शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
5
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
6
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
7
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
8
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
9
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
10
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
11
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
12
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
13
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
14
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
15
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
16
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
17
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
18
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
19
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
20
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."

देवेंद्र भुयार यांनी बीडीओवर भिरकावल्या पाणी बॉटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 01:38 IST

जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असताना, जिल्हा परिषदेच्या उपाययोजना अद्यापही कागदावरच असल्याचा आरोप करीत झेडपी सदस्य देवेंद्र भुयार यांनी वरूड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुभाष बोपटे या अधिकाऱ्यांच्या अंगावर पाण्याच्या बॉटल भिरकावल्या.

ठळक मुद्देपाणीटंचाईची सभा : गुन्हा दाखल, अटकही केली; अधिकाऱ्यांचे बहिर्गमन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असताना, जिल्हा परिषदेच्या उपाययोजना अद्यापही कागदावरच असल्याचा आरोप करीत झेडपी सदस्य देवेंद्र भुयार यांनी वरूड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुभाष बोपटे या अधिकाऱ्यांच्या अंगावर पाण्याच्या बॉटल भिरकावल्या. जिल्हा परिषद व पंचायत समितीचे प्रशासन पाणीटंचाईच्या मुद्द्याला नियोजनाची जोड देत नसल्याच्या कारणावरून मंगळवारी दुपारी झेडपीच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात हा हायव्होटेज ड्रामा रंगला.निमित्त होते, जिल्हा परिषदेच्या पाणीटंचाईच्या विशेष सभेचे. देवेंद्र भुयार यांनी बॉटल भिरकावल्याने अधिकाऱ्यांनी सभागृहातून बहिर्गमन केले. याप्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात सीईओंमार्फत तक्रार नोंदविली गेली. पोलिसांनी देवेंद्र भुयार यांना ताब्यात घेतले. त्यानंतर या नाट्यावर पडदा पडला. दरम्यान, अधिकाºयांच्या अंगावर बॉटल भिरकावल्याच्या परिणामी गोंधळातच जिल्हा परिषदेची सभा गुंडाळण्यात आली.ग्रामीण भागातील पिण्याच्या पाणीटंचाईच्या मुद्यावर २८ मे रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभेला जिल्हा परिषद उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, आरोग्य सभापती बळवंत वानखडे, बांधकाम सभापती जयंत देशमुख, समाजकल्याण सभापती सुशीला कुकडे, मुख्य कार्यपालन अधिकारी मनीषा खत्री, प्रभारी अतिरिक्त सीईओ आनंद भंडारी, डेप्युटी सीईओ नारायण सानप, पाणीटंचाईच्या सभेला दूपारी दीड वाजता सुरुवात झाली. यावेळी प्रारंभी सदस्य गौरी देशमुख यांनी गुरुदेवनगर व मोझरी येथील पाणीटंचाईच्या मुद्यावर आक्रमक होत झेडपी अध्यक्ष नितीन गोंडाणे व सीईओ मनीषा खत्री यांना घागरी भेट दिल्या. मात्र, दोघांनी त्या नाकारल्याने पदाधिकारी व सीईओ यांच्यात यावेळी शाब्दिक चकमक झाली. यावर पडदा पडताच सभेचे कामकाज पुन्हा सुरू झाले असताना, वरूड तालुक्यातील पाणी टंचाईच्या मुद्यावर देवेंद्र भुयार यांनी तालुकास्तरीय पाणी टंचाई आढावा बैठक घेण्यात आली नसल्याचा मुद्दा आक्रमकपणे उपस्थित करत वरूड येथील गटविकास अधिकारी सुभाष बोपटे यांना जाब विचारला.सभागृहात सीसीटीव्ही लावाजिल्हा परिषदेतील सभांच्या कामकाजात पारदर्शकता व सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावावे, अशी मागणी रवींद्र मुंदे, सुहासिनी ढेपे, प्रवीण तायडे, सुनील डिके आदींनी मुख्यकार्यपालन अधिकारी मनीषा खत्री यांच्याकडे केली आहे. यावर तातडीने कारवाई केली जाईल व आवश्यकतेनुसार सुरक्षाही तैनात केली जाणार असल्याचे खत्री यांनी सांगितले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई