्य अधिकारी