शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

धामणगाव तालुक्यात आठ दिवसांत ५०० ग्रामस्थ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:12 IST

धामणगाव रेल्वे : आठ दिवसांत पाच गावे कोरोना हॉटस्पॉट बनली असून, तब्बल ५०० हून अधिक ग्रामस्थ पॉझिटिव्ह ...

धामणगाव रेल्वे : आठ दिवसांत पाच गावे कोरोना हॉटस्पॉट बनली असून, तब्बल ५०० हून अधिक ग्रामस्थ पॉझिटिव्ह आढळले आहेत. ‘ना तोंडाला मास्क, ना फिजिकल डिस्टन्सिंग’ अशी ग्रामीण भागातील नागरिकांची अवस्था आहे. त्यातच अनेकजण दिवसभर कट्ट्यावर गप्पा मारत असताना कोरोना समित्या केवळ कागदावरच असल्याने ग्रामस्तरावर होणारा कोरोनाचा फैलाव रोखणार कसा, असा सवाल उपस्थित झाला आहे.

धामणगाव तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात दिसत आहे. सोनेगाव खर्डा, हिरपूर, सालनापूर, कळाशी, जानकापूर, तळेगाव दशासर यासह अनेक गावे कोरोना हॉटस्पॉट बनली आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, गावात समन्वय राहावा, दुसऱ्या गावातील एखादी व्यक्ती जरी गावात येत असेल तरी त्याची नोंद घेणे, गावात कोरोना पॉझिटिव्ह निघाला तर तो गृहविलगीकरणात आहेत की, नाही यावर लक्ष ठेवणे, मास्कचा वापर व्हावा, यासाठी राज्य शासनाने प्रत्येक गावात ग्राम समितीची स्थापना केली. मात्र, कोरोना समितीला आपले अधिकार काय याची माहिती नसल्याचे पाहायला मिळत आहे. या समितीच्या डोळ्यासमोर लॉकडाऊनच्या काळात अनेक जण कट्ट्यावर बसलेले दिसत असताना गावात जवळच्या व्यक्तीशी कशाला वाद घालायचा, त्यामुळे ही समिती लक्ष देत नसल्याचे चित्र आहे.

संपूर्ण गाव बाधित झाल्यानंतर येणार काय जाग?

कोरोनाचे संकट हे मानव जातीवरील अस्तिवाचे संकट आहे. राज्यात दिवसेंदिवस कोराना मृतांची संख्या वाढत आहे. ४०- ४५ वर्षांतील व्यक्तींचे कोरोनामुळे जीव जात आहे. तरीही ग्रामीण भागात शासनाच्या त्रिसूत्रीचे पालन होताना दिसत नाही. संपूर्ण गाव कोरोना बाधित झाल्यानंतर ग्रामस्थांना जाग येईल का, असा सवाल रात्रंदिवस काम करणाऱ्या प्रशासनातील कोरोना योद्ध्यांनी निर्माण केला आहे.

संचारबंदी कागदावरच!

राज्य शासनाने १ मे पर्यंत कडक निर्बंध व संचारबंदी लागू केली असून, संचारबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस प्रशासन व स्थानिक समित्यांवर जबाबदारी दिली आहे. मात्र, गावात किराणा दुकान, भाजीपाला, जनरल स्टोअर्स खुले राहतात. एकीकडे पोलीस कर्मचाऱ्यांची कमतरता तर दुसरीकडे समित्यांनाही गावातील दुकानचालक जुमानत नसल्याने संचारबंदी कागदावरच असल्याचे पहायला मिळत आहे. किमान लॉकडाऊन काळात तरी प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे असल्याचे मत तहसीलदार गौरवकुमार भळगाठींया यांनी व्यक्त केले आहे.

कोट

धामणगाव तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. ग्रामस्थ आजही या आजाराला एक करमणूक समजत आहे. काही दिवसांत प्रत्येकाने काळजी न घेतल्यास ही परिस्थिती आटोक्याबाहेर गेल्याशिवाय राहणार नाही.

- हर्षल क्षीरसागर,

तालुका आरोग्य अधिकारी, धामणगाव रेल्वे

कोट २

धामणगाव शहरात लॉकडाऊन काळात रात्रीला फिरणाऱ्यांची संख्या अधिक आहे. कोरोनाचे दिवसागणिक रुग्ण वाढत आहे. आतातरी दुसऱ्याच्या जीवाशी खेळणे बंद केले पाहिजे.

- महेश साबळे,

वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय