शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

देवमाळी ग्रामपंचायत म्हणते - डेंग्यू घ्या, मलेरिया घ्या, सर्दी-खोकला घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2021 05:00 IST

देवमाळी हे गाव पाच किलोमीटर क्षेत्रफळाचे. सहा हजारांवर लोकसंख्या. चार प्रभागात ११ सदस्य  ग्रामपंचायतीची धुरा नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नागरिकांनीच निवडून दिले आहेत. कार्यालयासह परिसरातील अनेक ठिकाणी खुल्या प्लॉटवर पाण्याचे तलाव साचले आहे. संततधार पावसामुळे त्या पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. त्यातून रोगराईला जन्म देण्याचे काम दस्तुरखुद्द ग्रामपंचायत करीत असल्याचे चित्र आहे.

नरेंद्र जावरेलोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : ग्रामपंचायतीवर रहिवासी नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी असताना लगतच्या देवमाळी ग्रामपंचायतीने मात्र नागरिकांच्या जिवाशी खेळ चालविल्याचे चित्र आहे. दस्तुरखद्द ग्रामपंचायत कार्यालय पाण्यात गेल्यापासून जाण्यासही रस्ता नाही. परिसरातील  अवस्था अत्यंत बिकट असल्याने प्रचंड संताप  नागरिकांकडून व्यक्त होत आहे.     देवमाळी हे गाव पाच किलोमीटर क्षेत्रफळाचे. सहा हजारांवर लोकसंख्या. चार प्रभागात ११ सदस्य  ग्रामपंचायतीची धुरा नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नागरिकांनीच निवडून दिले आहेत. कार्यालयासह परिसरातील अनेक ठिकाणी खुल्या प्लॉटवर पाण्याचे तलाव साचले आहे. संततधार पावसामुळे त्या पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. त्यातून रोगराईला जन्म देण्याचे काम दस्तुरखुद्द ग्रामपंचायत करीत असल्याचे चित्र आहे. सुशिक्षित रहिवासी नागरिकांची ग्रामपंचायत असली तरी ग्रामपंचायतीचा डोलारा मूलभूत सोयी-सविधा उपलब्ध करून देण्यात सदस्य थिटा पडले आहे. शुक्रवारच्या पावसामुळे घाणीच्या साम्राज्यात अजून भर पडली आहे. स्वच्छतेचा धडा गिरवणारी ग्रामपंचायत नागरिकांना घाणीच्या साम्राज्यात ठेवत असल्याचे चित्र आहे. 

अशी दिली माहितीग्रामपंचायतीच्या ढेपाळलेला कारभार आणि नागरिकांच्या जीविताचा सुरू असलेला खेळ यावर नागरिकांच्या मनात प्रचंड संताप आणि खदखद सुरू आहे. नोकरदार असल्याने तक्रार करण्यास त्यांच्या मनात भीती आहे. या सर्व बाबी पाहून त्यांनी लोकमत यासंदर्भात आपली व्यथा मांडली.

आजार हवा तर  देवमाळीत चला!कोरोना नंतर प्रत्येक आजारासाठी नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे आरोग्याची काळजी प्रत्येक जण घेत असताना देवमाळी ग्रामपंचायत मात्र नागरिकांच्या जीवशी खेळत असल्याचा प्रकार आहे.  ग्रामपंचायत कार्यालय, केदारनगर, रुक्मिणीनगर, बालाजीनगर, हनुमान नगर, चक्रधर सर्वच ठिकाणी तलाव साचले आहे. दुर्गंधीमुळे डासांचा प्रादुर्भाव डेंगू मलेरिया सर्दी खोकला, ताप या आजारांना निमंत्रण देणारा ठरला आहे.

सुज्ञ नागरिक अन् अज्ञानी ग्रामपंचायतसर्वाधिक सुज्ञ आणि नोकरदार वर्ग देवमाळी ग्रामपंचायतमध्ये रहिवासी असल्याने. सुज्ञ मतदार मतदान करतात. मात्र निवडून दिलेल्या सदस्य त्यांच्या जिवाचा खेळ अज्ञानी होऊन खेळत असल्याचा प्रकार नागरिकांच्या जीवावर बेतनारा ठरला आहे. ग्रामपंचायत कार्यालयात सहा नागरिकांच्या घरातही गढूळ पाण्याचा शिरकाव होत असताना निद्रिस्त ग्रामपंचायतीचा कारभार चर्चेचा विषय ठरला आहे. 

 

टॅग्स :dengueडेंग्यूHealthआरोग्य