शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

नियम बदलल्याने नापसंती ; ‘आरटीई’ च्या २२ हजार जागांसाठी १३५६ अर्ज 

By जितेंद्र दखने | Updated: April 30, 2024 20:42 IST

१० मे पर्यत मुदतवाढ : शिक्षण संचालनालयाचे निर्णयामुळे पालकांना दिलासा.

अमरावती : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांकरिता दरवर्षी उपलब्ध जागांच्या दुप्पट, तिप्पट अर्ज येतात. परंतु, यंदा राज्य सरकारने प्रवेश प्रक्रियेत बदल केल्याने प्रतिसाद अल्प मिळत असल्याचे वास्तव आकडेवारीवरून समोर आले आहे. जिल्ह्यात २२ हजार ४११ जागा उपलब्ध आहेत. परंतु, त्यासाठी केवळ १ हजार ३५६ हजारांवर अर्ज ३० एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत आले आहेत.  यंदा आरटीई प्रक्रियेंतर्गत विद्यार्थ्याची नोंदणीसाठी १६ ते ३० एप्रिलपर्यत मुदत होती. अशातच बुधवारी पुन्हा आरटीई प्रवेश अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यत मुदतवाढ दिली आहे.शिक्षण संचालनालयाचे या मुदतवाढीमुळे पालकांना दिलासा मिळाला आहे. 

आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी अमरावती जिल्ह्यातील २२ हजार ४११ जागा रिक्त आहेत.याकरीता आतापर्यत केवळ १३५६ पालकांनीच ऑनलाइन अर्ज केले आहेत. नोंदणीला मिळत असलेला  अल्प  प्रतिसाद लक्षात घेता. पालकांना सरकारी शाळेत आपल्या मुलांना शिक्षण नको,तर खासगी शाळेत शिक्षण हवे असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येत आहे. शिक्षण विभागाकडून अर्ज भरण्यासाठी पुन्हा येत्या १० मे मुदतवाढ मिळाली असली तरी बदललेल्या नियमावलीनुसार आरटीई प्रवेशासाठी अर्ज भरण्यास पालक इच्छुक नसल्याचे दिसून येत आहे. दृष्टिक्षेपात जिल्ह्याची स्थितीएकूण शाळांची नोंदणी - १९९८रिक्त जागा -२२,४११३० एप्रिलपर्यंत प्राप्त अर्ज -१३५६ आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी १६ ते ३० एप्रिल पर्यंत मुदत देण्यात आली होती. अशातच ही मुदत संपली असल्याने प्राथमिक शिक्षण संचालनालयाने बुधवारी सांयकाळी १० मे पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे पत्र जारी केले आहे. पालकांनी दिलेल्या मुदतीत आपल्या पाल्याचे ऑनलाइन अर्ज करावेत.-बुद्धभूषण सोनवणेशिक्षणाधिकारी प्राथमिक

टॅग्स :Amravatiअमरावती