शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

आपत्ती व्यवस्थापन विभागाला सरावाची गरज

By admin | Updated: June 23, 2015 00:45 IST

अमरावती जिल्हा आपत्तीप्रवण आहे. वर्षभर आग, पूर, वीज, चक्रीवादळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट आदी नैसर्गिक आपत्तींचा मारा सुरु असतो.

अतिवृष्टीचा इशारा : शोध, बचाव पथकाची लगबगअमरावती : अमरावती जिल्हा आपत्तीप्रवण आहे. वर्षभर आग, पूर, वीज, चक्रीवादळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट आदी नैसर्गिक आपत्तींचा मारा सुरु असतो. सध्या मान्सूनचे दिवस आहेत. अतिवृष्टीचा इशारा वेधशाळेने दिला आहे. या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका असलेले शोध व बचाव पथकाने साहित्य बाहेर काढले आहे. या पथकाला नियमित सरावाची गरज आहे.नागपूर व पुणे वेधशाळेने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन सजग झाले आहे. आपत्तीमध्ये होणारी जीवित हानी, वित्तहानी कमी करण्यासाठी व आपत्तीचा प्रतिबंध करण्यासाठी शोध व बचाव कार्य गतिमान पध्दतीने व सुरळीतपणे राबविण्यात यावे यासाठी पथकाला नियमित सराव व प्रशिक्षणाची गरज आहे. उपविभागीय कार्यालयांना यापूर्वीच २७ सर्चलाईट, २७ मेगाफोन, ४ ईमरजन्सी आॅक्सिजन कीट, १५ बॉब रोप, १५ इन्सुलेटेड फायरमन अ‍ॅक्स, ३० फायर एक्सिंग एअर, ३० रबर ग्लोव्हज, ३० लेदर ग्लोव्हज, ६ बोट, २०७ लाईफ जॅकेट, १११ लाईफ बायरींग, ५ ट्रॅक वितरित करण्यात आले आहे. जिल्ह्यात २ रबरी बोटी तयार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासह १४ ही तालुक्यात आपत्कालीन कक्ष सुरु आहेत. (प्रतिनिधी)'ते' ५० लाख अद्यापही पडूनआपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्ह्याला मागील वर्षी ५० लाख रुपये प्राप्त झाले. यापैकी २० लाखांचे साहित्य खरेदी व ३० लाख रुपये प्रशिक्षणावर खर्च करण्यात येणार होते. परंतु या प्रस्तावाला मंत्रालयाकडून एक वर्षापासून मंजुरी न मिळाल्याने ५० लाखांचा निधी अखर्चीत आहे.