शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

नियम बदलल्याने नापसंती ; ‘आरटीई’ च्या २२ हजार जागांसाठी १३५६ अर्ज 

By जितेंद्र दखने | Updated: April 30, 2024 20:42 IST

१० मे पर्यत मुदतवाढ : शिक्षण संचालनालयाचे निर्णयामुळे पालकांना दिलासा.

अमरावती : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांकरिता दरवर्षी उपलब्ध जागांच्या दुप्पट, तिप्पट अर्ज येतात. परंतु, यंदा राज्य सरकारने प्रवेश प्रक्रियेत बदल केल्याने प्रतिसाद अल्प मिळत असल्याचे वास्तव आकडेवारीवरून समोर आले आहे. जिल्ह्यात २२ हजार ४११ जागा उपलब्ध आहेत. परंतु, त्यासाठी केवळ १ हजार ३५६ हजारांवर अर्ज ३० एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत आले आहेत.  यंदा आरटीई प्रक्रियेंतर्गत विद्यार्थ्याची नोंदणीसाठी १६ ते ३० एप्रिलपर्यत मुदत होती. अशातच बुधवारी पुन्हा आरटीई प्रवेश अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यत मुदतवाढ दिली आहे.शिक्षण संचालनालयाचे या मुदतवाढीमुळे पालकांना दिलासा मिळाला आहे. 

आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी अमरावती जिल्ह्यातील २२ हजार ४११ जागा रिक्त आहेत.याकरीता आतापर्यत केवळ १३५६ पालकांनीच ऑनलाइन अर्ज केले आहेत. नोंदणीला मिळत असलेला  अल्प  प्रतिसाद लक्षात घेता. पालकांना सरकारी शाळेत आपल्या मुलांना शिक्षण नको,तर खासगी शाळेत शिक्षण हवे असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येत आहे. शिक्षण विभागाकडून अर्ज भरण्यासाठी पुन्हा येत्या १० मे मुदतवाढ मिळाली असली तरी बदललेल्या नियमावलीनुसार आरटीई प्रवेशासाठी अर्ज भरण्यास पालक इच्छुक नसल्याचे दिसून येत आहे. दृष्टिक्षेपात जिल्ह्याची स्थितीएकूण शाळांची नोंदणी - १९९८रिक्त जागा -२२,४११३० एप्रिलपर्यंत प्राप्त अर्ज -१३५६ आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी १६ ते ३० एप्रिल पर्यंत मुदत देण्यात आली होती. अशातच ही मुदत संपली असल्याने प्राथमिक शिक्षण संचालनालयाने बुधवारी सांयकाळी १० मे पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे पत्र जारी केले आहे. पालकांनी दिलेल्या मुदतीत आपल्या पाल्याचे ऑनलाइन अर्ज करावेत.-बुद्धभूषण सोनवणेशिक्षणाधिकारी प्राथमिक

टॅग्स :Amravatiअमरावती