शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

देवगावचा साखर कारखाना भंगारावस्थेकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 05:01 IST

शासन बेरोजगारी दूर होण्यासाठी नवीन उद्योगधंदे, कारखाने काढत आहे. दुसरीकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असलेल्या कारखान्याचा दुर्देवी अस्त होतो, हा शेतकऱ्यांचा पराजय म्हणावा लागेल. धामणगाव परिसर पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे सुजलाम् सुफलाम् बनावा, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, या उद्देशाने धामणगावचे कै. अण्णासाहेब देशमुख यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडून हक्काने साखर कारखाना मंजूर करवून घेतला.

ठळक मुद्देमिळणार का नवसंजीवनी : कोट्यवधींची साधनसामुग्री धूळखात, चोरीचे प्रमाण वाढले, लोकप्रतिनिधींचा लक्षवेध

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव दशासर : धामणगाव तालुक्यातील एकमेव देवगाव साखर कारखान्याचा लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे अस्त झाल्याने शेकडो कामगारांचा रोजगार हिरावला. कारखान्याची कोट्यवधींची मालमत्ता बेभाव विकण्यात आली, ही तालुक्यासाठी दुर्देवी बाब आहे.शासन बेरोजगारी दूर होण्यासाठी नवीन उद्योगधंदे, कारखाने काढत आहे. दुसरीकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असलेल्या कारखान्याचा दुर्देवी अस्त होतो, हा शेतकऱ्यांचा पराजय म्हणावा लागेल. धामणगाव परिसर पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे सुजलाम् सुफलाम् बनावा, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, या उद्देशाने धामणगावचे कै. अण्णासाहेब देशमुख यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडून हक्काने साखर कारखाना मंजूर करवून घेतला. शेकडो शेतकºयांना एकत्र आणून कोट्यवधी रुपयांचे शेअर्स जमवून पैसा उभारला व परिसरात ऊसाची लागवड नसतानाही वास्तू उभी केली. परंतु त्यांचे आकस्मिक निधन झाल्यानंतर त्यावेळचे तत्कालिन आमदार व राज्यमंत्री यशवंतराव शेरेकर यांनी साखर कारखान्याची धुरा खांद्यावर घेतली. बाहेरून ऊस आणून लाखो पोते साखर निर्मिती केली. संचालक मंडळाने राजीनामे देऊन कारखान्यावर प्रशासक नेमण्याची पाळी आली. परिणामी कारखाना डबघाईस आला. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नव्हता.अनेकांनी यात हात धुवून घेतले.कारखान्यातील बराच माल चोरीस गेला, काही माल पोलिसांनी जप्त केला. परंतु तो स्वीकारण्यास कोणीही पुढे आले नाही. या परिसरात अप्पर वर्धा धरणाचे पाणी आल्याने कारखान्यासाठी लागणारा संपूर्ण ऊस परिसरात उत्पादित झाला असता. लोकप्रतिनिधींनी कारखाना सुरू करण्यासाठी ठोस पावले उचलली नाही. कारखान्यामुळे रहदारीस असलेला देवगाव चौक शांत दिसू लागला. शेतकºयांच्या आशा मावळल्या. ७ मार्च २००३ रोजी मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख तळेगाव दशासर येथे आले असता आमदार वीरेंद्र जगताप यांनी प्रास्ताविकातून देवगाव साखर कारखान्याचा गंभीर प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले. परंतु आश्वासनपूर्ती झाली नाही.सदर कारखाना शासनाने अवसायनात काढून विक्रीस काढला. सदर कारखान्याची मालमत्ता विक्रीची निविदा मागविण्यात आली व त्यावेळच्या १२ कोटी रूपयांच्या कारखान्याची मालमत्तेची किंमत फक्त ३ कोटी रुपये ठेवण्यात आली. त्यात भंगारवाल्यांनी फक्त ८५ लाखांत मागणी केली. शासनाने तेथील यंत्राची किंमत ३ कोटी ६० लाख रुपये ठेवली असताना औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील शरद सहकारी साखर कारखान्याने निविदेनुसार तीन कोटी सात लाख रुपयांची निविदा भरल्याने त्यांना देवगाव साखर कारखान्याची यंत्रे विकण्यात आल्याचे पत्र जिल्हाधिकाºयांनी दिल्यानुसार पैठण शेतकरी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी आमदार चंद्रकांत घोडके यांना देण्यात आले. त्यांना देवगाव शेतकरी साखर कारखान्यावर सुरक्षा नेमण्याविषयी पत्र देण्यात आले. या पत्राचे संदर्भानुसार साखर आयुक्त पुणे यांचे पत्र शेतकरी साखर कारखाना देवगाव या साखर कारखान्याची मशिनरी विक्रीबाबतचे १८ जून २००६ रोजी पत्र प्राप्त झाले.

टॅग्स :businessव्यवसाय