शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

श्रीक्षेत्र सालबर्डीत भाविकांची गैरसोय

By admin | Updated: January 31, 2016 00:22 IST

मध्यप्रदेश व महाराष्ट्र सीमेत वसलेल्या श्रीक्षेत्र सालबर्डीचा विकास खुंटला असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांसह पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

अजय पाटील मोर्शीमध्यप्रदेश व महाराष्ट्र सीमेत वसलेल्या श्रीक्षेत्र सालबर्डीचा विकास खुंटला असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांसह पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. सालबर्डीत एक महिन्यानंतर महाशिवरात्रीनिमित्ताने मोठी यात्र भरते व दूरदुरून भाविकभक्तगण लहान महादेवाच्या दर्शनासाठी येथे येतात. परंतु सालबर्डी येथे ये-जा करण्याकरिता माडू नदीवर बांधण्यात आलेला पूल खचला आहे. खचलेल्या पुलामध्ये गोटे व रेती टाकली असून तो पूल कधीही कोसळू शकतो. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पर्यायाने भाविकांचे जीवन धोक्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन व लोकप्रतिनिधींनी या गंभीर समस्येची दखल घेऊन हा पूल तत्काळ दुरूस्त करण्यात यावा, अशी मागणी जि. प.च्या महिला बालकल्याण सभापती वृषाली विघे यांनी केली आहे. महाराष्ट्रासह मध्यप्रदेशातून लाखो भाविक भक्तगण व पर्यटक श्रावण मासमध्ये व महाशिवरात्री निमित्ताने मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात. सालबर्डी येथे प्राचीन शिवलिंग, चक्रधर स्वामी, मारोती महाराज, भगवान महाराज, दादाजी धुनिवाले, दरबाल, रामसितेची गरम थंड पाण्याची नान्ही असल्याने येथे वर्षभर उत्सव तसेच महोत्सव साजरे केले जातात. याशिवाय शेकडो पर्यटक पर्यटनासाठी येत असल्याने महसूल गोळा होतो. महाशिवरात्रीनिमित्य भरत असलेल्या यात्रेत विविध दुकानदारांसाठी पंचायत समिती मोर्शीतर्फे प्लॉटस् विकल्या जातात त्यातून सुद्धा उत्पन्न प्राप्त होते. परंतु मध्यप्रदेश व महाराष्ट्र या दोन राज्याच्या सिमेवर असल्यामुळे दोन्ही राज्यातील शासन व प्रशासन जाणीवपूर्वक या तिर्थक्षेत्रात दुर्लक्ष करीत असल्यामुळे सालबर्डीचा विकास खुंटला आहे. पर्यटकांची व भाविकांची सातत्याने होणारी गैरसोय पाहता दोन्ही सरकारच्या शासन व प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये तीव्र असंतोष धुमसत आहे. याठिकाणी असलेले अनेक प्राचीन मंदिरे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.