शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

अहवालापूर्वीच स्वाईन फ्लूच्या रुग्णाला डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 23:12 IST

भातकुली तालुक्यातील कामनापूर येथील रहिवासी असलेल्या एका महिलेला स्वाईन फ्लू संशयित म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले होते.

ठळक मुद्देरुग्णांच्या जीवाशी खेळ : मृत्यूनंतर आरोग्य यंत्रणा कामनापूरमध्ये दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कटाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यातील कामनापूर येथील रहिवासी असलेल्या एका महिलेला स्वाईन फ्लू संशयित म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले होते. रुग्णाच्या नातेवाईकांच्या मागणीवरून त्या रुग्णाला गुरूवारी 'डिस्चार्ज' देण्यात आला. मात्र, शुक्रवारी स्वाईन फ्लूचा पॉझिटिव्ह अहवाल इर्विनला प्राप्त होताच आरोग्य यंत्रणेत एकच खळबळ उडाली. त्या महिलेला शुक्रवारी इर्विनमध्ये दाखल केले आणि आज शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे आरोग्य यंत्रणा गावात दाखल झाली व अख्ख्या गावाची आरोग्य तपासणी करीत १५ ते २० रुग्णांना संशयित म्हणून इर्विनमध्ये दाखल केले.प्रभा बाबूलाल कांबळे (६०) असे या रुग्णाचे नाव आहे. दसºयाच्या दिवशी ३० सप्टेंबरला या महिलेला दमा, अस्थमा, ताप व उच्च रक्तदाबामुळे आयसीयूत भरती केले होते. त्यानंतर ३ आॅक्टोबरला या महिलेला सुटी देण्यात आली. पुन्हा ४ आॅक्टोबर रोजी भरती केले. इर्विनमधून ६ आॅक्टोबरला चांदूरबाजार येथील खासगी रुग्णालयात तिला हलविण्यात आले. १० आॅक्टोबरपर्यंत ती चांदूरबाजार येथील रुग्णालयात दाखल होती. त्यानंतर पुन्हा १० आॅक्टोबरला इर्विनमध्ये दाखल करण्यात आले. ११ आॅक्टोबरला त्यांच्यावर स्वाई फ्लूचे उपचार करण्यात आले. परंतु, १२ आॅक्टोबर रोजी त्यांच्या नातेवाईकांच्या मागणीवरून तिला डिस्चार्ज देण्यात आला. परंतु, १३ आॅक्टोबरला जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून नागपूर येथे पाठविण्यात आलेल्या आरोग्य तपासणीचा अहवाल प्राप्त झाला आणि आरोग्य यंत्रणेमध्ये एकच खळबळ उडाली कारण सदर रुग्ण स्वाईन फ्लूसदृश असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे शुक्रवारी तत्काळ या रुग्णाला कामनापूर येथून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि शनिवारी दुपारी त्या महिला रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे आरोग्य यंत्रणेमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले यांच्या आष्टी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी राजेंद्र दाळू व त्यांचे पथक कामनापुरात दाखल झाले. त्यांनी गावातील संशयितांची तपासणी करून त्यांना इर्विनला रेफर केले होते.अख्ख्या गावाची तपासणीकामनापूर हे ७६८ लोकसंख्येचे गाव आहे. रुग्णाच्या मृत्यूनंतर आज आरोग्य यंत्रणा गावात दाखल झाली. प्रत्येक घारत आरोग्य तपासणी यातील १५ ते २० जणांना खोकला, ताप, असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले आहे. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सुरूवातीला सदर रुग्णाला दमा, ताप, रक्तदाबामुळे इर्विनमध्ये दाखल केले होते. परंतु संशय असल्याने आम्ही ४ आॅक्टोबरला स्वाईन फ्लूची तपासणी करून त्यांचा अहवाल नागपूरला पाठविला होता. दरम्यान, रुग्णाच्या नातेवाईकांनी विनंती केल्यानंतर व त्यांनी स्वत: लेखी दिल्यानंतर या रुग्णाला सुटी दिली होती. १२ आॅक्टोबरला स्वाईनफ्लूचा अहवाल प्राप्त होताच सदर रुग्णाला आम्ही पुन्हा भरती करून घेतले होते.-श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सककामनापूर येथे स्वाईन फ्लूचा रुग्ण असल्याचे सिद्ध झाल्याने आम्ही दक्षता म्हणून संपूर्ण गावाची पाहणी केली आहे. यातील ताप, खोकला, असलेल्या १५ ते २० जणांना इर्विनमध्ये उपचाराकरिता नेले आहे. सध्या कोणताही रुग्ण संशयीत नाही.- सुरेश आसोले, जिल्हा आरोग्य अधिकारी