शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

धामणगाव तालुक्यात आठ दिवसांत ५०० ग्रामस्थ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:12 IST

धामणगाव रेल्वे : आठ दिवसांत पाच गावे कोरोना हॉटस्पॉट बनली असून, तब्बल ५०० हून अधिक ग्रामस्थ पॉझिटिव्ह ...

धामणगाव रेल्वे : आठ दिवसांत पाच गावे कोरोना हॉटस्पॉट बनली असून, तब्बल ५०० हून अधिक ग्रामस्थ पॉझिटिव्ह आढळले आहेत. ‘ना तोंडाला मास्क, ना फिजिकल डिस्टन्सिंग’ अशी ग्रामीण भागातील नागरिकांची अवस्था आहे. त्यातच अनेकजण दिवसभर कट्ट्यावर गप्पा मारत असताना कोरोना समित्या केवळ कागदावरच असल्याने ग्रामस्तरावर होणारा कोरोनाचा फैलाव रोखणार कसा, असा सवाल उपस्थित झाला आहे.

धामणगाव तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात दिसत आहे. सोनेगाव खर्डा, हिरपूर, सालनापूर, कळाशी, जानकापूर, तळेगाव दशासर यासह अनेक गावे कोरोना हॉटस्पॉट बनली आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, गावात समन्वय राहावा, दुसऱ्या गावातील एखादी व्यक्ती जरी गावात येत असेल तरी त्याची नोंद घेणे, गावात कोरोना पॉझिटिव्ह निघाला तर तो गृहविलगीकरणात आहेत की, नाही यावर लक्ष ठेवणे, मास्कचा वापर व्हावा, यासाठी राज्य शासनाने प्रत्येक गावात ग्राम समितीची स्थापना केली. मात्र, कोरोना समितीला आपले अधिकार काय याची माहिती नसल्याचे पाहायला मिळत आहे. या समितीच्या डोळ्यासमोर लॉकडाऊनच्या काळात अनेक जण कट्ट्यावर बसलेले दिसत असताना गावात जवळच्या व्यक्तीशी कशाला वाद घालायचा, त्यामुळे ही समिती लक्ष देत नसल्याचे चित्र आहे.

संपूर्ण गाव बाधित झाल्यानंतर येणार काय जाग?

कोरोनाचे संकट हे मानव जातीवरील अस्तिवाचे संकट आहे. राज्यात दिवसेंदिवस कोराना मृतांची संख्या वाढत आहे. ४०- ४५ वर्षांतील व्यक्तींचे कोरोनामुळे जीव जात आहे. तरीही ग्रामीण भागात शासनाच्या त्रिसूत्रीचे पालन होताना दिसत नाही. संपूर्ण गाव कोरोना बाधित झाल्यानंतर ग्रामस्थांना जाग येईल का, असा सवाल रात्रंदिवस काम करणाऱ्या प्रशासनातील कोरोना योद्ध्यांनी निर्माण केला आहे.

संचारबंदी कागदावरच!

राज्य शासनाने १ मे पर्यंत कडक निर्बंध व संचारबंदी लागू केली असून, संचारबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस प्रशासन व स्थानिक समित्यांवर जबाबदारी दिली आहे. मात्र, गावात किराणा दुकान, भाजीपाला, जनरल स्टोअर्स खुले राहतात. एकीकडे पोलीस कर्मचाऱ्यांची कमतरता तर दुसरीकडे समित्यांनाही गावातील दुकानचालक जुमानत नसल्याने संचारबंदी कागदावरच असल्याचे पहायला मिळत आहे. किमान लॉकडाऊन काळात तरी प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे असल्याचे मत तहसीलदार गौरवकुमार भळगाठींया यांनी व्यक्त केले आहे.

कोट

धामणगाव तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. ग्रामस्थ आजही या आजाराला एक करमणूक समजत आहे. काही दिवसांत प्रत्येकाने काळजी न घेतल्यास ही परिस्थिती आटोक्याबाहेर गेल्याशिवाय राहणार नाही.

- हर्षल क्षीरसागर,

तालुका आरोग्य अधिकारी, धामणगाव रेल्वे

कोट २

धामणगाव शहरात लॉकडाऊन काळात रात्रीला फिरणाऱ्यांची संख्या अधिक आहे. कोरोनाचे दिवसागणिक रुग्ण वाढत आहे. आतातरी दुसऱ्याच्या जीवाशी खेळणे बंद केले पाहिजे.

- महेश साबळे,

वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय