शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

श्रीक्षेत्र सालबर्डीत भाविकांची गैरसोय

By admin | Updated: January 31, 2016 00:22 IST

मध्यप्रदेश व महाराष्ट्र सीमेत वसलेल्या श्रीक्षेत्र सालबर्डीचा विकास खुंटला असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांसह पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

अजय पाटील मोर्शीमध्यप्रदेश व महाराष्ट्र सीमेत वसलेल्या श्रीक्षेत्र सालबर्डीचा विकास खुंटला असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांसह पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. सालबर्डीत एक महिन्यानंतर महाशिवरात्रीनिमित्ताने मोठी यात्र भरते व दूरदुरून भाविकभक्तगण लहान महादेवाच्या दर्शनासाठी येथे येतात. परंतु सालबर्डी येथे ये-जा करण्याकरिता माडू नदीवर बांधण्यात आलेला पूल खचला आहे. खचलेल्या पुलामध्ये गोटे व रेती टाकली असून तो पूल कधीही कोसळू शकतो. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पर्यायाने भाविकांचे जीवन धोक्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन व लोकप्रतिनिधींनी या गंभीर समस्येची दखल घेऊन हा पूल तत्काळ दुरूस्त करण्यात यावा, अशी मागणी जि. प.च्या महिला बालकल्याण सभापती वृषाली विघे यांनी केली आहे. महाराष्ट्रासह मध्यप्रदेशातून लाखो भाविक भक्तगण व पर्यटक श्रावण मासमध्ये व महाशिवरात्री निमित्ताने मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात. सालबर्डी येथे प्राचीन शिवलिंग, चक्रधर स्वामी, मारोती महाराज, भगवान महाराज, दादाजी धुनिवाले, दरबाल, रामसितेची गरम थंड पाण्याची नान्ही असल्याने येथे वर्षभर उत्सव तसेच महोत्सव साजरे केले जातात. याशिवाय शेकडो पर्यटक पर्यटनासाठी येत असल्याने महसूल गोळा होतो. महाशिवरात्रीनिमित्य भरत असलेल्या यात्रेत विविध दुकानदारांसाठी पंचायत समिती मोर्शीतर्फे प्लॉटस् विकल्या जातात त्यातून सुद्धा उत्पन्न प्राप्त होते. परंतु मध्यप्रदेश व महाराष्ट्र या दोन राज्याच्या सिमेवर असल्यामुळे दोन्ही राज्यातील शासन व प्रशासन जाणीवपूर्वक या तिर्थक्षेत्रात दुर्लक्ष करीत असल्यामुळे सालबर्डीचा विकास खुंटला आहे. पर्यटकांची व भाविकांची सातत्याने होणारी गैरसोय पाहता दोन्ही सरकारच्या शासन व प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये तीव्र असंतोष धुमसत आहे. याठिकाणी असलेले अनेक प्राचीन मंदिरे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.