शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

अहवालापूर्वीच स्वाईन फ्लूच्या रुग्णाला डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 23:12 IST

भातकुली तालुक्यातील कामनापूर येथील रहिवासी असलेल्या एका महिलेला स्वाईन फ्लू संशयित म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले होते.

ठळक मुद्देरुग्णांच्या जीवाशी खेळ : मृत्यूनंतर आरोग्य यंत्रणा कामनापूरमध्ये दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कटाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यातील कामनापूर येथील रहिवासी असलेल्या एका महिलेला स्वाईन फ्लू संशयित म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले होते. रुग्णाच्या नातेवाईकांच्या मागणीवरून त्या रुग्णाला गुरूवारी 'डिस्चार्ज' देण्यात आला. मात्र, शुक्रवारी स्वाईन फ्लूचा पॉझिटिव्ह अहवाल इर्विनला प्राप्त होताच आरोग्य यंत्रणेत एकच खळबळ उडाली. त्या महिलेला शुक्रवारी इर्विनमध्ये दाखल केले आणि आज शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे आरोग्य यंत्रणा गावात दाखल झाली व अख्ख्या गावाची आरोग्य तपासणी करीत १५ ते २० रुग्णांना संशयित म्हणून इर्विनमध्ये दाखल केले.प्रभा बाबूलाल कांबळे (६०) असे या रुग्णाचे नाव आहे. दसºयाच्या दिवशी ३० सप्टेंबरला या महिलेला दमा, अस्थमा, ताप व उच्च रक्तदाबामुळे आयसीयूत भरती केले होते. त्यानंतर ३ आॅक्टोबरला या महिलेला सुटी देण्यात आली. पुन्हा ४ आॅक्टोबर रोजी भरती केले. इर्विनमधून ६ आॅक्टोबरला चांदूरबाजार येथील खासगी रुग्णालयात तिला हलविण्यात आले. १० आॅक्टोबरपर्यंत ती चांदूरबाजार येथील रुग्णालयात दाखल होती. त्यानंतर पुन्हा १० आॅक्टोबरला इर्विनमध्ये दाखल करण्यात आले. ११ आॅक्टोबरला त्यांच्यावर स्वाई फ्लूचे उपचार करण्यात आले. परंतु, १२ आॅक्टोबर रोजी त्यांच्या नातेवाईकांच्या मागणीवरून तिला डिस्चार्ज देण्यात आला. परंतु, १३ आॅक्टोबरला जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून नागपूर येथे पाठविण्यात आलेल्या आरोग्य तपासणीचा अहवाल प्राप्त झाला आणि आरोग्य यंत्रणेमध्ये एकच खळबळ उडाली कारण सदर रुग्ण स्वाईन फ्लूसदृश असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे शुक्रवारी तत्काळ या रुग्णाला कामनापूर येथून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि शनिवारी दुपारी त्या महिला रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे आरोग्य यंत्रणेमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले यांच्या आष्टी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी राजेंद्र दाळू व त्यांचे पथक कामनापुरात दाखल झाले. त्यांनी गावातील संशयितांची तपासणी करून त्यांना इर्विनला रेफर केले होते.अख्ख्या गावाची तपासणीकामनापूर हे ७६८ लोकसंख्येचे गाव आहे. रुग्णाच्या मृत्यूनंतर आज आरोग्य यंत्रणा गावात दाखल झाली. प्रत्येक घारत आरोग्य तपासणी यातील १५ ते २० जणांना खोकला, ताप, असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले आहे. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सुरूवातीला सदर रुग्णाला दमा, ताप, रक्तदाबामुळे इर्विनमध्ये दाखल केले होते. परंतु संशय असल्याने आम्ही ४ आॅक्टोबरला स्वाईन फ्लूची तपासणी करून त्यांचा अहवाल नागपूरला पाठविला होता. दरम्यान, रुग्णाच्या नातेवाईकांनी विनंती केल्यानंतर व त्यांनी स्वत: लेखी दिल्यानंतर या रुग्णाला सुटी दिली होती. १२ आॅक्टोबरला स्वाईनफ्लूचा अहवाल प्राप्त होताच सदर रुग्णाला आम्ही पुन्हा भरती करून घेतले होते.-श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सककामनापूर येथे स्वाईन फ्लूचा रुग्ण असल्याचे सिद्ध झाल्याने आम्ही दक्षता म्हणून संपूर्ण गावाची पाहणी केली आहे. यातील ताप, खोकला, असलेल्या १५ ते २० जणांना इर्विनमध्ये उपचाराकरिता नेले आहे. सध्या कोणताही रुग्ण संशयीत नाही.- सुरेश आसोले, जिल्हा आरोग्य अधिकारी