शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

देवगावचा साखर कारखाना भंगारावस्थेकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 05:01 IST

शासन बेरोजगारी दूर होण्यासाठी नवीन उद्योगधंदे, कारखाने काढत आहे. दुसरीकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असलेल्या कारखान्याचा दुर्देवी अस्त होतो, हा शेतकऱ्यांचा पराजय म्हणावा लागेल. धामणगाव परिसर पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे सुजलाम् सुफलाम् बनावा, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, या उद्देशाने धामणगावचे कै. अण्णासाहेब देशमुख यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडून हक्काने साखर कारखाना मंजूर करवून घेतला.

ठळक मुद्देमिळणार का नवसंजीवनी : कोट्यवधींची साधनसामुग्री धूळखात, चोरीचे प्रमाण वाढले, लोकप्रतिनिधींचा लक्षवेध

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव दशासर : धामणगाव तालुक्यातील एकमेव देवगाव साखर कारखान्याचा लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे अस्त झाल्याने शेकडो कामगारांचा रोजगार हिरावला. कारखान्याची कोट्यवधींची मालमत्ता बेभाव विकण्यात आली, ही तालुक्यासाठी दुर्देवी बाब आहे.शासन बेरोजगारी दूर होण्यासाठी नवीन उद्योगधंदे, कारखाने काढत आहे. दुसरीकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असलेल्या कारखान्याचा दुर्देवी अस्त होतो, हा शेतकऱ्यांचा पराजय म्हणावा लागेल. धामणगाव परिसर पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे सुजलाम् सुफलाम् बनावा, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, या उद्देशाने धामणगावचे कै. अण्णासाहेब देशमुख यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडून हक्काने साखर कारखाना मंजूर करवून घेतला. शेकडो शेतकºयांना एकत्र आणून कोट्यवधी रुपयांचे शेअर्स जमवून पैसा उभारला व परिसरात ऊसाची लागवड नसतानाही वास्तू उभी केली. परंतु त्यांचे आकस्मिक निधन झाल्यानंतर त्यावेळचे तत्कालिन आमदार व राज्यमंत्री यशवंतराव शेरेकर यांनी साखर कारखान्याची धुरा खांद्यावर घेतली. बाहेरून ऊस आणून लाखो पोते साखर निर्मिती केली. संचालक मंडळाने राजीनामे देऊन कारखान्यावर प्रशासक नेमण्याची पाळी आली. परिणामी कारखाना डबघाईस आला. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नव्हता.अनेकांनी यात हात धुवून घेतले.कारखान्यातील बराच माल चोरीस गेला, काही माल पोलिसांनी जप्त केला. परंतु तो स्वीकारण्यास कोणीही पुढे आले नाही. या परिसरात अप्पर वर्धा धरणाचे पाणी आल्याने कारखान्यासाठी लागणारा संपूर्ण ऊस परिसरात उत्पादित झाला असता. लोकप्रतिनिधींनी कारखाना सुरू करण्यासाठी ठोस पावले उचलली नाही. कारखान्यामुळे रहदारीस असलेला देवगाव चौक शांत दिसू लागला. शेतकºयांच्या आशा मावळल्या. ७ मार्च २००३ रोजी मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख तळेगाव दशासर येथे आले असता आमदार वीरेंद्र जगताप यांनी प्रास्ताविकातून देवगाव साखर कारखान्याचा गंभीर प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले. परंतु आश्वासनपूर्ती झाली नाही.सदर कारखाना शासनाने अवसायनात काढून विक्रीस काढला. सदर कारखान्याची मालमत्ता विक्रीची निविदा मागविण्यात आली व त्यावेळच्या १२ कोटी रूपयांच्या कारखान्याची मालमत्तेची किंमत फक्त ३ कोटी रुपये ठेवण्यात आली. त्यात भंगारवाल्यांनी फक्त ८५ लाखांत मागणी केली. शासनाने तेथील यंत्राची किंमत ३ कोटी ६० लाख रुपये ठेवली असताना औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील शरद सहकारी साखर कारखान्याने निविदेनुसार तीन कोटी सात लाख रुपयांची निविदा भरल्याने त्यांना देवगाव साखर कारखान्याची यंत्रे विकण्यात आल्याचे पत्र जिल्हाधिकाºयांनी दिल्यानुसार पैठण शेतकरी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी आमदार चंद्रकांत घोडके यांना देण्यात आले. त्यांना देवगाव शेतकरी साखर कारखान्यावर सुरक्षा नेमण्याविषयी पत्र देण्यात आले. या पत्राचे संदर्भानुसार साखर आयुक्त पुणे यांचे पत्र शेतकरी साखर कारखाना देवगाव या साखर कारखान्याची मशिनरी विक्रीबाबतचे १८ जून २००६ रोजी पत्र प्राप्त झाले.

टॅग्स :businessव्यवसाय